रस्ता अपघातामध्ये ज्या पद्धतीने ‘ गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यास अपघातग्रस्तांचे प्राण वाचू शकतात. त्याच पद्धतीने सायबर फसवणुकीमध्येही ‘गोल्डन अवर’ महत्वाचा आहे. जेवढी विनाविलंब तक्रार द्याल, तेवढी फसवणूक झालेली रक्कम वाचविणे आणि परत मिळविणे सोयीचे होते. त्यामुळे सायबर फसवणूक झाल्याचे समजल्यास तातडीने विनाविलंब १९३० किंवा १९४५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार द्यावी, …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार अनुकंपाचा अनुशेष संपणार ४ ऑक्टोबरला १०,३०९ नियुक्तीपत्रे प्रदान करणार, यात ५१८७ अनुकंपा उमेदवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना दिल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, येत्या ४ ऑक्टोबर रोजी ५१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. याचवेळी ५१२२ एमपीएससीद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार असून, एकाच दिवशी १०,३०९ उमेदवार शासकीय नोकरीत दाखल होतील. अशाप्रकारचा …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, नागपूर ते चंद्रपूर द्रुतगती महामार्गाला मान्यता भविष्यात रस्ता बनविताना परिसरात विकासाची 'इकोसिस्टीम' निर्माण करा
नागपूर ते चंद्रपूर या २०४ किलोमीटर लांबी असलेल्या चार पदरी सिमेंट काँक्रीट महामार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच चंद्रपूर ते मूल दरम्यान महामार्ग निर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, भविष्यामध्ये …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रति टन १० रुपये आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ५ रुपये कपातीचा निर्णय
राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पूरस्थिती आहे, त्यामुळे २०२५-२६ या वर्षीचा ऊस गाळप हंगाम राज्यात १ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन १० रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या …
Read More »पंतप्रधान कुसूम घटक-ब योजनेच्या निधी उपलब्धतेसाठी अतिरिक्त वीज विक्री कर दरात वाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील वीज कंपन्यांनी विक्री केलेल्या विजेवर अतिरिक्त विक्री कर लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यातून पंतप्रधान कुसूम घटक-ब योजनेला निधी मिळविता येणार असून, त्यातून राज्यातील कृषि पंपाना पुरेशी वीज उपलब्ध होण्याने शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करता येणार आहे शहरी भागातील रिलायन्स …
Read More »राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय, ‘महाजिओटेक” महामंडळाची स्थापना विकास नियोजनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
राज्याच्या विकासाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड जेऊन एकात्मिक आणि नियोजनबद्ध गती देण्यासाठी महाजिओटेक महांडळ स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या महामंडळाची कंपनी कायद्यांतर्गत स्थापना करण्यात येणार असून यासाठी १०६ पदांच्या निर्मितीसही मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लीकेशन सेंटर …
Read More »महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण, राज्यात ४०० केंद्रांच्या माध्यमातून चार लाख जणांना रोजगार ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार: मंत्रिमंडळाची मंजूरी
शहरी आणि ग्रामीण भागात सर्वसमावेशक विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि प्रशासकीय गतीमानतेवर भर देणारे महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५ (Global Capability Centre) आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणामुळे राज्यात ५० हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक व त्यातून …
Read More »राज्यातील कर्करोग उपचारासाठीच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजूरीः महाकेअरची स्थापना महाकेअर फाऊंडेशनची स्थापना, त्रिस्तरीय रचनेतून राज्यभरातील १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार
राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन – MAHACARE Foundation) कंपनी स्थापन करण्यास तसेच या माध्यमातून राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, ओला दुष्काळाची मागणी, पण तशी तरतूदच नाही गेल्या महिन्यात ६० लाख हेक्टरचे नुकसान, शेतकऱ्यांना केवायसीची अट शिथिल
गेल्या महिन्यात सातत्याने अतिवृष्टी झाली त्यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्याचा आढावा घेतला. सुमारे ६० लाख हेक्टर नुकसान झाल्याचा अंदाज असून पहिल्या टप्प्यात ऑगस्ट पर्यंत २ हजार २१५ कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे. पण सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण …
Read More »चेंगराचेंगरीच्या घटनेवर मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, कार्यक्रमासाठी नियम व मार्गदर्शक तत्वे तयार करणार जगदीसन चौकशी आयोगाचा अहवाल सादर केल्यानंतर नियम व मार्गदर्शक तत्वे तयार करणार
अभिनेता-राजकारणी विजय यांच्या करूर येथील रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीनंतर काही दिवसांनी, ज्यामध्ये ४१ जणांचा मृत्यू झाला, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सोमवारी (२९ सप्टेंबर २०२५) घोषणा केली की राजकीय पक्ष आणि इतर संघटनांनी आयोजित केलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जातील. न्यायाधीश अरुणा जगदीसन चौकशी आयोगाने आपला अहवाल …
Read More »
Marathi e-Batmya