Tag Archives: पोलिस

जलदगतीने खटला चालवणे हा आरोपीचा अधिकार असल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळण्याचे प्रकरण : खटला संथगतीने सुरू असल्याच्या कारणांती आरोपीला जामीन

खटला जलदगतीने चालवणे हा आरोपीचा अधिकार आहे. याप्रकरणी खटला जलदगतीने चालवण्याचे विविध न्यायालयांकडून आदेश देऊनही खटल्याच्या सुनावणीत फारशी प्रगती झाली नसल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले आणि व्यावसायिक वादातून वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अर्जदाराला न्यायालयाने जामीन मंजूर केला. जलदगतीने खटला चालवला जाणे हा आरोपीचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याविरोधातील खटला जलगतीने …

Read More »

धुळ्यात पैसे वाटणाऱ्या भाजपा कार्यकर्त्याला वंचितने पकडत केले पोलिसांच्या हवाली पण पोलिसांचा भीमनगरभोवतीच बंदोबस्त वाढवला

धुळे शहरात मतदारांना पैसे वाटणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्याला वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. मात्र त्यानंतर पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी भीमनगर वस्तीच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. अशा प्रकारे वस्तीच्या प्रवेशद्वारावर इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा आणि गाड्या लागल्या मुळे मतदारांमध्ये दहशतीचे …

Read More »

मुंबई शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी पोलीस आणि खर्च निवडणूक निरीक्षक नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांकडून या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

भारत निवडणूक आयोगामार्फत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून हे सर्व निवडणूक निरीक्षक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांसाठी पाच सर्वसाधारण, दोन खर्च आणि एक पोलिस निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.धारावी व सायन कोळीवाडा या मतदार संघासाठी …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, अक्षय शिंदे प्रकरणी पोलिसांचे स्वसंरक्षण की हत्या? संपर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे

एखाद्या हायप्रोफाईल प्रकरणातील आरोपीला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सहसा अनेक पोलिस कर्मचारी बरोबर असतात. पोलिसांच्या गरड्यात असताना बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे पोलिसांचे पिस्तूल हिसकावून पोलिसांवरच गोळ्या झाडतो, यावर कुणाचा विश्वास बसेल? आणि ते जरी घडलं असेल तर पोलिसांनी त्याला आटोक्यात आणून का पकडता आलं नाही? हे संपूर्ण प्रकरण …

Read More »

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची लाटः पाच जण ठार पोलिसांचेही काही चालेना

मणिपूरमध्ये हिंसाचाराची नवीन लाट उसळली असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हल्ले आणि हत्येचे सत्र सुरु झाल्याची माहिती पुढे येत आहे. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात आज सकाळी काही संशयित कुकी बंडखोरांनी राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे २३० किमी अंतरावर असलेल्या नुंगचप्पी गावावर हल्ला केल्यानंतर झालेल्या ताज्या हिंसाचारात किमान पाच जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती …

Read More »

नाना पटोले यांची टीका,…निवृत्ती योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी सरकारच्या आशिर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुंडांना सरकारी आशिर्वाद मिळत असल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. महिला घरात व घराबाहेरही सुरक्षित नाहीत तर शाळेत मुलीही सुरक्षित नाहीत. आता तर कायद्याचे रक्षक पोलीसही सुरक्षित राहिले नाहीत. मुंबईतील माहिम पोलीस कॉलनीत एकाचवेळी १३ पोलिसांच्या घरावर दरोडा पडला व …

Read More »

दोन लहान मुलींवरील बलात्काराच्या घटनेवरून बदलापूरकर आक्रमक; रेल रोको आंदोलन सकाळपासून सुरु झालेले आंदोलन संध्याकाळ होत आली तरी सुरुच

दोन लहान शाळकरी मुलींवर शाळेतील शिपायाने बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेवरून आज बदलापूरकर चांगलेच आक्रमक झाले. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असली आरोपीला तात्काळ फाशी द्या या मागणीवरून बदलापूर रहिवाशी आक्रमक झाले. सुरुवातीला आंदोलक जमावाने ज्या शाळेत हि घटना घडली, त्या शाळेसमोर आंदोलकांनी आंदोलन सुरु केले. या घटनेमुळे …

Read More »

हरियाणात इंटरनेट आणि एसएमएस सेवा २४ तासासाठी निलंबित कावड यात्रा आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारचा निर्णय

हरियाणा सरकारने २१ जुलै रोजी सुरक्षा वाढवली आणि मागील वर्षी हिंसाचार झालेल्या ब्रज मंडळ जलाभिषेक यात्रेपूर्वी २४ तासांसाठी नूह जिल्ह्यात मोबाइल इंटरनेट आणि मोठ्या प्रमाणात एसएमएस सेवा निलंबित करण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी ३१ जुलै रोजी नुह येथे जमावाने विश्व हिंदू परिषदेची मिरवणूक रोखण्याचा, दगडफेक आणि गाड्या पेटवण्याचा प्रयत्न केल्याने …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, ७० दिवसानंतर खरी मॅच सुरु होईल तेंव्हा… कॅच घेईल राज्यातील पोलीसही असुरक्षित, गृहमंत्र्यांच्या फक्त घोषणा, कृती मात्र शून्य

शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असताना मुंबई पोलिसांनी त्यांना क्लिन चीट देणे म्हणजे भाजपाच्या वॉशिंगमशीन मधून वायकरांना स्वच्छ केल्याचे आणखी एक प्रकरण आहे. मोदी सरकार हे ईडी व सीबीआय या दोन कार्यकर्त्यांच्या मार्फत राजकारण कसे करते हे देशाने पाहिले आहे. अशी एखादी घटना समजू शकतो पण अनेक …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, … डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण

मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्याआड सर्रास डान्स बार चालवले जात आहेत. नियम धाब्यावर बसवून पहाटे पाचपर्यंत डान्सबार सुरू आहेत. मुंबईतील या डान्सबारना पोलीसांचेच संरक्षण आहे. या डान्सबारवर छापे टाकून कडक कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विजय वडेट्टीवार म्हणाले की, बारचालकांनी सिंडिकेट तयार केले असून, सिंडिकेटमधील बार चालक …

Read More »