राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यास तसेच त्याकरिताच्या ३४६ पदांना व त्यासाठीच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी 31 ऑगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे ३४६ पदांच्या …
Read More »सुप्रिया सुळे यांचा निर्धार, आता मुख्यमंत्र्यांसमोर पदर पसरवून न्याय मागणार हा लढा मी लढणार, माझा शब्द; ग्रामस्थांना आश्वासन, देशमुख आणि मुंडे कुटुंबीयांची सांत्वन भेंट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मस्साजोग येथे दिवंगत सरपंच संतोष देशमुख आणि परळी येथील दिवंगत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर हे देखील उपस्थित होते. यावेळी …
Read More »पीएस, ओएसडीचे बँक खाते क्लिअर तरच पोस्टींग, अनेक मंत्री अद्यापही विना स्टाफच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नियमाने अजित पवार, एकनाथ शिंदे वगळता सर्वच मंत्री हैरान
राज्याच्या राजकारणात सत्तास्थानी विराजमान झालेल्या आणि मंत्री पदाचे नाव जाहिर झाल्यापासून संबधित मंत्र्यांकडे पीएस आणि ओएसडी पदावर वर्णी लागावी या साठी अनेक अधिकाऱ्यांचे लॉबिंग सुरु होते. पुढे त्या संबधित पीएस आणि ओएसडीच्या माध्यमातून त्या संबधित मंत्री आणि विभागात काय चालते याची वंदता सर्वतोमुखी आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री …
Read More »भाजपाचे राजकारण, धनंजय मुंडे यांचा राजीनामाः अजित पवार मात्र अंग… सुरेश धस, धनंजय मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे भाजपाचे आणि त्याततही पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते. त्यांची हत्या का झाली आणि या हत्येत कोण कोण सहभागी होतं याबद्दलची माहिती चांगल्यापैकी बाहेर आलेली आहे. या प्रकरणातील सध्या तरी एक आरोपी वगळता जवळपास सर्वच आरोपी अटक झालेले आहेत. त्यावर न्यायालयीन कार्यवाही सुरु आहे. मात्र या सगळ्यात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशाच्या विकासात आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचा रौप्य महोत्सवी सोहळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग क्षेत्रासोबत जोडले आहे. आज भारतातील प्रत्येक नागरिकाचे बँक खाते आहे. त्यामुळे डीजीटल ओळख निर्माण झाली आहे. त्याचा थेट फायदा नागरिकांना मिळत आहे. देशाच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या विकासात आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा असून जेथे आर्थिक संस्था उभ्या …
Read More »सुरेश धस नेमकी कोणाची तक्रार करणार मुख्यमंत्र्यांकडे, बावनकुळे यांची ? धनंजय मुंडे यांच्या भेटीची बातमी कोणी फोडली
मागील काही महिन्यापासून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आले. त्यानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आर्थिक हितसंबध असल्याचीही माहितीही पुढे आली. त्यातच भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात आका आणि …
Read More »रंगशारदा नाट्य मंदिरमध्ये महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धा २०२४-२५ ची अंतिम फेरी मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत बांद्रा येथील रंगशारदा नाट्यगृहात ही स्पर्धा पार पडणार असून रसिकांना विनामूल्य प्रवेश असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मुंबई २६/११ प्रकरणातील आरोपी तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणास मंजूरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील महाराष्ट्रातील अंमलबजावणीचा आढावा घेतला. या तीन कायद्यांच्या अंमलबजावणीतून राज्यात गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तीन नवीन कायद्यांच्या संदर्भात आढावा बैठक झाली. …
Read More »मंत्री म्हणाले होते, लव्ह जिहाद प्रकरणाची माहिती ऐकिव, पण सरकार आणतेय कायदा लव्ह जिहाद कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांप्रमाणे मुंबईसह राज्यात, भाजपाच्या दाव्यानुसार हिंदू-मुस्लिम धर्मियातील लव्ह बर्ड्संना अटकाव करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा प्रणित महायुती सरकारही लव्ह जिहादचा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे राज्यात लव्ह जिहाद प्रकरणाची एक लाख तक्रारी असल्याची ऐकिव माहिती असल्याचा खुलासा तत्कालीन महिला व बालविकास मंत्र्यांनी अधिवेशन काळात विधानसभा सभागृहात केला …
Read More »जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर, उद्धव ठाकरे अजित पवार यांना भेटले, आम्ही आक्षेप… शरद पवार यांच्यावरील संजय राऊत यांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्युत्तर
दिल्लीतील एका कार्यक्रमात महादजी शिंदे पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदान केला. त्यावरून शिवसेना उबाठाच्या नेत्यांनी शरद पवार यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु केला. त्यातच संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी तर शरद पवार यांच्यावर विश्वासघातकी म्हणून टीका केली. त्या टीकेला राष्ट्रवादी …
Read More »
Marathi e-Batmya