काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस पक्ष उद्या दिनांक ६ नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उद्या बुधवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी १ वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत. तर …
Read More »विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज ४ हजार १४० अंतिम उमेदवार रिंगणात मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची माहिती
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन २०२४ साठी राज्यातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघासाठी एका टप्प्यांमध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी यंत्रणेची सर्व तयारी पूर्ण झाली असून या निवडणुकीतील अंतिम उमेदवारांची संख्या ४ हजार १४० असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस.चोक्कलिंगम यांनी आज दिली. मंत्रालय व …
Read More »निवडणूक मुख्याधिकारी यांची स्पष्टोक्ती, कोणत्या पदावर कोणाला ठेवायचे याचे अधिकार आयोगाकडे शरद पवार यांच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे आदेश, सर्व गाड्या तपासा
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना सरकारी पोलिसी वाहनातून रसद पुरवली जात असल्याचा खळबळजनक आरोप राज्यातील महायुती सरकारवर केला. त्यासंदर्भात आज निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी सांगितले की, त्या आरोपानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सर्व वाहने तपासण्याचे …
Read More »शिवसेना उबाठाचे निवडणूक आयोगाला पत्रः मतदार कार्ड आधारशी जोडा, मतदान केंद्र वाढवा मतदान यंत्राची बॅटरी, मतदारांना सुविधा दाव्या
राज्यात विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाली असून तसेच मतदार यादीतील दुबारे नावे आणि बोगस मतदान रोखण्यासाठी आधार कार्डशी, पॅन कार्ड, रेशन कार्ड यांच्याशी जोडले जाते. तसे मतदार कार्ड आधार कार्डशी का जोडले जात नाही असा असा सवाल शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने करत प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्रे वाढविण्याची मागणी शिवसेना उबाठाचे नेते …
Read More »सुनिल तटकरे म्हणाले, एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालू मतदारसंघातील वातावरण योग्य पध्दतीने पूरक होईल असा प्रयत्न
अपवादात्मक मतदारसंघात अर्ज दाखल झाले आहेत मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजितदादा पवार यांच्याशी एकत्रित चर्चा झाली आहे. जे – जे मतदारसंघ सोडण्याचे निर्धारित झाले होते त्याठिकाणी एकत्रित काम कसे करता येईल यासाठी युध्दपातळीवर आम्ही प्रयत्न करत आहोत. एक-दोन दिवसात सर्वांची समजूत घालून त्या – त्या मतदारसंघातील …
Read More »सत्यपाल सिंह यांचा विश्वास, सुरक्षेची हमी देणारे महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार भाजपाच्या साडेदहा वर्षाच्या काळात बॉम्बस्फोट झाले नाहीत
सर्वांना साथ, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचा विकास या ब्रीद वाक्याचे पालन करणाऱ्या केंद्र आणि राज्यांमधील भाजपाप्रणित सरकारांनी समाज आणि राष्ट्राला सुरक्षा दिली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुती सरकारलाच मतदार निवडून देणार असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत …
Read More »अतुल लोंढे यांची टीका,… हे भाजपाचे फेक नॅरेटीव्ह संविधान सन्मान संमेलनाचे लाईव्ह फीड काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून मिळणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरमध्ये उद्या बुधवार ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला प्रसार माध्यमांना बंदी घातली आहे, ही भारतीय जनता पक्षाने पसरवलेली अफवा आहे. संघाच्या शिकवणीप्रमाणे व नेहमी खोटे बोलण्याच्या सवयीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलले आहेत. संविधान सन्मान संमेलन या कार्यक्रमाचे LIVE …
Read More »उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल, वेळेआधी उमेदवारांचे अर्ज नाकारले कसे ? मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेनंतर अर्ज भरणाऱ्या राज्यातील विविध पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज कोणत्या कारणास्तव फेटाळले ?, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (ईसीआय) केली. तसेच त्याबाबत मंगळवारी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा ३० ऑक्टोबर शेवटचा दिवस होता. …
Read More »मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात १०५ अंतिम उमेदवार तर उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात ३१५ अंतिम उमेदवार
मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी आज उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम १०५ उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज दिली. उमेदवारी अर्ज …
Read More »रश्मी शुक्ला यांच्या बदलीबाबत शरद पवार यांचे मोठे विधान, निवडणूक आयोगाचा निर्णय अगदी… आता दिर्घकाळ त्या पदावर राहणार नाही याकडेही लक्ष द्यावं
काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मानलेल्या भगिनी रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी निवडणूक आयोगाकडे सातत्याने केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनीही रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालक पदावरून हटविण्याची मागणी केली होती. …
Read More »
Marathi e-Batmya