छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे फक्त पुतळे उभारून चालत नाही तर त्यांच्या आचार विचारांचे पालन करावे लागते. शिवाजी महाराज हे ज्या कार्यासाठी लढले, जगले त्यातील थोडे तरी आपण आत्मसात केले पाहिजे. शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन महान कार्य केले व अन्यायाविरुद्ध लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे …
Read More »राहुल गांधी ४ व ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर कसबा बावड्यातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण; 'संविधान सन्मान संमेलना'लाही उपस्थिती
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून कोल्हापूर येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार …
Read More »अमित शाह यांचा सवाल, राहुल गांधी तुम्हाला एमएसपीचा लाँगफॉर्म माहित आहे का? अग्निपथ योजनेतील एकही तरूण बेरोजगार राहणार नाही
हरियाणा विधानसभा निवडणूकीतील लढाई आता चांगलीच रंगत येत चालली आहे. या लढाईत राहुल गांधी यांनी हरियाणातील तरूण अवैध मार्गाने अमेरिकेत जात असल्याचा आणि अवैध मार्गाने अमेरिकेत पोहोचलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबासोबतच्या चर्चेचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे भाजपाची पुरती पंचायत झाल्याने भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी …
Read More »हरियाणा निवडणूकीत राहुल गांधी यांच्या डंकीच्या प्रकरणावरून वादळ पंतप्रधान मोदी मात्र न्युयार्कमधील हरियाणाच्या महिलांच्या नृत्याचे कौतुक
हरियाणातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शाहरूख खान यांनी केलेल्या डंकी चित्रपटातील घटनेप्रमाणे काही घटना हरियाणात घडत आहेत. डंकी चित्रपटातील कलाकारांप्रमाणे बेकायदेशीररित्या युरोप आणि अमेरिकेत पैसे कमाविण्यासाठी गेलेल्या हरियाणाच्या नागरिकांना काँग्रेस नेते राहुल गांधी हे त्या तरूणांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भेटले. तसेच या दोघांमध्ये थेट संवादही घडवून …
Read More »काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान;शेतकऱ्यांना भरीव मदत करावी
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून राज्यात राजकीय व सामाजिक अस्थैर्य निर्माण झाले आहे. विदर्भ आणि मराठवाडा येथे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परंतु मदत मिळाली नाही. यामुळे जनतेमध्ये, शेतकरी वर्गात प्रचंड प्रमाणात अस्वस्थता आहे. ही सर्व परिस्थिती राज्याचे प्रमुख म्हणून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या निदर्शनास आणण्यासाठी आज काँग्रेसच्या …
Read More »पंतप्रधान मोदींची टीका, काँग्रेस टुकडे टुकडे गँग आणि शहरी नक्षली… काँग्रेसला गणपती पूजेची अडचण
विश्वकर्मा जयंती आणि केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती निमित्त वर्धा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वर्धा येथे महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभही करत पीएम मित्र प्रकल्पाचे आणि पुण्याश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभही यावेळी केला. यावेळी …
Read More »राहुल गांधींना धमक्या देणाऱ्या तालिबानीवृत्तीच्या विरोधात काँग्रेसचे राज्यभर आंदोलन वाचाळवीरांना भाजपा युतीने लगाम घालावा
विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांना जीवघेण्या धमक्या देणाऱ्या सताधारी भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या बेताल नेत्यांविरोधात काँग्रेसने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले. खासदार राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांना भाजपा-शिवसेनेने आवर घालावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मीरा भाईंदर येथे प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष …
Read More »राहुल गांधी यांच्यानंतर पंतप्रधान मोदी यांचे आश्वासन, जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा श्रीनगर येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही
श्रीनगरमध्ये एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना जम्मू आणि काश्मीरचा राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या सरकारच्या वचनाचा पुनरुच्चार करत लोकांना आश्वासन दिले की भाजपा ही वचनबद्धता पूर्ण करेल. जम्मू-काश्मीरला दहशतवादमुक्त करण्याच्या भाजपाच्या वचनबद्धतेवर भर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील बंपर मतदानाने दगडफेक आणि दहशतवादाबद्दल सहानुभूती …
Read More »रमेश चेन्नीथला यांची टिका,… घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी, ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’: नाना पटोले.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली आहे. नरेंद्र मोदी व आरएसएस विरोधात लढणारे देशातील ते एकमेव नेते असून राहुल गांधी भाजपासमोर मोठे आव्हान बनले आहेत त्यामुळेच …
Read More »जे पी नड्डा यांची टीका म्हणे, राहुल गांधी अयशस्वी ठरलेले उत्पादन मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहित केली काँग्रेसवर टिका
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेथील एका विद्यापीठात घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान देशाच्या मालमत्तेत कोणत्या जात समूहाची भागीदारी किती या मुद्याचे विश्लेषण करताना आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले. मात्र राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. …
Read More »
Marathi e-Batmya