लोकसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या समाधानकारक यशानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विधानसभेसाठी आपला टक्का वाढविण्यासाठी व्यूहरचना केलेली आहे यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नागपुरातून ओबीसी आणि महिला कार्ड त्यांच्याकडून वापरले जाण्याची शक्यता आहे . लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाने १० जागांवर आपले उमेदवार उभे केले होते त्यापैकी …
Read More »मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेटः भेटीत या मुद्यांवर झाली चर्चा नागपूरच्या दिक्षाभूमीसह अनेक प्रश्नांवर झाली चर्चा
वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड प्रकाश आंबेडकर यांनी दीक्षाभूमी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी भेट घेतली. या भेटीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या. गायरानावरील घरांवर कारवाई करू नये, अशी मागणी करण्यात आली. त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंचित बहुजन …
Read More »विजय वडेट्टीवार यांची मागणी, पुणे नंतर आता नागपूरात ड्रंक अँड ड्राईव्ह, कडक कारवाई करा आरोपीच्या गाडीत दारूच्या बाटल्या आणि अंमली पदार्थ
पुणे येथील कल्याणीनगर येथे दाऊ पिऊन पोर्शे कार सुसाट चालवित दोघांचा निष्पाप बळी घेतल्याचे प्रकरण अद्याप ताजे असताना आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरातच आणखी एक ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडल्याची माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील …
Read More »अतुल लोंढे यांचा सवाल, संचालकांवरील कारवाईचे स्वागत, पण नितीन गडकरींवर कारवाई कधी?
भारतीय जनता पक्षाचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर केल्याच्या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने NSVM फुलवारी शाळेच्या संचालकावर कारवाई करण्याचे निर्देश दिले, त्याचे स्वागतच आहे. परंतु नितीन गडकरी यांच्यावर कारवाई केलेली नाही. शाळा संचालकांना दोषी ठरवून कारवाई होत असताना नितीन गडकरी यांच्यावर कारवाई कधी करणार? …
Read More »नागपूरच्या विकासासाठी १ हजार ८८६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणाऱ्या विकास कामांसाठी १ हजार ८८६.९१ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यावेळी महानगर प्रदेशातील २५ गावांकरिता अमृत टप्पा दोन मधून मलनि:स्सारणासाठी सुमारे ७१६ कोटी खर्चाच्या वाहिनीच्या कामाचा समावेश आहे. ही विकासकामे जलदगतीने पूर्ण करावी, असे निर्देश …
Read More »राहुल गांधी यांचा सवाल, आम्ही जातीय जनगणना करत रोजगार…
मागील काही दिवसांपासून देशातील जातीय जनगणना करण्याला भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून जो काही विरोध केला जात आहे. त्या विरोधाला काहीही अर्थ नाही. काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेवर आल्यानंतर जो जातीय जनगणना करणार असल्याचा निर्धार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जाहिर सभेत बोलताना व्यक्त केला. काँग्रेसच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित है …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांचा हल्लाबोल, पंतप्रधान खोटे बोलतोय… विधानसभा निवडणूकीत म्हणतो अशोक गेहलोत जादूगार तर मी चमत्कार दाखविणारा
काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त नागपूर येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने है तैयार हम या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या जाहिर सभेला ५ लाखाहून अधिक लोक उपस्थित होते. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते तथा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका करत पंतप्रधान पदी असलेले …
Read More »विजय वडेट्टीवार यांचा आरोप,… दडपशाही धोरणामुळे लोकशाही धोक्यात
देशातील लोकशाही केंद्र शासनाच्या दडपशाही धोरणामुळे धोक्यात आली आहे. संविधान संपविण्याचा घाट घालण्याचे काम सुरू आहे. अशा दडपशाही धोरणामुळे देशातील गंभीर बनलेल्या महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अत्याचारी, दडपशाही वृत्तीला संपविण्यासाठी व भ्रष्टाचार मुक्त, अत्याचार मुक्त, महागाई मुक्त भारताच्या नवनिर्मितीसाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. त्यासाठी आम्ही …
Read More »संरक्षण दलासाठी साहित्य बनविणाऱ्या सोलार कंपनीत स्फोट
देशातील संरक्षण विभागाशी निगडीत साहित्यांची निर्मिती करणाऱ्या नागपूर येथील सोलार इंडस्ट्रीज कंपनीत आज सकाळी ९च्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटात ६ महिलांसह ९ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्या स्फोटामुळे सोलार एक्सप्लोसिव्ह इंडस्ट्रीजच्या आजबाजूचा परिसर हादरून गेला. सोलार ही कंपनी नागपूरातील बाजार गाव येथे उभारण्यात आली आहे. या सोलार …
Read More »जयंत पाटील यांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाणी वाटप करारासाठी…
दुष्काळी परिस्थितीत कर्नाटक सरकार महाराष्ट्राकडे पाणी मागते. त्यानुसार महाराष्ट्र सरकार पाणी कर्नाटकला देते. मात्र राज्याला पाणी आवश्यक असल्यास कर्नाटककडे पाणी मागितले जाते. तेव्हा कर्नाटक कडून सहजरीत्या मिळत नसल्याचा अनुभव आहे. त्यासाठी कर्नाटकसोबत कायम स्वरुपी पाणी वाटप करार करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्षवेधी …
Read More »
Marathi e-Batmya