वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना भाजपा युती सरकारने बेकायदेशीपणे दोन वर्षाची मुदतवाढ देत त्यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नेमले होते. रश्मी शुक्ला या सत्ताधारी भाजपाला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याने त्यांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती त्या मागणीला यश आले आहे. निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना …
Read More »विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत या उमेदवारांचे बंड झाले थंड पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड केलेल्या बहुतांष उमेदवारांनी घेतली निवडणूकीतून माघार
राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी राज्यातील जवळपास सर्वच पक्षाकडून उमेदवारी जाहिर करण्यात आली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंड करत अपक्ष आमदार म्हणून उमेदवारी अर्ज भरला. परंतु या बंडखोर उमेदवारांमुळे विधानसभा निवडणूकीत दरम्यान डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली. त्याचा परिणाम पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या मताधिक्यावर होणार असल्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे या …
Read More »काँग्रेस-मविआला धक्का कोल्हापूर उ. मधून मधुरिमा राजे घाटगे यांचा अचानक अर्ज मागे खासदार शाहु महाराज यांची माहिती
विधानसभा निवडणूकीच्या रिंगणातून अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ होती. मात्र कोल्हापूर उत्तर मधून खासदार शाहु महाराज घाटगे यांच्या स्नुषा तथा मालोजीराजे यांच्या पत्नी मधुरिमा घाटगे यांनी आज अचानक आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या संदर्भात काँग्रेसच्या वरिष्ठांना नेत्यांना याची कल्पना दिली …
Read More »निवडणूकीपूर्वी काँग्रेस-महाविकास आघाडीच्या खात्यात पहिला विजय रश्मी शुक्ला केंद्रीय निवडणूक आयोगाचे निवडणूक मुख्याधिकाऱ्यांना आदेश
राज्याचे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निवृत्तीनंतरही दोन वर्षाची सेवावाढ देण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारने अर्थात भाजपाचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. मात्र विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर रश्मी शुक्ला यांची पोलिस महाचसंचालक पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी सातत्याने काँग्रेसने दोन वेळा राज्याचे निवडणूक मुख्याधिकारी आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. …
Read More »निवडणूकीत सगळा टक्केवारीचा पैसा, कंत्राटदारच सांगतोय ६ व्या मजल्यावरचा तो मंत्री…. कोण तो मंत्री विधानसभा निवडणूकीसाठी पैसा गोळा करतोय
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तोंड्यावर सर्वच सत्ताधारी पक्षाकडून निधी गोळा कऱण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केल्याची चर्चा राज्याच्या प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात रंगली असून तो नोटा मोजायची मशिन घेऊन बसणारा सहाव्या मजल्यावरील मंत्री आणि मंत्र्याचा माणूस कोण असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. वास्तविक पाहता राज्याच्या मंत्र्याकडून एखाद्या ठेकेदारावर मर्जी बहाल …
Read More »मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मतदारासंघाची घोषणा, कुठे पाडणार-कुठे उमेदवार देणार मराठवाड्यातील शिंदे यांची शिवसेना आणि भाजपा, राष्ट्रवादीच्या विरोधात उमेदवार पाडणार
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भाजपाचा सुफडा साफ करणार असल्याची घोषणा केली होती. तसेच विधानसभा निवडणूकीत भाजपाच्या विरोधात उमेदवार देत निवडणूक लढविणार असल्याची घोषणाही केली होती. यापार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतील विजयी होण्यासाठी लागणाऱ्या मतांचे गणित जुळवित कोणत्या मतदारसंघात उमेदवार देणार कोणत्या मतदारसंघात सत्ताधाऱ्यांचे उमेदवार पाडणार याबाबतचे मतदारसंघ …
Read More »अपघातात जखमी झालेले नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचे निधन ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर नवाब मलिक यांच्यावर दुःखाचा डोंगर
यंदाची दिवाळीचा सण आणि विधानसभेच्या निवडणूका राष्ट्रवादी काँग्रेसचे मानखुर्द शिवाजीनगर मधील उमेदवार नवाब मलिक यांना काही धार्जिण होताना दिसत नाही. आधीच काही काळ भाजपाच्या आरोपामुळे तुरुंगवास भोगाव लागलेल्या नवाब मलिक यांना कसेतरी जामीन मिळाला. त्यास काही महिन्यांचा अवधी लोटत नाही तोच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातील उमेदवारीला भाजपाने विरोध सुरु करण्यास सुरुवात …
Read More »प्रविण दरेकर यांची माहिती, १४ तारखेला मोदींची मुंबईत सभा विषारी सापाच्या तोंडून मतांच्या लाचारीसाठी हिरवे फुत्कार येताहेत
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टिकेला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी चोख प्रत्युत्तर देत टिका केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना पातळीच राहिलेली नाही. या राज्यात सगळ्यात विकृत मानसिकतेचा राजकीय पुढारी कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे. आता निवडणुका जवळ आल्यात म्हणून या …
Read More »नाना पटोले यांचा आरोप, जिथे भाजपाची सत्ता आहे त्या राज्यांची अधोगती राज्यातील गुजरातधार्जिणे व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेमुळेच महाराष्ट्राची अधोगती
भारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आल्यापासून मागील १० वर्षात महाराष्ट्राची पिछेहाट होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप नव्हता तर वस्तुस्थिती आहे यावर केंद्रातील भाजपा सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेनेच हा अहवाल दिला असून राज्यातील शिंदे भाजपाचे गुजरात धार्जिणे सरकार व केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिके मुळेच महाराष्ट्राची …
Read More »जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर टीका, स्वतःचा वेगळा पक्ष काढून… खोचक टीकेवरून अजित पवार समर्थकांचा आव्हाडांना प्रत्युत्तर
विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच या दोन्ही बाजूच्या आमदारांकडून प्रचाराच्या निमित्तानेही प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका-टीपण्णी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंब्रा-खळव्याचे आमदार तथा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी काल एका प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले …
Read More »
Marathi e-Batmya