Tag Archives: राज्य सरकार

मुंबई उच्च न्यायालयाचे मराठा आंदोलन प्रकरणी आदेश, पाच हजार पेक्षा जास्त आंदोलक नको उद्या पुन्हा सुनावणी होणार, २४ तासात आझाद मैदान वगळता इतरत्र होणारी गर्दी हटविण्याचे आदेश

मागील चार दिवसापासून मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास होईल असे काही नको असे निरिक्षण नोंदवित २४ तासात आझाद मैदान वगळता इतरत्र होणारी गर्दी हटविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या प्रशासनाला दिले. तसेच पाच …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, महाराष्ट्रातील मराठा मुंबईत येण्याआधी निर्णय घ्या अजूनही वेळ गेलेली नाही

मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाचा आज चवथा दिवस आहे. आंदोलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर आंदोलक मुंबईतील आझाद मैदानावर आधीच आलेले आहेत. तर आणखी आंदोलक येत आहेत. या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबई आणि दादर-कुर्ला पर्यंतच्या …

Read More »

मराठा आरक्षणाबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केले विधान

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावरून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीन-चार महिन्यापूर्वी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार काल सकाळपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील जथ्याने मराठा आरक्षण प्रश्नी आझाद मैदान येथे आंदोलन सुरु करण्यात आले. आज आझाद मैदानावरील आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. एकाबाजूला राज्य सरकारकडून मनोज जरांगे पाटील …

Read More »

मराठा समाजासाठी गठीत वंशावळ समितीस ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ मनोज जरांगे पाटील यांच्या चर्चेच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णय

राज्यातील मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी तालुकास्तरावर तहसिलदारांच्या अध्यक्षतेखाली गठीत वंशावळ समितीस शासनाने ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची स्पष्टोक्ती, ही शेवटची लढाई मुख्यमंत्री फडणवीसांवर प्रश्नांचा भडीमार

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी सकाळपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू केले. पोलिसांनी त्यांना सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शांततापूर्ण निदर्शने करण्याची परवानगी दिली होती. पोलिसांनी त्यांच्या आंदोलनाला आणखी एक दिवस मुदतवाढ दिली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार, मराठ्यांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हटणार नाही आझाद मैदानावर मराठा आरक्षण प्रश्नी बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात

पोलिसांनी मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा समाजाला आझाद मैदानावर आंदोलन करण्यास एक दिवसाची परवानगी दिली. त्यानंतर आज सकाळी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषणाचे आंदोलन सुरु झाले. त्यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेल्या मराठा आरक्षण समर्थक आंदोलनकांना संबोधित करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मला …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली, पण… पोलिसांनी समोर ठेवल्या तीन अटी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आतापर्यंत जवळपास सहा ते सात वेळा आमरण उपोषण पुकारण्याऱ्या मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे यांनी यापूर्वीच घोषणा केल्याप्रमाणे आरक्षण प्रश्नी मुंबई आंदोलन करण्यासाठी येत आहेत. मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी कुच करणार असल्याचे जाहिर करताच भाजपा समर्थित काही जणांकडून मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मुंबई उच्च …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात… ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या

राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा …

Read More »

सचिन सावंत यांची राज्य सरकारवर टीका, मनोरंजक निर्णय पशुवाहतूकी विरूद्ध फक्त पोलिसच कारवाई करू शकतात, नागरिक तक्रार करू शकतात

कुरेशी समाजाने पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अत्यंत मनोरंजक निर्णय घेण्यात आला आहे की यापुढे बेकायदेशीर पशुवाहतूकीविरुध्द केवळ पोलिसच कारवाई करु शकतात.  दुसरीकडे नागरिक तक्रार करु शकतात असेही म्हणतात. याचा अर्थ वाहतूक थांबवण्याचा किंवा तक्रारी व्यतिरिक्त कोणतीही कारवाई करु शकणार नाहीत. पण पोलिसांव्यतिरिक्त जर कोणी व्यक्ती किंवा संस्था तक्रारी व्यतिरिक्त इतर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, स्वातंत्र्यदिनी कोणी काय खावे हे सरकार ठरवणार का? भाजपा आणि स्वातंत्र्यदिनाचा संबंधच काय?

स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वातंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते, काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते. भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »