अखेर पंतप्रधान मोदी हे मणिपूरला उद्या भेट देणार, पण विविध कार्यक्रमांसाठी मणिपूर जळून खाक झाल्यानंतर पंतप्रधान मोदी निघाले पण कार्यक्रमानिमित्ताने

२०२३ मध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मणिपूरला भेट देणार आहेत. २०० हून अधिक लोकांचा बळी घेणाऱ्या वांशिक हिंसाचारानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ, विरोधकांनी पंतप्रधानांवर संघर्षग्रस्त ईशान्येकडील प्रदेशातील परिस्थितीचा वैयक्तिक आढावा घेण्यासाठी राज्याला भेट न दिल्याबद्दल सातत्याने टीका केली. पण या दोन दिवसात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनेक कार्यक्रमांचा शुमारंभ करण्यात येणार आहे.

मणिपूरचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांनी घोषणा केली की, पंतप्रधान १३ सप्टेंबर रोजी ८,५०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी येणार असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी प्रथम चुराचंदपूर येथे उतरतील जिथे ते जिल्ह्यातील काही अंतर्गत विस्थापित लोकांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले.

मणिपूरचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल पुढे बोलताना म्हणाले की, मणिपूरच्या समावेशक, शाश्वत आणि सर्वांगीण विकासाच्या त्यांच्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान मोदी चुराचंदपूर येथे ७,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील, असेही यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

पुढे बोलताना मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल म्हणाले की,”१३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यामुळे राज्यात शांतता, सामान्यता आणि विकासाचा मार्ग मोकळा होईल,” असेही सांगितले.

पंतप्रधान मोदी जातीय हिंसाचाराने सर्वाधिक प्रभावित झालेल्या चुराचंदपूर येथे ७,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील. त्यांच्या भेटीच्या दोन दिवस आधी गुरुवारी शहरात पुन्हा चकमकी झाल्या, अज्ञात हल्लेखोरांनी कार्यक्रमासाठी तयार केलेल्या सजावटीची तोडफोड करत काढून टाकल्याचे वृत्त आहे.

पायाभरणी समारंभानंतर, पंतप्रधान मोदी राज्याची राजधानी इम्फाळ येथे १,२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यापूर्वी एका सार्वजनिक सभेला संबोधित करतील.

पंतप्रधान मोदी यांच्या मणिपूर भेटीवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते तथा विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, ही आता मोठी गोष्ट नाही, कारण राज्य बऱ्याच काळापासून अडचणीत आहे. आता मुख्य मुद्दा मतदार चोरीचा आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले की, मणिपूर बऱ्याच काळापासून अडचणीत आहे आणि पंतप्रधानांनी आता तिथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ती मोठी गोष्ट नाही. आज भारतात मुख्य मुद्दा ‘मत चोरी’ (मत चोरी) आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रातील निवडणूक आदेश चोरीला गेले… सर्वत्र लोक ‘मत चोर’ म्हणत आहेत…” अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

मणिपूर व्यतिरिक्त, पंतप्रधान पश्चिम बंगाल आणि निवडणुकीच्या तोंडावर असलेल्या बिहारला जाण्यापूर्वी मिझोरम आणि आसामसह इतर ईशान्येकडील राज्यांनाही भेट देतील. उद्या, ते मिझोरममध्ये त्यांचा दौरा सुरू करतील, जिथे ते ऐझॉलमध्ये ९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. त्यानंतर, ते मणिपूरला जातील.

संध्याकाळी नंतर, पंतप्रधान गुवाहाटीमध्ये भारतरत्न डॉ. भूपेन हजारिका यांच्या शताब्दी समारंभात सहभागी होण्यासाठी आसामला भेट देतील. संध्याकाळी ५ वाजता ते या प्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील.

१४ सप्टेंबर रोजी, पंतप्रधान पुन्हा एकदा १८,५३० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रमुख पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी आसाममध्ये असतील.

दुसऱ्या दिवशी, १५ सप्टेंबर रोजी, ते कोलकाता येथे १६ व्या संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स-२०२५ चे उद्घाटन करण्यासाठी पश्चिम बंगालला जातील. त्यानंतर, पंतप्रधान बिहारला जातील, जिथे ते दुपारी २:४५ वाजता पूर्णिया विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.

About Editor

Check Also

ब्रिक्स राष्ट्रांसाठी आरबीआयने दिला एकाच चलनाचा प्रस्ताव अमेरिकेचा मात्र ब्रिक्सच्या चलनाला विरोध

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआयने ब्रिक्स राष्ट्रांच्या अधिकृत डिजिटल चलनांना जोडून आंतरराष्ट्रीय व्यापार आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *