Tag Archives: राज्य सरकार

आंध्र प्रदेश सरकारने कामगार कायद्यात केला बदलः आता कामाचे तास १० खाजगी कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात केली वाढ

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी जास्तीत जास्त कामाचे तास वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारने राज्याच्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा केल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे की गुंतवणूक आणि उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. टीडीपीच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कामाचे तास नऊवरून दहा तासांपर्यंत वाढवण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली. …

Read More »

लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी तळीराम बंधूच्या खिशात राज्य सरकारचा हात महाराष्ट्रात भारतीय आणि परदेशी दारू महागणार, मंत्रिमंडळाने दारूवरील कर वाढवण्याचा निर्णय घेतला

मागील काही महिन्यापासून राज्य सरकारच्या तिजोरीवर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांना देण्याच्या रकमेचा अधिभार पडत असल्याने सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाच्या निधीवर डल्ला मारण्यात येत आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयावर टीका होवू लागल्याने अखेर राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या मासिक हप्त्यासाठी राज्यातील भारतीय बनावटीच्या आणि परदेशी मद्याच्या किंमतीत वाढ …

Read More »

कामगार विमा महामंडळाच्या रूग्णालयासाठी छत्रपती संभाजीनगर करोडीतील ५ एकर जमीन महामंडळांच्या प्रस्तावित अन्य ९ रुग्णालयांना जमीन देण्यास मान्यता

छत्रपती संभाजीनगर येथे राज्य कामगार विमा योजनेच्या रूग्णालयासाठी १५ एकर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यासह बिबवेवाडी (पुणे), अहिल्यानगर, सांगली, अमरावती, बल्लारपूर (चंद्रपूर), सिन्नर (नाशिक), बारामती(पुणे), सातारा आणि पनवेल (रायगड) येथील प्रस्तावित रूग्णालयांसाठीही शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यास तत्वतः मान्यता …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन तात्काळ मागे घ्या, थेट जनसुनावणी घ्या सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता एमआरटीपी MRTP चे उल्लंघन

भाजपा युती सरकारने मंजूर केलेला धारावी पुनर्विकास मास्टर प्लॅन हा पूर्णपणे अन्यायकारक आहे. सार्वजनिक पद्धतीने सल्लामसलत न करता, धारावीतील सर्व घरांचे सर्वेक्षण पूर्ण न करता आणि महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमांचे (MRTP) स्पष्टपणे उल्लंघन करीत सरकारने या प्रकल्पाला दिलेली मंजुरी धक्कादायकच नाही तर असंवैधानिक आणि अनैतिक आहे. हा मास्टर प्लॅन सर्वसमावेशक …

Read More »

राज्य सरकारचा पुन्हा इशारा, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये १० जूनपर्यंत पावसात होणार घट

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने ५ जून पर्यंत मान्सूनच्या पावसात घट होणार असल्याचा अंदाज राज्य सरकारकडून व्यक्त करत पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये असे आवाहन केले होते. त्यास आता काही दिवसांचा अवधी जात लोटत नाही तोच आज राज्य सरकारने पुन्हा एक प्रसिद्धी पत्रक जारी करत १० जून पर्यंत पावसात घट होणार …

Read More »

शासनाचा नवीन निर्णयः शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई मिळणार नव्या शासन निर्णयानुसार एकदाच मिळणार पण कमी

महाराष्ट्र सरकारच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबतच्या नवीन आदेशात पूर्वीच्या तुलनेत कमी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शुक्रवारी एक नवीन सरकारी निर्णय (जीआर) जारी केला ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत भरपाईसाठी पात्रता आणि प्रति हेक्टर अतिरिक्त आर्थिक मदत या निकषांवर जानेवारी २०२४ चा पूर्वीचा आदेश रद्द करण्यात …

Read More »

महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकार जिल्हा परिषद उत्पन्नातून योजना राबविणार राज्याच्या ग्राम विकास विभागाचा निर्णय

महिला व बाल विकासाशी संबंधित विविध कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व जिल्हा परिषदांमध्ये महिला व बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. महिला व मुलींना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद क्षेत्रात महिला व बाल कल्याण समित्यांमार्फत जिल्हा परिषद उत्पन्नाच्या १० टक्के निधीतून खालील योजना सक्षमपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून याआधीचे शासन …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, आरोग्य विभागाचा ७ हजार कोटींचा निधी जातो कुठे ? नालेसफाईत हातसफाई, मिठी नदीत अजून गाळ तसाच, मुंबईची तुंबई करणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई कधी?

मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी ७४ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? …

Read More »

राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन, पेरणीची घाई करू नका मान्सूनच्या प्रवासाची गती लवकरच कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार आहे

या वर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरु असल्यामुळे तो २५ मे रोजी दक्षिण कोकणात दाखल झाला आहे, जे सामान्य तारखेपेक्षा १० दिवस आधीच आहे. मात्र २७ मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक इशारा देत सध्याच्या …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयाच्या त्या निर्णयामुळे विदर्भात भूमिहीन होण्याचा धोका सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडले, पुनर्विचार याचिका दाखल करावी

विदर्भातील सहा जिल्ह्यातील झुडपी जंगलाला वनक्षेत्र घोषित करून ८६ हजार हेक्टर क्षेत्र महसूल विभागाने वनविभागाला हस्तांतरित करण्यात येणार आहे. यामुळे या जमिनीला डिनोटीफाय करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मोठा धक्का बसला आहे. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे पूर्व विदर्भातील लाखो कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याचा धोका असून या भागाच्या विकासाला खिळ बसणार आहे. …

Read More »