Tag Archives: राज्य सरकार

सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला सवाल, मग लाडकी बहिण योजना थांबवावी का? की त्या जागेवर उभारलेली इमारत नेस्नाभूत करावी

राज्य सरकारने पुण्यातील विकास कामांसाठी १९६३ साली जमिनीचे अधिग्रहण केले. मात्र तेव्हापासून जमिन मालकाला जमिन अधिग्रहणाची नुकसान भरपाई दिलेली नाही. एकाबाजूला राज्य सरकारकडे अधिग्रहीत जमिनीची नुकसान भरपाई देण्यास पैसे नाहीत मात्र लाडकी बहिण योजनेतंर्गत पैसे वाटपासाठी पैसे आहेत, मग आम्ही लाडकी बहिण योजना थांबवावी की अधिग्रहीत केलेल्या जमिनीवरील बांधकाम पाडावे …

Read More »

सतेज पाटील याची टीका, राज्य सरकारने आपले अपयश नौदलाच्या माथी मारू नये छत्रपतींचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही लाजिरवाणी बाब: पृथ्वीराज चव्हाण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून राजकीय इव्हेंट करत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटनाचा घाट घातला त्याचा लोकसभेसाठी राजकीय इव्हेंट केला. पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार आणि काम निकृष्ठ दर्जाचे होते त्यामुळेच तो कोसळला, महाराष्ट्राच्या अस्मितेलाच धक्का दिला आहे. मालवणमध्ये घडलेल्या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करावी, त्याची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री …

Read More »

शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी अखेर आशिष शेलार यांची सरकारच्यावतीने माफी सर्वचस्थरातून टीकेचा भडीमार सुरु झाल्यानंतर अखेर माफीनामा

मालवण येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदल दिनाचे औचित्य साधत करण्यात आले. त्यास आठ महिन्याचा कालावधी पूर्ण होत नाही तोच पुतळा कोसळण्याची घटना घडली. त्यामुळे राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकेची झो़ड उठली. विरोधकांबरोबरच अनेक शिवप्रेमी आणि विविधस्तरांतूनही टीकेची झोड …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा टोला, आजचं आंदोलन हे विकृत विरूध्द संस्कृती… भरपावसात बदलापूरप्रश्नी शिवसेना उबाठाची सरकारच्या विरोधात निदर्शने

बदलापूर येथील दोन चिमुरडींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी स्थानिक बदलापूरकरांनी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात जनप्रक्षोभ बाहेर आला. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक दिलेली असताना मुंबई उच्च न्यायालयाने त्यास अटकाव केला. तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यात काळ्याफिती आणि काळे झेंडे घेऊन आंदोलन केले. शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनजवळ …

Read More »

बदलापूरप्रकरणी सरकारवर टीका करत शरद पवार यांनी दिली शपथ भरपावसात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर केले आंदोलन

बदलापूर प्रकरणी राज्य सरकारच्या विरोधात आज पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई उच्च न्यायालयाने अटकाव केल्यानंतर महाविकास आघाडीचे प्रमख नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. आंदोलनावेळी शरद पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्ये-पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी यांना शपथ दिली. तसेच राज्यातील …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भ्रष्ट युती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा लिलाव काढला विधानसभा निवडणूकीनंतर सर्वसहमतीने मुख्यमंत्री ठरवू

राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांच्या नंतरच्या मुख्यमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांनी महाराष्ट्र घडला व समृद्ध झाला. परंतु भाजपप्रणित महायुती सरकारने हा समृद्ध महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, गरीब व सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणे ही काँग्रेसची भूमिका आहे. महाविकास आघाडी म्हणून विधानसभेच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे प्रमुख घेतले निर्णय १३ विषयावर घेतला निर्णय

विधानसभा निवडूकांना कालावधी जसजसा जवळ येत चालला आहे, तसा राज्य सरकारकडून राज्यातील विविध घटकांना आणि खुष करण्याचा आणि केंद्राच्या धोरणाप्रमाणे निर्णय घेण्याचा सपाटाचा राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये सिंचनाचा निर्णय, प्रकल्प बाधितांना सदनिका उपलब्ध करून देण्याचा निर्णय, लहान शहरातील विकास प्रकल्पांसाठी कर्ज उभारणीस …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा, …महाभ्रष्टयुती सरकारची चार्जशिट प्रसिद्ध करणार राजीव गांधीच्या जयंतीच्या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

दिवंगत पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतील असून २० ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतच भव्य कार्यक्रम केला जाणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह देशभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, योजनांच्या जाहिरातीसाठी सरकारकडून तब्बल २७० कोटींचा खर्च विशेष प्रसिद्धी मोहिम नसून ‘निवडणूक प्रसिद्धी मोहीम’

राज्य शासनाने काल एक शासन आदेश जारी करून तब्बल २७० कोटी रुपयांची तरतूद शासकीय योजनांच्या ‘विशेष प्रसिद्धी मोहिमेसाठी’ केली आहे. वास्तविक ही विशेष प्रसिद्धी मोहिम नसून ‘निवडणूक प्रसिद्धी मोहीम’ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पुढे …

Read More »

शरद पवार यांचा पलटवार, तो दिवा महाराष्ट्राच्या तुरुंगात… आरक्षणावर तात्काळ तोडगा निघावा ही आमच्या पक्षाची भूमिका

पुणे येथे काही दिवसांपूर्वी भाजपाच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीच्या समारोपाच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर देशातील भ्रष्टाचाराचे सरदार असल्याची टीका केली होती. अमित शाह यांच्या या टीकेला शरद पवार यांनी आज या टीकेची परतफेड करत तो दिवा …

Read More »