Tag Archives: congress

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना उबाठाला पाठिंबा चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही

चंद्रपुरात शिवसेना (उबाठा) ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा) चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी काँग्रेसच्या सर्व १२ नगरसेवकांनी  शिवसेना (उबाठा) ला मतदान केले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

अतुल लोंढे यांचा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांकडून जनतेची फसवणूक, वीज १६% ने महाग होणार महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक, तेलंगणा, गुजरातमधील वीज दर स्वस्त कसे, अदानीच्या फायद्यासाठी महाराष्ट्राची लूट

राज्यातील वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळेल असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. ५ वर्षांत विजेचे दर एकूण ५० टक्क्यांनी कमी केले जातील व पहिल्या वर्षी १० टक्क्यांची कपात केली जाईल असे सांगितले होते पण वस्तुस्थिती याच्या उलट आहे. वीजदर कमी होणार नसून ते १६ टक्क्यांनी महाग होणार आहेत, असा …

Read More »

राहुल गांधी यांच्या आरोपानंतर हरदीप सिंग पुरी यांचा खुलासा, होय मी एपस्टाईनला भेटलो पण आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेच्या शिष्टमंडळाचा भाग म्हणून

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी बुधवारी राहुल गांधी यांनी कुप्रसिद्ध एपस्टाईन फाइल्सशी त्यांचा संबंध जोडल्याच्या आरोपांना खोडून काढले आणि आंतरराष्ट्रीय शांतता संस्थेच्या (आयपीआय) शिष्टमंडळाचा भाग म्हणून लैंगिक गुन्हेगाराला भेटल्याचा खुलासा केला. राहुल गांधींच्या स्फोटक लोकसभेतील भाषणानंतर पत्रकार परिषद घेत मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी स्पष्टीकरण दिले. हरदीप सिंग पुरी …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, लाज वाटली पाहिजे, भारत विकला अर्थसंकल्पावरील भाषणा दरम्यान संसदेत पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका-भारत व्यापार करारावरून साधला निशाणा

लोकसभेत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर अमेरिकेसोबतच्या नुकत्याच झालेल्या व्यापार करारावरून हल्ला चढवला आणि सरकारला याची लाज वाटली पाहिजे असे म्हटले. त्यावर तीव्र हल्ला चढवत राहुल गांधी म्हणाले की, केंद्राने “भारत विकला”, तसेच अमेरिकन वस्तूंना प्रवेश देऊन सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, शिवसेना (उबाठा) च्या भुमिकेप्रमाणे परभणीत काँग्रेसने वागायचे का? चंद्रपूर महापौर निवडणुकीबाबत निरीक्षकाकडून अहवाल मागवणार

चंद्रपुरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्षाकडे ३१ सदस्य आहेत. शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील पक्ष असल्याने काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता पण त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर एमआयएमने तटस्थ राहून भाजपला मदत केली. आमचा नवा मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक …

Read More »

दिल्ली पोलिसांकडून लष्कर प्रमुखांच्या अप्रकाशित पुस्तकाच्या प्रसाराविरोधात विरोधात गुन्हा दाखल केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अद्याप मंजूरी दिली नाही

माजी लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी लिहिलेल्या अप्रकाशित पुस्तकाच्या सोशल मीडियावर झालेल्या कथित प्रसाराबद्दल दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, असे एका अधिकृत निवेदनात सोमवारी सांगण्यात आले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांचे एक अप्रकाशित पुस्तक मिळाले होते, जे संरक्षण मंत्रालयाकडून (MoD) मंजुरीशिवाय प्रसिद्धीसाठी पाठवायचे नव्हते आणि …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, सांगलीच्या मातीने कधीही अविचारांना थरा दिला नाही मतदारांनी जिल्ह्याची ओळख अबाधित ठेवली

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने तब्बल १८ ठिकाणी विजय मिळवला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने हा भव्य विजय मिळवल्यामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर जयंतराव पाटील यांचेच वर्चस्व कायम …

Read More »

रविंद्र चव्हाण म्हणाले, महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांचा स्पष्ट कौल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालानंतर केले प्रतिपादन

१२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समिती निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी राज्यभरात क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, या निकालांमधून भाजपा – महायुतीच्या विकासाच्या राजकारणाला मतदारांनी स्पष्ट पसंती दिली आहे. १२ जिल्हा परिषदांपैकी सर्व ठिकाणी भाजपा आणि महायुतीचीच सत्ता येणार असून १२५ पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा अधिक ठिकाणी भाजपा सत्ता स्थापन करेल, असे प्रतिपादन भारतीय …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, २ जिल्हा परिषदांमध्ये सत्ता तर २ ठिकाणी सत्तेत सहभागी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा विचार व संघटन विस्तारासाठी स्वबळावर लढलो

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसचा विचार व संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढवल्या. काही ठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर युती वा आघाडी करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, जे की आघाडी केल्यानं मिळू शकत नाही. जनतेने या निवडणुकीत काँग्रेस विचाराला चांगला कौल दिला …

Read More »

हिमंता बिस्वा सरमा यांचा गंभीर आरोप, गौरव गोगाई आणि त्यांच्या पत्नीचे पाकिस्तानी एजंटशी संबध आसाम निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते गोगाई यांच्यावर आरोप

काँग्रेस खासदार गौरव गोगोई, त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांच्यात ‘गहन संबंध’ आहेत आणि आयबीकडून मिळालेली माहिती गुप्तपणे शेजारील देशाला पुरवण्यात आली असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी असाही …

Read More »