Tag Archives: congress

राहुल गांधी यांचा सवाल, देश राज्यघटनेने की मनुस्मृतीने चालणार…सावरकरांच्या भूमिकेशी प्रतारणा संसदेतील राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षानिमित्त आयोजित चर्चेत राहुल गांधी यांचा सवाल

आधुनिक भारताच्या नियमांची पुस्तिका म्हणजे राज्यघटना ही असून ही राज्यघटना संत बसवेश्वर, तथागत गौतम बुद्धा, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या विचाराच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेले हे एक हस्तावेज आहे. मात्र सावरकर हे हिंदूंसाठी मनुस्मृती हाच कायदा असल्याचे सांगितल्याचे एक कोट सांगत सत्तेवर बसलेले सत्ताधारी नेहमी सावकर यांचे उदोउदो करत असतात …

Read More »

राजनाथ सिंह यांची काँग्रेसवर टीका मात्र महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यावरून संसदेत गदारोळ संसदेचे कामकाज अर्धातासासाठी तहकूब

लोकसभेत १३ आणि १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या संविधानावरील चर्चेची सुरुवात आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाने झाली. यावेळी बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, संविधान ही कोणत्याही एका पक्षाची देणगी नाही असे सांगत काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका केली. दरम्यान, भाजपाच्या नेत्यांनी शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केल्याने विरोधकांच्या विरोधानंतर राज्यसभा …

Read More »

प्रियांका गांधी यांचा भाजपाला सवाल, सगळी जबाबदारी पंडीत नेहरू यांची तर मग तुमची काय राज्यघटना ही सुरक्षा आणि न्यायाचे कवच

मागील वर्षापासून देशाच्या स्वातंत्र्यापासून ते स्वातंत्र्यानंतर या देशातील जनतेच्या विकासासंदर्भात ज्या व्यक्तीने घेतलेली भूमिका आणि त्याने केलेली कामे जनतेला माहित आहेत. त्या व्यक्तीने देशाच्या भविष्यासाठी आयआयएम, आयआयटी, एम्स, गेल, भेल यासारख्या असंख्य संस्था उभ्या केल्या त्या व्यक्तीचे नाव पुसून टाकण्याचे काम आणि त्यांचे नाव कायमच्या विस्मरणात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात येत …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, परभणीत संविधानाची विटंबना करणाऱ्यांना कठोर शासन करा परभणीत आगडोंब उसळत असताना भाजपा युती सरकार बेफिकीर, मंत्रीपदे व मलईदार खात्यांसाठी मारामारी

परभणीत भारतीय राज्यघटनेची विटंबना करण्याची घटना अत्यंत निषेधार्ह आहे. हा प्रकार महामानव डॉ बाबासाहेब आंबडेकर व संविधानाला मानणा-या कोट्यवधी लोकांचा घोर अपमान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे, असा संतप्त सवाल करून संविधानाची विटंबना करणा-यांच्या मुसक्या आवळून त्यांना कठोर शासन करा, अशी मागणी …

Read More »

महाराष्ट्रात भाजपाचे ऑपरेशन कमळ? चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, अनेक असंतुष्ट लोक आमच्या संपर्कात आहेत

महाविकास आघाडीला (मविआ) दणका देण्याची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे. मविआचे अनेक खासदार आणि आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केला. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे अनेक खासदार-आमदार असंतुष्ट आहेत, ते आपल्यासमोर अस्वस्थता व्यक्त करत आहेत, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस… रात्रीच्या अंधारात मते वाढवून लोकशाहीचा खून, निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा लौकिक असलेल्या भारतातील लोकशाहीला संपुष्टात आणण्याचे पाप केले जात आहे. भाजपा सरकार सर्व यंत्रणांच्या माध्यमातून लोकशाही पायदळी तुडवत असून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतांवर दरोडा टाकला जात आहे. देशात विरोधी पक्षच नको अशी भाजपची भूमिका आहे त्यामुळेच हे सर्व सुरु असून महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस झाले …

Read More »

मोदी-अदानी भाई-भाईः काँग्रेसची संसदेच्या आवारात निदर्शने प्रियांका गांधी यांनी आणली मोदी-अदानी भाई भाई लिहिलेली बॅग

गौतम अदानी आणि अदानी कंपनीवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानीच्या विरोधात चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत काँग्रेसने चौकशीची मागणी लावून धरली. तसेच यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदी-अदानी भाई भाऊ असे लिहिलेली एक बॅग यांनी आणली. त्यावेळी ही बॅग प्रियंका गांधी यांनी हातात घेत सर्वांना दाखविली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी …

Read More »

खा वर्षा गायकवाड यांची मागणी, कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा सरकारने मृतांच्या नातेवाईकांना जाहिर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी, प्रत्येकी २५ लाख द्या

कुर्ला रेल्वे स्टेशन जवळ सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बसच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. बसचा ब्रेक फेल झाला होता की आणखीन काही कारण असो, या दुर्घटनेतील सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला करावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. पुढे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, …

Read More »

नाना पटोले यांचा निर्धार, बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे जनआंदोलन… मारकडवाडीतील गावकऱ्यांवर जबरदस्तीने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या

भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. यामध्ये ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपले मत कोणाले गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन …

Read More »

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्यावर मंड्या गावी होणार अंत्यसंकार घरीच ९२ व्या वर्षी झाला मृत्यू

माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे मंगळवारी (१० डिसेंबर २०२४) सकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ९२ वर्षीय एस एम कृष्णा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. तसेच त्यांना विस्मृतीचा आजारही जडला होता. एस एम कृष्णा यांनी त्यांच्या संपूर्ण राजकिय कारकिर्दीत परराष्ट्र …

Read More »