देशाची एकता व अखंडता राखण्याची शपथ घेऊन मंत्री झालेले नितेश राणे केरळला भारताचा पाकिस्तान म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाला मतदान न करता काँग्रेस व इतर विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्यांना दहशतवादी म्हणतात, अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे का? अशी मागणी करत हे राष्ट्र प्रथम म्हणणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे स्पष्ट करावे, …
Read More »सुर्यवंशी कुंटुंबियाची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, दलित असल्यानेच सोमनाथची हत्या मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलतायत त्यांनी पोलिसांना संदेश देण्यासाठी ते वक्तव्य
परभणीतील राज्यघटनेची विटंबना झाल्याच्या प्रकरणी दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मात्र या आंदोलनात चुकीच्या पद्धतीने सोमनाथ सुर्यवंशी यांना अटक केली. त्यानंतर पाच दिवसांनी सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना कळवली. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या घरी जात सोमनाथच्या …
Read More »असा असणार राहुल गांधी यांचा परभणी दौरा…. सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या सोमवारी परभणीच्या दौ-यावर आहेत. परभणी दौ-यात राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल, नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील. दुपारी २.१५ ते ३.१५ वाजता ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची …
Read More »खाते वाटपानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात वाळू माफियांना पायबंद घालू महसूल विभाग 'जनता सर्वोपरी' ठरवू, झुडपी जंगल जमिनींचा प्रश्न मार्गी लावणार
जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण आणू” अशी घोषणा राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी करत पुढे म्हणाले की, ” जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल असे सुलभ धोरण देशातील कोणत्या राज्यात आहे, त्यासंदर्भात अभ्यास करून महाराष्ट्रात वाळूविषयक सुलभ धोरण …
Read More »राहुल गांधी यांचा मराठवाडा दौराः परभणी आणि बीडमधील मस्साजोगला भेट देणार सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तर परभणीतील राज्यघटनेच्या विटंबनेच्या प्रकरणी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी अटक केलेल्या दलित कार्यकर्ता सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस तुरुंगात असताना मृत्यू झाला. या दोघांच्या कुंटुबियांची भेट घेण्यासाठी खास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर वाद-अमित शाह माफी मागाः काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आंदोलन काँग्रेस आग्रही सलग दुसऱ्यादिवशीही परिसरात मोर्चाचे आंदोलन
राज्यसभेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा नेते अमित शाह यांनी माफी मागावी या मागणीसाठी काँग्रेस-इंडिया आघाडीकडून आजही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो हाती धरत आंदोलन केले. तसेच विजय चौकापासून ते संसदेच्या प्रवेशद्वारापर्यंत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून एक मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा …
Read More »दिल्लीतील राड्यानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस कार्यालयावर हल्ला तोडफोड सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या पोस्टरवर शाईफेक
दिल्लीत संसदेच्या आवारात भाजपा आणि काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर राज्यातही तेथील घटनांचे पडसाद उमटत आहेत. भाजपाच्या खासदारांनी काँग्रेसच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावरून संसदेच्या आवारात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मात्र त्यानंतर भाजपाच्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्लाबोल करत काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड, सामानाची नासधुस करण्याचा प्रयत्न करत नेत्या …
Read More »डॉ बाबासाहेब आंबेडकर वादः सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की भाजपाकडून काँग्रेस नेते राहुल गांधी लक्ष्य
विरोधी पक्ष आणि ट्रेझरी खंडपीठांमधील संबंध गुरुवारी (१९ डिसेंबर, २०२४) नवीन खालच्या पातळीवर पोहोचले आणि दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हिंसाचाराचा अवलंब केल्याचा आरोप केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरोप केला की भाजपा खासदार त्यांना धक्काबुक्की करत आहेत आणि त्यांना आणि इतर विरोधी खासदारांना संसदेत प्रवेश करण्यापासून रोखत असल्याचा आरोप …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पलटवार, देशात तेव्हा इलेक्टड नव्हे तर सिलेक्टड सरकार… पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यावरही टीका
राज्यघटनेच्या स्विकृतीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात काँग्रेसचे नेत्या प्रियंका गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपाने केलेल्या राजकिय चुकांवर भाष्य करत लोकशाहीचा ढाचा प्रयत्न भाजपावर हल्लाबोल केला. तसेच विरोधी बाकावरील इतर नेत्यांनीही भाषण करत राज्यघटना आणि देशातील सत्ताधारी भाजपाच्या कारभारावर ताशेरे ओढले. या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »राहुल गांधी यांचा सवाल, देश राज्यघटनेने की मनुस्मृतीने चालणार…सावरकरांच्या भूमिकेशी प्रतारणा संसदेतील राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित चर्चेत राहुल गांधी यांचा सवाल
आधुनिक भारताच्या नियमांची पुस्तिका म्हणजे राज्यघटना ही असून ही राज्यघटना संत बसवेश्वर, तथागत गौतम बुद्धा, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या विचाराच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेले हे एक हस्तावेज आहे. मात्र सावरकर हे हिंदूंसाठी मनुस्मृती हाच कायदा असल्याचे सांगितल्याचे एक कोट सांगत सत्तेवर बसलेले सत्ताधारी नेहमी सावकर यांचे उदोउदो करत असतात …
Read More »
Marathi e-Batmya