Tag Archives: विधानसभा निवडणूक

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ बैठकीत घेतले हे निर्णय आगरी समाजासाठी महानंडळ, नदी जोड प्रकल्प, शेती महामंडळाची जमिन एमआयडीसीला यासह अनेक निर्णय

राज्यात दसरा सण झाल्यानंतर कधीही विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करणार असल्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. त्यानुसार निवडणूक आचारसंहितेपूर्वीची शेवटची राज्य मंत्रिमंडळाची बैठक असे सांगत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक समाजांना आकर्षित करण्यासाठी नवी …

Read More »

वर्षा गायकवाड यांची टीका,… पराभवाच्या भितीमुळेच मुंबईतील टोल माफी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोडवरील (MTHL) कार आणि लाईट मोटार वाहनांच्या टोल माफीचे काय?

मुंबईतील टोल नाक्यावर होत असेलल्या प्रचंड मोठ्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली होती पण या मागणीकडे भाजपा युती सरकारने जाणीवपूर्वक कानाडोळा केला. लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही पराभव अटळ असल्याची जाणीव झाल्यानेच हादरलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मुंबईच्या प्रवेशद्वारावरील टोल नाक्यांवर टोल माफी जाहीर केली आहे. मुंबई ट्रान्स हार्बर …

Read More »

विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर मुंबईच्या एन्ट्री पाँईटवर टोल माफ पाच प्रवेश मार्गांवरील टोल हलक्या वाहनांसाठी माफ, एसटी बस, शाळा बस, कार यांना टोल माफी

अपेक्षेनुसार आता दसऱ्याचा सण झाल्यानंतर कोणत्याही क्षण विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता आता जाहिर करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई आणि महानगरात राहणाऱ्या मतदारांना महायुतीकडे आकर्षित करण्यासाठी मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर अर्थात टोल हलक्या वाहनांसाठी माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल, कोणी पैसे मागितले होते का? रोजगाराच्या संधी देऊन उपलब्ध करून देऊन सक्षम बनवायचं सोडून हे कसंल काम

काल दसऱ्याच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेच्या मेळावे तुम्ही पाहिले ना, मागील अनेक वर्षे उद्धव ठाकरे हे इतिहासातच राहुन इकडून अब्दाली आला, तिकडून शाहिस्तेखान आला तिकडून अफजल खान आला असे सांगत इतिहासातलं सगळं सांगत होता. तर तिकडे पुष्पा सुरु आहे, एकनाथ शिंदे दाढीवर हात फिरवत मै आयेगा साला असे सांगत राज ठाकरे …

Read More »

गद्दारांचा पंचनामा जाहिरः मविआचा निर्धार, महायुतीची सत्ता हिसकावून घेण्याची वेळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण, अत्याचार, दिवसा ढवळ्या हत्या

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला टक्कर देण्यासाठी मविआ अर्थात महाविकास आघाडी सरकारकडूनही जय्यत तयारी करण्यात येत आहे. या तयारीची माहिती देण्यासाठी  आज महाविकास आघाडीच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. महायुती सरकारमधील गद्दारांचा पंचनामा यावेळी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आला.  तसेच या गद्दारांच्या विरोधातील आरोपपत्रही यावेळी ठेवले. हे सगळं जनतेच्या …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा आरोप, …तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही शिवसेना उबाठाच्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच भाषण ठाकरेंची चवथी पिढी

मुंबईत दसरा दिनानिमित्त शिवसेना उबाठा पक्षाचा परंपरागत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात पहिल्यांदाच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे भाषण करणार होते. त्यामुळे आदित्य ठाकरे पहिल्या दसऱ्या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, जोपर्यंत अदानीची कामे होत नाहीत. तोपर्यंत राज्यात …

Read More »

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पहिल्यांदाच भगवानगडावर येत एकत्र म्हणाले, आम्ही पाठिशी जरी राजकीय मतभेद असले तरी वेगळा दसरा मेळावा आयोजित करण्याचा विचार केला नाही

मागील काही वर्षात पंकजा मुंडे आणि त्यांचे चुलत बंधू तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात एकमेकांपासून खूप दर गेले. मात्र मध्यंतरी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडूण गेल्याने ही कटूता कमी होण्यास मदत झाली. त्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे स्थानिक पातळीवर पुन्हा …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांचा सूचक इशारा, आता कासरा कसा ओढतो बघा… आचारसंहिता लागू होण्यापूर्वी निर्णय घ्या नाही तर तुमचा खेळ संपवलाच म्हणून समजा

माझ्या समाजातील गोरगरीब-पोरांना अधिकारी झालेल बघायचाय, त्यामुळे या तरूण पोरांच भविष्य घडविण्यासाठी मी ही लढाई सुरु केलेली आहे. आरक्षण मिळविल्याशिवाय या लढाईतून माघार कधीच घेणार नाही असे जाहिर प्रतिपादन करत मला माझ्या समाजाकडून एकच वचन हवंय, कोणाला पटो अथवा नाय पटो पण मी सांगेल तेवढंच करायचं तुम्ही शब्द देणार का …

Read More »

भाग-२ मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय शासकिय दुःखवटा असूनही निवडणूकीसाठी निर्णयांचा सपाटा

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रिमंडळ निर्णयाचा सपाटाचा लावला असून भविष्काळात राज्य सरकारमध्ये वापसी होते का नाही या विंवचनेत असलेल्या महायुतीच्या सरकारने मंत्रिमंडळाच्या या सुरु असलेल्या महिन्यात सलग तिसऱ्यांदा घेण्यात आली. तसेच विद्यमान राज्य सरकारच्या हिंतसंबधाशी संबधित अनेक निर्णय घेतले. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, …

Read More »

पारदर्शी व भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे ततोतंत पालन करुन लोकांचा लोकशाही मुल्यांवरील, निवडणूक प्रक्रीयेवरील विश्वास वृध्दींगत करावा, पारदर्शी व भयमुक्त वातावरणात आगामी विधानसभा निवडणूक पार पाडण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे. ज्या मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का राज्याच्या सरासरी मतदानाच्या टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणची कारणे शोधून त्यावर मार्ग काढावा व मतदानाचा …

Read More »