Tag Archives: खासदार

वर्षा गायकवाड यांचा संतप्त सवाल, सरकारने बदलापूर घटनेतून काय बोध घेतला? शाळांमधील मुलींची सुरक्षा वाऱ्यावरच, राज्यातील शाळांमध्ये 'सखी सावित्री' समिती पुन्हा कार्यान्वित करा

भाजपा युती सरकारने राज्यातील शाळांमध्ये मुलींची सुरक्षा तर वाऱ्यावरच सोडली आहे. पुण्यातील एका नामांकित शाळेत चेंजिंग रूममध्ये मुलींचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना स्टाफमधील एक व्यक्ती पकडला गेला. ही घटना अत्यंत चिंताजनक आहे. बदलापूरच्या शाळेतील घटनेप्रमाणेच या घटनेतही शाळेतील कर्मचारीच आरोपी आहे. सरकारने बदलापूर घटनेतून काय बोध घेतला? असा संतप्त सवाल मुंबई …

Read More »

डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनाने भारताच्या आर्थिक महासत्तेचा पाया रचणारे नेतृत्व हरपले खा. वर्षा गायकवाड यांचे प्रतिपादन

प्रख्यात अर्थतज्ञ, भारताचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. डॉ मनमोहन सिंह यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळेच भारताने आर्थिक क्षेत्रात जगात मोठा टप्पा गाठला आहे. अत्यंत साधे व्यक्तिमत्व, मितभाषी असणाऱ्या डॉ मनमोहनसिंग यांच्या निधनाने भारताच्या आर्थिक महासत्तेचा पाया रचणारे दूरदृष्टीचे नेतृत्व हरले आहे, अशा शब्दात मुंबई काँग्रेसच्या …

Read More »

संसदेत राष्ट्रवादीने अदानीच्या मुद्यावरून काँग्रेसची साथ सोडली राष्ट्रवादीची अदानी प्रकरणावरून काँग्रेसपासून दुसऱ्यांदा वेगळी भूमिका

संसदेचे सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. लोकसभेत सध्या राज्यघटनेच्या स्विकृतीला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यघटनेवर विशेष चर्चा सुरु आहे. त्यातच राज्यसभेतही पदसिद्ध सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव इंडिया आघाडीकडून आणला आहे. तर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर नुकतेच अमेरिकेने …

Read More »

रविंद्र वायकर यांच्या खासदारकीबाबत उच्च न्यायालय काय देणार निकाल? कीर्तीकर यांच्या निवडणूक याचिकेवरील निकाल उच्च न्यायालयाने ठेवला राखून

लोकसभा निवडणुकीत मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदरासंघातील एकनाथ शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला शिवसेना गटाचे (उबाठा) उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले. या याचिकेवरील दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला. अमोल कीर्तीकर यांनी याचिकेत उपस्थित केलेला मुख्य मुद्दा टेंडर मतांशी संबंधित आहे. अमोल …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका, सत्तेतील ‘सावत्र भाऊ’ माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण…. मुंबईसह महाराष्ट्रातील महिला असुरक्षित; फडणवीस सर्वात निष्क्रीय व अकार्यक्षम गृहमंत्री

मुंबईच्या वांद्र्यातील निर्मलनगरमध्ये १८ वर्षाच्या तरुणीवर दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने मुंबई हादरली आणि महाभ्रष्ट युती सरकारच्या काळात माताभगिनी सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पुण्याच्या बोपदेव भागात विद्यार्थीवर सामुहिक अत्याचार करण्यात आला, त्याचे आरोपी अद्याप सापडले नाहीत तोच मुंबईत घटना घडली. दररोज कुठे ना कुठे महिलेवर अत्याचार केल्याच्या …

Read More »

आरजी कार हॉस्पीटल अत्याचार प्रकरणी तृणमूलचे जवाहर सरकार यांचा राजीनामा काही निर्णय पटत नसल्याने राजीनामा

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) राज्यसभा खासदार जवाहर सरकार यांनी रविवारी कोलकाता रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी बंगाल सरकारने प्रकरण बेजाबदार पद्धतीने हाताळल्याच्या निषेधार्थ आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात, जवाहर सरकार यांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षातील “मोजके आणि भ्रष्ट लोकांची अनियंत्रित दबंग …

Read More »

खासदार सुधा मुर्ती म्हणाल्या की, रक्षाबंधन सणाची सुरुवात मुघल काळापासून मुघल बादशाह हुमायू आणि राणी कर्णावती यांच्या दंत्तकथेपासून

इन्फोसिसचे प्रमुख तथा नारायण मुर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती या त्यांच्या वेगळ्या वैशिष्टैपूर्णतेमुळे भारतीय जनमानसात ओळखल्या जातात. मात्र त्यांच्या एका पोस्टमुळे सुधामुर्ती या नेटकऱ्यांकडून भलत्याच ट्रोल होत आहेत. याचे एक कारणही विशेष असून त्यांनी रक्षा बंधनाचे औचित्य साधत एक पोस्ट केल्यामुळे, हिंदू धर्मातील रक्षा बंधनाच्या संबध थेट मुघल बादशाह हुमायून …

Read More »

खासदार महुआ मोईत्रा यांच्या विरोधात गुन्हा दाखल राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या विरोधातील वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

तृणमूल काँग्रेस (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) प्रमुख रेखा शर्मा यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाने शुक्रवारी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला. राष्ट्रीय महिला आयोगा NCW कडून तक्रार प्राप्त झाली होती, ज्यात आरोप करण्यात आला होता की, …

Read More »

सीआयएसएफच्या महिला सुरक्षा कर्मचारीने कंगना राणौत यांच्या श्रीमुखात भडकावली शेतकरी आंदोलनाबाबत चुकीचे वक्तव्य केल्यावरून मारली

चंदीगड विमानतळावर सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अभिनेता-राजकारणी बनलेल्या खासदार कंगना राणौतने यांच्या श्रीमुखात लगावल्याचा आरोप केला. साहिबजादा अजितसिंग नगर जिल्हा (मोहाली) पोलिसांनी द हिंदूला पुष्टी केली की कंगणा राणौत आणि सीआयएसएफ कर्मचाऱ्यांमध्ये संघर्षाची घटना घडली. सदर सीआयएसएफने कॉन्स्टेबलला निलंबित केले आहे. सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने …

Read More »

रविंद्र वायकर यांच्या घरी ईडी, तर राजन विचारे यांच्याकडे आयकर विभाग

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत महाराष्ट्रातील जवळपास ४४ आमदारांनी एका फटक्यात पक्ष प्रमुखाला न विचारता आणि घटनात्मक ( शिवसेनेच्या नव्हे राज्यघटनेतील) तरतूदींना बाजूला सारत केंद्रातील महाशक्तीच्या (भाजपा-अमित शाह-नरेंद्र मोदी) च्या पाठिंच्या बळावर महाराष्ट्रात राज्य सरकार स्थापन करत जवळपास २ वर्षे झाले चालविलेही. या सगळ्या घडामोडीत पाच वर्षाचा कालावधी पूर्ण होण्यास …

Read More »