मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडी सतत गुजरात राज्याचे नाव असते. त्यामुळे त्यांचे महाराष्ट्रापेक्षा गुडजरातवर अधिक प्रेम असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी करत कोकणातील नाणार रिफायनरीला विरोध होत असताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा प्रकल्प गुजरातला जाईल अशी शक्यता वर्तवल्याने मुख्यमंत्र्यांना सध्या …
Read More »अखेर मुख्यमंत्र्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरचा हट्ट पुरविला पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची अखेर बदली
मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरात नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेच्या आयुक्त पदी मृदू व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे बंधू डॉ.सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र आयुक्त पदी डॉ.शिंदे यांच्या काम करण्याच्या शैलीचा त्रास भाजपच्याच नगरसेवकांना होवू लागला. त्यामुळे त्यांची आयुक्त पदावरून बदली करण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी असलेल्या भाजप नगरसेवकांसह …
Read More »निवडणूका डोळ्यासमोर ठेवत पहिल्या टप्प्यात २८ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या दुसऱ्या टप्प्यात आणखी २० ते ३० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांना अद्याप दिड वर्षे तर लोकसभा निवडणूकांना एक वर्षाचा कालावधी राहीला आहे. मात्र आगामी काळात जिल्हास्तरावरील कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने २५ आयएएस अर्थात सनदी अधिकाऱ्यांच्या आज अचानक बदल्या केल्या. तसेच आणखी दुसऱ्या टप्प्यात २० ते ३० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता सामान्य प्रशासन विभागातील …
Read More »भ्रष्ट आणि घोटाळेबाज राजकारण्यांची मालमत्ता लवकरचं सरकार जमा होणार पावसाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याच्या हालचाली
मुंबई : गिरिराज सावंत लोकसेवक तथा लोकप्रतिनिधींची आणि प्रशासनातील व्यक्तींकडून संगनमताने सरकारी निधींमध्ये भ्रष्टाचार करण्याचे प्रकार राजरोस करण्यात येण्यात येतात. मात्र आता अशा भ्रष्ट आणि घोटाळ्यातून मालमत्ता कमाविणाऱ्या लोकसेवक अर्थात लोकप्रतिननिधींची मालमत्ताच सरकार जमा करण्यात येणार असून आगामी पावसाळी अधिवेशनात ही या संबधिचे विधेयक विधिमंडळाच्या विधान परिषद आणि विधानसभेत मंजूर …
Read More »महापालिका आणि पोलिसांच्या विरोधात शेतकऱ्यांचे मंत्रालयाच्या दारात आंदोलन मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर उस्मानाबादच्या शेतकऱ्यांचे भाजी फेको आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी शेतीमालाला चांगली बाजार पेठ मिळावी आणि किंमत मिळावी या उद्देशाने उस्मानाबादहून मुंबईत येवून भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि मुंबई पोलिसांनी अटकाव केला. त्यामुळे या संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर टेम्पोतून भाजी आणून भाजी फेको आंदोलन केले. यामुळे मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. सदर शेतकरी …
Read More »मुंबईतील फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती देण्यास अग्निशमन दलाची टाळाटाळ माहिती अधिकार कायद्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील इमारतींना आगी लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून मुंबई अग्निशमन दलातर्फे फायर ऑडिटकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईतील फायर ऑडिट झालेल्या इमारतीची माहिती मागितली असता सरळ आणि स्पष्ट माहिती देण्यास अग्निशमन दलाने टाळाटाळ केली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई अग्निशमन …
Read More »डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम २०२० पर्यंत पूर्ण करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर भेट देऊन पाहणी केली. इंदू मिल येथे जगाला आवडेल असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून १४ एप्रिल २०२० पर्यंत ते पूर्ण करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत २०१९ पर्यंत स्मारकाचे …
Read More »मुख्यमंत्री जरी फितूर झाले तरी नाणार प्रकल्पाला विरोधच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा निर्धार
मुंबई : प्रतिनिधी कोकणातील पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरी प्रकल्पा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथील स्थानिक जनतेवर लादणार नसल्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही केंद्राने हा प्रकल्प नाणार रहिवाशांवर लादला असून मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत नसल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत मुख्यमंत्री पिचक्या पाठ कण्याचे निघाल्याचा आरोप केला. …
Read More »विरोधकांच्या उपोषणाला भाजपचे निषेध उपोषणाचे प्रतित्तुर पंतप्रधान, मुख्यमंत्री, अमित शहासह केंद्रीय मंत्री, आमदार-खासदारांचे देशभरात उपोषण
मुंबई : प्रतिनिधी देशात शांतता आणि सलोखा कायम रहावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकारात्मक कारभाराच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसने देशभरात एकदिवसीय उपोषण केले. त्यास प्रतित्तुर म्हणून भाजप अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत विरोधकांनी कामकाज चालू दिले नसल्याच्या निषेधार्थ आज एकदिवसीय उपोषण करण्यास सुरुवात केली. दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्यांच्या पसंतीनुसार होणार सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दर तीन वर्षांनी त्यांची बदली राज्याच्या कोणत्या भागात कधी आणि केव्हा होईल ? याची सतत टांगती तलवार असायची. मात्र आता द्वितीय श्रेणीतील अधिकाऱ्यांपासून ते चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांपर्यंत बदलीचा कालावधी आल्यास घाबरण्याचे किंवा चिंता करण्याचे कारण राहणार नसून सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करताना …
Read More »
Marathi e-Batmya