मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान अडकलेल्या २२ विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. …
Read More »उध्दव ठाकरे यांचा शिंदे-फडणवीसांना इशारा,…तर महाराष्ट्र पेटवू आपल्याच जनतेचे नुकसान पोहोचवून सरकार विकास करणार असेल तर असा विकास नको
बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलनही करत आहेत. तर पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं आहे. दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूरमध्ये जात येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र …
Read More »बारसूत उध्दव ठाकरे यांचा सवाल, मी पत्र दिल्याचे नाचविता….मग त्यावेळी शेपुट घालुन का बसले ? मिंद्याच्या सांगण्यावरूनच बारसूची जागा सुचविली होती
कोकणातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून सत्ताधारी पक्षाकडून तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे जागा सूचविणारे पत्र दाखवित सॉईल टेस्टींगला विरोध करणाऱ्या स्थानिक नागरिकांचा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आधीच जाहिर केल्याप्रमाणे शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज सोलगांव बारसू या गावांचा दौऱा केला. सोलगांव येथे पोहचल्यानंतर …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश,… तर मुंबईतील विकासकांवर कारवाई करा दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या ५६ प्रकल्पांसाठी नोडल अधिकारी नियुक्त
मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा. या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह, विविध पर्याय तपासण्यात यावे. प्रकल्प रखडवणाऱ्या आणि विस्थापित झालेल्या कुटुंबांना …
Read More »भाजपा-शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिले “हे” निर्देश राज्यात सुरू असलेली विकासकामे 'मिशन मोडवर' पूर्ण करावित
राज्यात एकाबाजूला राजकिय भूकंप आणि उलथापालथींना मोठ्या प्रमाणावर वेग आलेला आहे. त्यामुळे राज्याच्या नेतृत्वात बदल होतोय की काय अशी चर्चा सातत्याने होत आहे. त्यातच शेजारील कर्नाटक राज्यातही विधानसभा निवडणूकांमुळे राजकिय वातावरण चांगलच तापलेले आहे. त्यामुळे राज्यातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि विधानसभा निवडणूका कधीही लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याची शक्यता …
Read More »शहरांमध्ये आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राबवणार सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य
राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घनकचरा प्रक्रियेसाठी आयसीटी तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य करण्यात येईल. ५७८ कोटी ६३ रुपये किंमतीचा हा प्रकल्प असेल. शहरांमधील घनकचऱ्याचे संकलन, वर्गीकरण, …
Read More »कांदळवन, सागरी जैवविविधतेच्या परदेशातील उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ शिष्यवृत्ती राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय
कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठात जाऊन संशोधन करण्यासाठी ७५ मुलांना तीन वर्षासाठी परदेशी शिष्यवृत्ती देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती देणार वन विभागाच्या कांदळवन सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शिष्यवृती देण्यात येणार असून …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजकिय वारस कोण? नेते प्रफुल पटेल यांचे मोठे विधान.. प्रफुल पटेल यांची स्पष्टोक्ती मी रेस मध्ये नाही
मंगळवारी सकाळी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं. एकीकडे शरद पवार राजीनामा मागे घेणार का? यावर चर्चा होत असताना दुसरीकडे त्यांनी राजीनामा मागे घेतला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार? यावर जोरदार चर्चा घडताना पाहायला मिळत आहे. यामध्ये सुप्रिया सुळे, जयंत …
Read More »कल्याण-डोंबिवली मनपात समाविष्ट २७ गावांतील मालमत्ता कर, बांधकांमांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश विविध शिष्टमंडळांनी आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे सादर केले
कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील मालमत्ता करांबाबत, गावठाण व त्याबाहेरील बांधकामांबाबत सर्वंकष धोरण ठरवण्याबाबत सर्व्हेक्षण करा. आवश्यकतेनुसार समिती स्थापन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या २७ गावांतील विविध प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समितीने आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी श्री संत सावळाराम महाराज …
Read More »अजित पवार यांचा सरकारवर निशाणा, हे काम शिंदे-फडणवीसांचे नाही का? ते काय करतायत ? मागच्या वर्षीची बिलं द्यायला पैसे नाहीत...मदतीच्या घोषणा अनेक केल्या पण लोकांपर्यंत त्या पोहोचल्याच नाहीत
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांसह विकास कामांसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला. पण आर्थिक अडचणीमुळे कधीही निधी अडविला गेला नाही. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर नव्या आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर घोषणा केल्या पण त्याचे पैसे अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले नाहीत. त्याचबरोबर अर्थसंकल्प होऊन …
Read More »
Marathi e-Batmya