Tag Archives: bmc

आदित्य ठाकरे यांचा सवाल, लुटीसाठी बीएमसीची निवडणुक घेत नाही का? अदानीच्या घश्यात धारावी घालायचं काम

‘मुलुंड मध्ये पीएपी प्रकल्प अजून सरकारने रद्द केलेला नाही. फक्त मिहीर कोटेचा म्हणतात तो प्रकल्प रद्द होणार आहे. पण धारावी प्रकल्पात ७०% जमीन बीएमसीची आहे. त्यामुळे प्रीमियम मिळताना ५ हजार कोटी मुंबई महापालिकेला मिळायला हवेत अशी मागणी शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत त्याचबरोबर १ ते २ हजार कोटी …

Read More »

नायर रुग्णालयातील लैंगिक प्रकरणाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून गंभीर दखल अधिष्ठाता बदलीचे व विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे. अधिष्ठातांच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना दिले. रुग्णालयातील कर्मचारी …

Read More »

आशिष शेलार यांची मागणी, संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा उबाठा सेनेच्या निकृष्ठ कामांमुळे मुंबईकरांचे हाल

आदित्य ठाकरे आणि त्यांच्या उबाठा सेनेन मागील २५ वर्षात जी निकृष्ठ दर्जाची कामे केली, त्यामुळेच मुंबईकरांना हे भोगावे लागत असून काल जी परिस्थिती निर्माण झाली त्याला तेच जबाबदार आहेत, अशी भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी आज येथे मांडली. तर संजय राऊत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही …

Read More »

मंगलप्रभात लोढा यांचा इशारा, धारावीमध्ये कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई सीसीटीव्ही फुटेज बघुन कारवाई करणार

आज मुंबई महापालिकेद्वारे सायन धारावी परिसरातील एका प्रार्थनास्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती. सकाळी महापालिकेच्या जी नॉर्थ प्रभागाचे अधिकारी या रस्त्यावर पोहोचले. यावेळी काही कट्टरपंथीयांनी प्रशासनाच्या कामात अडथळा आणण्यास सुरुवात केली. पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक सुद्धा करण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या बसेसचे नुकसान देखील झाले. सदर तणावपूर्ण …

Read More »

धारावीत मस्जिदीचे वाढीव बांधकाम पाडण्यावरून तणाव परंतु मस्जिदीच्या ट्रस्टींनी स्वतः वाढीव बांधकाम पाडण्याचे आश्वासन दिल्यानंतर शांतता

मागील काही वर्षांमध्ये धारावीतील मुंबई महापालिकेच्या मालकीच्या जमिनीवर अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर पाण्याच्या पाईपलाईन करणाऱ्या जागेवरही येथील अनेकांनी अनधिकृतपणे घरे बांधली. त्याबाबत तेथील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी मुंबई महापालिकेकडे तक्रारी दाखल केल्या, इतकेच काय एमआरटीपी कायद्याखाली पोलिसात तक्रार देण्यासाठी पुढाकारही घेतला. मात्र मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारावीतील …

Read More »

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय शुभारंभ सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू करून एक चळवळ उभी केली. त्याचे फलित म्हणजे आज देशभरात हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. स्वच्छता हा आरोग्याचा मंत्र असून मुंबईमध्ये ‘डीप क्लिन ड्राईव्ह’च्या माध्यमातून रस्ते साफ करणे, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणे हे काम सुरू आहे. यामुळे …

Read More »

मुंबई महापालिकेला पार्किग कंत्राटात २०० कोटींहून अधिकचे नुकसान माहिती अधिकार मधून माहिती आली बाहेर

मुंबई महापालिकेने एलेव्हेटेड मल्टीलेव्हल इलेक्ट्रोमेकॅनिकल कार पार्किंग सिस्टीम (शटल आणि रोबो पार्कर सिस्टीम) मुंबादेवी येथे सुरु केली तर माटुंगा, फोर्ट आणि वरळी येथे कार्यादेश दिले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत मुंबई पालिकेला पार्किग कंत्राटात २०० कोटींहून अधिकचे नुकसान झाले असल्याची तक्रार करत चौकशी करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केली …

Read More »

गणेशोत्सवात मुंबईतील या १२ पुलांवर अती गर्दीस मुंबई पालिकेचा मज्जाव मंडळांना मिरवणूकीसह गणेशविसर्जनासाठी रहदारीस बॅन

गणेशोत्सवास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला असतानाच मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळासाठी शहरातील १२ पुलांवरून गर्दी करण्यास आणि मिरवणूका, गणेश विसर्जनासाठी वापरू नये असे आवाहन केले आहे. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या तयारीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) भाविकांना मिरवणुका काढताना मुंबईतील १२ पुलांवर जमू नये, असेही जाहिर केले आहे. दक्षिण मुंबईतील दादर आणि …

Read More »

विधानसभाध्यक्षांनी निर्देश देऊन जयभिम नगरचे रहिवाशी छपराच्या प्रतिक्षेत काँग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम पक्षाने मुद्दा उपस्थित करूनही अद्याप सरकारकडून निर्णयाची अंमलबजावणी नाहीच

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पावसाळ्याच्या दिवसात कोणत्याही इमारतीवर किंवा वस्तींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचा आसरा अर्थात निवासी घरावर कारवाई करता येत नाही. याशिवाय मुंबई महापालिकेच्या अधिनियमात तशी तरतूदही आहे. तरीही मुंबई महापालिकेकडून पवई येथील जयभिम नगरातील रहिवाशांना सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या सांगण्यावरून मुंबई महापालिकेने कारवाई करत रस्त्यावर आणले. या कारवाईवरून राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात …

Read More »

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षांसाठी मंडप परवानगी द्या पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे महापालिका अधिकाऱ्यांना आदेश

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गत १० वर्षात नियमांचे उल्लंघन केले नसल्यास अशा मंडळांना महानगरपालिकेने पाच वर्षाचे मंडप परवाने अटी शर्तींविना देण्यात यावे, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. मंत्रालयात सन २०२४ च्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीची बैठक आज पार पडली. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक …

Read More »