Tag Archives: congress

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, सरकारच्या निर्णयामुळे मराठवाड्यात अशांतता मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही ओबीसीबाबतच्या भूमिकेवरून टीका

महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाबाबतच्या अलिकडच्या सरकारी निर्णयामुळे ओबीसींच्या हिताला बाधा पोहोचत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी करत समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचा आणि राज्यात, विशेषतः मराठवाड्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचाही विजय वडेट्टीवार यांनी केला. विजय वडेट्टीवार यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांनी तात्काळ राजानीमा द्यावा

भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी करुन सत्ता हस्तगत केली आहे. हे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पुराव्यासह उघड केले. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदारसंघात ६८५० मत चोरी झाल्याचे पुराव्याने सिद्ध झाले असून मतचोरी झाली नाही असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते डोळे उघडे करुन पहावे. फडणवीस यांच्याच पोलिसांनी …

Read More »

राहुल गांधी यांच्या आरोपाला केंद्रीय निवडणूक आयोगाचे डिजीटली उत्तर आरोपच चुकीचे असल्याचा निवडणूक आयोगाचे उत्तर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत कर्नाटकातील आळंद मतदारसंघात आणि महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघातील मतदारांची नावे डिलीट आणि समाविष्ट करण्याच्या कामात कशा पद्धतीने हलगर्जीपणा झाला त्यातून मतचोरीचे  प्रकार कशा पद्धतीने घडले याचा पर्दाफाश केला. तसेच राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या गलथान आणि चमडी बचाव कामकाज पद्धतीवर टीका …

Read More »

केशव उपाध्ये यांचा आरोप, राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह मतचोरीच्या खोट्या आरोपांबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी

उठसूठ मतचोरीचा डांगोरा पिटणारे राहुल गांधी हे मतचोरीचे बादशाह आहेत. गवगवा करून पत्रकार परिषदा घ्यायच्या, व्हिडिओ सादरीकरण करायचे, काँग्रेसच्या इको सिस्टिमने मतचोरीचा खोटा मुद्दा उचलून धरायचा आणि कोणताही पुरावा सादर न करता केवळ हवा निर्माण करायची हा सध्या काँग्रेसचा धंदा झाला आहे. मतचोरीचा खोटा आरोप करण्याबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी. …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, ज्ञानेश कुमार लोकशाहीच्या हत्याऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतायत कर्नाटकातील आनंद आणि महाराष्ट्रातील राजूरा मतदार संघात बेकायदेशीर पद्धतीने मतदारांची नावे डिलीट आणि समाविष्ट करण्याचे काम

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाकडून लोकशाहीच्या हत्याऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत एक टीम असून त्याच टीमकडून महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि हरयाणात मतदार यादीतील काँग्रेस आणि विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून जाणीपूर्वक डिलीट करण्यात आले आहेत काही ठिकाणी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, फडणवीसांच्या चमकोगिरीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जाहिरातीवरून माफी मागण्याची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवाभाऊचे बिरुद लावून स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जागोजागी पोस्टर लावले आहेत. पण हे पोस्टर लावताना त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे याचे भान ठेवून पोस्टर योग्य जागी तरी लावयला हवीत पण प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या गल्लीत लावलेल्या पोस्टरच्या खाली कचरा, घाण, अस्वच्छता दिसत असून लोक त्या पोस्टरवर थुंकत आहेत. …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का? सत्तेत नसतानाही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावे भरवणार

देशात बेरोजगारीची समस्या सर्वात मोठी असून उच्च शिक्षण घेऊनही तरुणांना नोकरी मिळत नसल्याचे भयावह चित्र आहे. सत्तेतील भाजपाने नोकरीचे आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक केली आहे, परंतु काँग्रेस पक्षाने सध्या सत्तेत नसतानाही तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत शेकडो तरुणांच्या हाताला काम व डोक्याला विचार देण्याचे काम केले आहे. यापुढे असे रोजगार …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत द्या शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प

राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील एकही मंत्री मदत देण्याबाबत तोंडातून चकार …

Read More »

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून भाजपावर काँग्रेस, शिवसेना उबाठाची टीका भारत पाक सामन्याला परवानगी दिलीच कशी

रविवारी संध्याकाळी दुबईमध्ये सुरू असलेल्या आशिया कप टी-२० स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे संबंधित क्रिकेट संघ एकमेकांशी सामना करण्याची तयारी करत असताना, भारतात राजकीय तणाव वाढला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही महिन्यांतच मेन इन ब्लूला त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी सामना करण्याची परवानगी दिल्याबद्दल अनेक विरोधी नेत्यांनी सरकारवर हल्ला केला आहे. ज्यामध्ये २५ …

Read More »