Tag Archives: aditya thackeray

भाजपा म्हणते,… खोटी माहिती देणे थांबवा कांजूर येथील १५ एकर जागा मेट्रो ६ च्या कारशेडला

केवळ स्वतःच्या हट्टापायी मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलवत मुंबईकरांवर २० हजार कोटी अतिरिक्त खर्च लादून प्रकल्पाला विलंब करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा त्याबद्दल माफी मागावी व पत्रकार परिषदेत खोटी माहिती देणे आदित्य ठाकरेंनी थांबवावे अशी मागणी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजपा प्रदेश प्रवक्ते …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा सवाल, मग ती जमिन नेमकी कोणाची? १५ हेक्टर मध्ये कांजुर चा मेट्रो कार शेड उभा करणार मग इतर जागा कंत्राटदार आणि बिल्डरच्या घशात

राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आरे कारशेड कांजूर मार्ग येथील मोकळ्या भूखंडावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आरे जंगलातील आणखी शंभर एक झाडे तोडावी लागणार नव्हती. तसेच त्यावेळी कांजूर मार्ग येथील जमिनीच्या मालकीवरून केंद्र सरकार आणि इतर काही खाजगी व्यक्तींकडून त्या जमिनीवर दावे करण्यात आले होते. मात्र मविआचे सरकार जाताच …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावर नेहमीच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर अरे जाऊ द्या रे.....

२१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आणि त्यानंतर शिवसेनेत पडलेली उभी फूट ही आपण पाहिली आहेच. त्यानंतर सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा उल्लेख गद्दार असा करण्यात येतो आहे. तसंच दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीकाही होते आहे. अशात आदित्य ठाकरेंनी एक गंभीर आरोप एकनाथ शिंदेवर केला. एकनाथ शिंदे …

Read More »

त्या गौप्यस्फोटावर शिंदे गटाचे मंत्री म्हणाले, खोटं बोलण्याचं ट्रेनिंग सुरुय दिसतंय…. एजन्सी नेमलेली दिसतेय

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीला जवळपास ९ महिन्याचा कालावधी उलटून गेला. तसेच या नऊ महिन्यात शिंदे गटाकडून आणि ठाकरे गटाकडून सातत्याने वेगवेगळे खुलासे आतापर्यंत करण्यात आले. त्यानंतर आता पहिल्यांदाच बंडखोरी होण्यापूर्वी मातोश्रीवर गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी काय केले आणि काय कारण सांगितले याबाबतचा नवा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार आदित्य …

Read More »

आदित्य ठाकरे यांच्या रावणराज च्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रत्युत्तर, त्यांच्या जन्मा… बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. एकनाथ शिंदे खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी अयोध्येला जाणार आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा पर्यावरणवाद्यांना दिलासा, आरे आंदोलकांवरील गुन्हे रद्द पर्यावरण वाद्यांकडे कोणतेही आक्षेप साहित्य नाही

मेट्रो ३ प्रकल्पाचा आरे कारशेडचा मुद्दा गेल्या तीन वर्षात प्रचंड तापला. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात युती सरकार होतं. तेव्हा सत्ताधारी शिवसेनाच भाजपच्या विरोधात उभी राहिली होती. मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत होऊ नये. आरेतील झाडे तोडली जाऊ नयेत यासाठी सत्ताधारी शिवसेना पक्षदेखील आक्रमक झालेला बघायला मिळाला. याशिवाय पर्यावरण प्रेमींनी तर प्रचंड मोठं …

Read More »

कार्यकर्त्यांच्या वन्समोअरवर आदित्य ठाकरे म्हणाले, असे लोक ‘ओनली वन्स’ होतात… गद्दार गँगला मदत करणाऱ्या चिलट्यांचे जेलभरो करणार

शिवसेना (ठाकरे गट) युवा सेनेच्या नेत्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने आज ठाण्यात जनक्षोभ मोर्चा काढण्यात आला. तीनही पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एकत्र जमले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी …

Read More »

‘पन्नास खोके,… ‘ घोषणेप्रकरणी राहुल शेवाळे न्यायालयात, तिघांना हजर राहण्याचे आदेश संजय राऊत, आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे यांना न्यायालयाची नोटीस

महाराष्ट्रातील सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना पन्नास खोके एकदम ओके ही विरोधकांनी दिलेली घोषणा घराघरात पोहोचली. ठाकरे गटाच्या शिवसेनेनेकडून सातत्याने याच घोषणेच्या आधार घेत त्या अनुषंगाने पत्रकार परिषदांमधून आरोपही करण्यात आले. यापार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या घोषणे विकत घेतलेला न्याय असा आरोप ठाकरे गटाच्या …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, तिजोरी लुटण्यासाठी दिल्लीत अदानी तर मुंबईत अजय आशर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार ‘हम करेसो कायदा’

राज्यात भाजपाप्रणित सरकार आल्यापासून जनतेच्या पैशाची लूट सुरु आहे. मागील ९-१० महिन्यात शिंदे फडणवीस सरकारने तिजोरी लुटण्याचे काम केले आहे. जी-२० परिषदेच्या बैठकांवर वारेमाप पैशांची उधळपट्टी करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे पण शेतकऱ्यांना देण्यासाठी नाही. दिल्लीत अदानीच्या रुपाने तर राज्यात अजय अशरच्या रुपाने सरकारी तिजोरी लुटण्यासाठी बसवले आहे, असा घणाघाती आरोप …

Read More »

अर्थसंकल्पिय अधिवेशनाबाबत अजित पवार यांची मोठी प्रतिक्रिया, माझ्या राजकिय कारकिर्दीतले…. तुम्हाला राज्यात सत्ता हवी, मंत्री व्हायचे आहे, सरकारी गाडी, बंगला, सिक्युरीटी पाहिजे, पण काम करायचे नाही हे कसं चालेल

मला खेद, दुःख एका गोष्टीचे आहे की, माझ्या राजकीय कारकिर्दीतले हे पहिले अधिवेशन असेल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची सभागृहातली उपस्थिती अगदी नगण्य होती. मंत्री उपस्थित नसल्याने, प्रश्न, लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ, अध्यक्षांवर अनेकदा आली. मंत्र्यांनी दिलेल्या माहितीत त्रुटी राहिल्याने माहिती सुधारुन घेण्याचे निर्देश अध्यक्षांना द्यावे लागले. विधिमंडळ कामकाजाबद्दल, सरकारची एकप्रकारे अनास्था, …

Read More »