Tag Archives: पंतप्रधान

युरोपियन युनियन आणि भारत संबधात भर, पण रशियाबरोबरील व्यापाराबाबत दिला इशारा वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दिला इशारा

युरोपियन युनियनने भारतासोबतचे धोरणात्मक संबंध सुधारण्याची योजना आखली आहे, जरी त्यांनी चेतावणी दिली की रशियासोबत भारताचा लष्करी सराव आणि रशियाची तेल खरेदी यामुळे ब्रुसेल्स आणि नवी दिल्ली यांच्यातील वाढत्या धोरणात्मक संबंधांना धोका आहे. युरोपियन कमिशन आणि ईयु EU चे शीर्ष मुत्सद्दी काजा कॅलास यांनी बुधवारी (१७ सप्टेंबर, २०२५) ब्रुसेल्समध्ये ‘अ …

Read More »

पियुष गोयल म्हणाले, जीएसटी सुधारणा हे विकसित भारत २०४७ च्या दिशेने टाकलेले पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती

लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर, बलशाली भारताची निर्मिती झाली आहे. २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या निर्णायक नेतृत्वाची देशाला गरज आहे, या शब्दांत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी पंतप्रधान मोदी यांना ७५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. जीएसटी सुधारणा हा आत्मनिर्भर भारत …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची टीका, पंतप्रधान मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय पंतप्रधान मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक, परराष्ट्र धोरण पूर्णतः अपयशी ठरले आहे. मोदी यांच्या स्वत:च्या इगोमुळे देशाचे आर्थिक, परराष्ट्र धोरण याला धक्का बसलाय. मोदी देशाचे परराष्ट्र धोरण फक्त अंबानीसाठी राबवताय. भारत जगभरातून जे ऑईल घेऊन इतर देशांना विकतोय त्याचा ८० टक्के नफा जवळपास ४४ हजार कोटींचा नफा (प्रॉफीट) हा फक्त अंबानीला होतोय. …

Read More »

मणिपूर हिंसाचारावरून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे पंतप्रधान मोदींना सात प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल

मणिपूरमधील सुरू असलेल्या हिंसाचारावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारवर तीव्र हल्लाबोल केला. मोदींनी मणिपूरला “भारताच्या मुकुटातील रत्न” असे संबोधले होते. या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत प्रकाश आंबेडकर यांनी ते “क्रूर थट्टा” असल्याचे म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया …

Read More »

पंतप्रधान केअर स्टारमर म्हणाले की, निदर्शकांना कधीही शरण जाणार नाही १० हजार निदर्शकांनी युनाएटेड द किंगडम काढली रॅली

ब्रिटन सरकारच्या इमिग्रेशन धोरणाविरुद्ध लंडनच्या रस्त्यांवर लाखोंहून अधिक निदर्शकांनी हल्ला केल्यानंतर एका दिवसानंतर, पंतप्रधान केयर स्टारमर यांनी रविवारी ठामपणे सांगितले की, ब्रिटन हिंसाचारासाठी राष्ट्रीय ध्वजाचा वापर करणाऱ्या अतिउजव्या विचारसरणीच्या निदर्शकांना “कधीही शरण जाणार नाही”, कारण त्यांनी कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांवरील हल्ल्यांचा निषेध केला. एक पाऊल पुढे जाऊन, केअर स्टारमर म्हणाले की …

Read More »

मणिपूर हिंसाचारात विस्थापित चुराचंदपूरला पंतप्रधान मोदी यांनी भेट देत साधला संवाद ७३०० कोटी रूपयांच्या विविध विकासाचे उद्घाटन

मणिपूरमध्ये वांशिक संघर्षाने दोन वर्षांहून अधिक काळ उध्वस्त केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६० लोकांचा बळी घेणाऱ्या हिंसाचाराचे केंद्रबिंदू असलेल्या चुराचंदपूर तसेच राजधानी इम्फाळमधील त्यांच्या घरातून विस्थापित झालेल्यांची भेट घेतली. “मी तुमच्यासोबत आहे,” असा संदेश पंतप्रधान मोदींनी हिंसाचारग्रस्तांच्या कुटुंबांना दिला. मुसळधार पावसातही, पंतप्रधानांनी प्रथम इम्फाळ विमानतळापासून कुकीबहुल चुराचंदपूरपर्यंत ६५ किमीचा …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी मणिपूरमधील चुरानचांदपूर आणि इम्फाळला दिली भेट मैतई बहुल इन्फाळमध्ये घेतली जाहिर सभा

इम्फाळ मध्ये राहणाऱ्या मैतई आणि प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या कुकी-झो समुदायाला आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की, मैतई आणि कुकी-झो नागरिकांनी डोंगराळ आणि खोऱ्यात सौहार्दपूर्ण पूल बांधण्याची गरज अधोरेखित केली. एकत्र पुढे जाण्यासाठी समावेशक विकास आणि परस्पर आदर आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी पुढे बोलताना म्हणाले की, मणिपूरमध्ये …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल, रक्त आणि क्रिकेट एकत्र याला काय म्हणायचं भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात माझं सिंदूर माझा देश अभियान

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दहशतवाद्यां विरोधात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत कारवाई करत रक्त आणि पाणी एकत्रित चालणार नाही अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. तर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताने सुरु केलेले ऑपरेशन सिंदूर अद्याप थांबविण्यात आलेले नाही असेही यावेळी जाहिर केले होते. त्यास काही महिन्यांचा कालावधी लोटत …

Read More »

राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या मणिपूर दौऱ्यावरून म्हणाले, ते चालले आहेत ठिक आहे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावरून केली टीका

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरच्या आगामी भेटीवरुन खोचक टीका केली. मे २०२३ मध्ये मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरवात झाल्यानंतर आता दोन वर्षांनी, या पंतप्रधान मोदी यांचा दौरा होत आहे. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी टीका करताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांचा मणिपूर दौरा आता …

Read More »

अखेर पंतप्रधान मोदी हे मणिपूरला उद्या भेट देणार, पण विविध कार्यक्रमांसाठी मणिपूर जळून खाक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी निघाले पण कार्यक्रमानिमित्ताने

२०२३ मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मणिपूरला भेट देणार आहेत. २०० हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या वांशिक हिंसाचारानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ, विरोधकांनी पंतप्रधानांवर संघर्षग्रस्त ईशान्येकडील प्रदेशातील परिस्थितीचा वैयक्तिक आढावा घेण्यासाठी राज्याला भेट न दिल्याबद्दल सातत्याने टीका केली. पण या दोन …

Read More »