Tag Archives: मुख्यमंत्री

महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण, राज्यात ४०० केंद्रांच्या माध्यमातून चार लाख जणांना रोजगार ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार: मंत्रिमंडळाची मंजूरी

शहरी आणि ग्रामीण भागात सर्वसमावेशक विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि प्रशासकीय गतीमानतेवर भर देणारे महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५ (Global Capability Centre) आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यात ५० हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक व त्यातून …

Read More »

राज्यातील कर्करोग उपचारासाठीच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरीः महाकेअरची स्थापना महाकेअर फाऊंडेशनची स्थापना, त्रिस्तरीय रचनेतून राज्यभरातील १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) कंपनी स्थापन करण्यास तसेच या माध्यमातून राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ओला दुष्काळाची मागणी, पण तशी तरतूदच नाही गेल्या महिन्यात ६० लाख हेक्टरचे नुकसान, शेतकऱ्यांना केवायसीची अट शिथिल

गेल्या महिन्यात सातत्याने अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याचा आढावा घेतला. सुमारे ६० लाख हेक्टर नुकसान झाल्याचा अंदाज असून पहिल्या टप्प्यात ऑगस्ट पर्यंत २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे. पण सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण …

Read More »

चेंगराचेंगरीच्या घटनेवर मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, कार्यक्रमासाठी नियम व मार्गदर्शक तत्वे तयार करणार जगदीसन चौकशी आयोगाचा अहवाल सादर केल्यानंतर नियम व मार्गदर्शक तत्वे तयार करणार

अभिनेता-राजकारणी विजय यांच्या करूर येथील रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीनंतर काही दिवसांनी, ज्यामध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सोमवारी (२९ सप्टेंबर २०२५) घोषणा केली की राजकीय पक्ष आणि इतर संघटनांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील. न्यायाधीश अरुणा जगदीसन चौकशी आयोगाने आपला अहवाल …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मराठवाडा आणि सोलापूरातील धरणातून पाण्याचा विसर्ग पूरपरिस्थितीचा आणि धरणातील विसर्गाची घेतली माहिती

मराठवाड्यातील पूरस्थिती आणि राज्यातील विविध धरणांचा विसर्ग याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. काल रात्री सुद्धा ते स्थानिक प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या संपर्कात होते. आज सकाळी पुन्हा त्यांनी जलसंपदा विभागाकडून एकूणच राज्याच्या स्थितीचा आढावा घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, विधानसभेचे विशेष अधिवेशन घ्या राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यात यावी

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यातील नैसर्गिक …

Read More »

चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना अभिनेता विजय कडून २० लाख तर सरकार कडून १० लाखाची मदत घटनेची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना

तामिळनाडूतील करूर येथे आयोजित अभिनेता कम राजकारणी विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या रॅली दरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेतील मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे. त्यामुळे घटनेतील वारसांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी १० लाख रूपयांची मदत जाहिर केली आहे. तर अभिनेता विजय यांनी मृतांच्या वारसांना २० लाख रूपयांची मदत जाहिर केली …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औद्योगिक विकासामुळे समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने कॉफी टेबल बुकचे अनावरण

चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीतून अनेक मोठे उपक्रम राबविण्यात येत आहे. यात टाटा ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल, कौशल्यावर आधारित रोजगार, आरोग्य ,पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा समावेश आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोली मध्ये इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार होत असून औद्योगिक विकासामुळेच समृद्ध अर्थव्यवस्था निर्माण होणार आहे, असे मुख्यमंत्री …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची मागणी, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त टोलमाफ करा टोलमाफीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी देशभरातून नागपूरच्या दीक्षाभूमी येथे दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान बौद्ध अनुयायांना टोलमाफी देण्याची मागणी केली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार उत्तर महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, …

Read More »