Tag Archives: congress

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, माणिकराव कोकाटे यांची राज्यपालांनी हकालपट्टी करत आमदारकी रद्द करावी कोकाटे मुंडे प्रकरणात सत्ताधारी पक्षाकडून भ्रष्ट मंत्र्यांचा बचाव, सत्ताधारी व विरोधकांना वेगळा न्याय का?

रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा देऊन आदर्श घालून दिला आहे. पण आत्ताच्या सत्ताधारी भाजपाने नैतिकतेला हरताळ फासला आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक प्रकरणी न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा होता किंवा सरकारने त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, पण तसे झाले …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, भ्रष्ट मंत्री माणिकराव कोकाटे व धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बरखास्त करा सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनलीय

भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांची टोळी बनली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचे उघड झाले आहे. आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. या दोघांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे, अशी मागणी …

Read More »

सतेज बंटी पाटील यांचा इशारा, शक्तीपीठ महामार्ग विरोधात १२ मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा शक्तीपीठ बाबत सरकारची दुटप्पी भूमिका, शक्तीपीठ विरोधात न्यायालया ऐवजी रस्त्यावरची लढाई लढू

शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा असून, हा महामार्ग रद्द व्हावा या मागणी करिता १२ मार्चला विधानसभेवर भव्य मोर्चा काढणार असल्याचं विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांनी जाहीर केलं. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत ते बोलत होते. शक्तीपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी बैठक, विधान परिषदेतील …

Read More »

काँग्रेसच्या त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी नाहीच, थेट तारीख १९ मार्चला मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त निवड समितीतप्रकरणी दाखल केली होती याचिका

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांची मुदत संपल्याने त्यांना नुकताच निरोप देण्यात आला. मात्र मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्या सेवा निवृत्तीच्या दिवशीच संध्याकाळीच निवड समितीची बैठक पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत लावण्यात आली. निवड समितीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. मात्र यासंदर्भातील …

Read More »

अतुल लोंढे यांचा पलटवार,… आधी भाजपाच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींचे ट्विट नीट पहावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी

शिवजयंतीच्या निमित्ताने राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटवरून भाजपाचे नेते जो आकांडतांडव करत आहेत त्याआधी त्यांनी त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीट नीट पहावे आणि नंतर बोलावे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान जर कोणी केला असेल तर भाजपानेच वारंवार केला असून त्यांनीच माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ची शिकवण व प्रेरणेने वाटचाल करणार भाजपा सरकारची अवस्था दिल्लीत मुजरा, गल्लीत गोंधळ सारखी, डान्सबार पुन्हा सुरु करण्यास काँग्रेसचा विरोध.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शुत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास …

Read More »

काँग्रेसची मागणी, मुख्य निवडणूक आयुक्तांची निवडीची प्रक्रिया पुढे ढकला निवडीच्या कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात आव्हान

मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) यांची निवड पुढे ढकलण्याची विनंती काँग्रेसने सोमवारी केंद्र सरकारला केली. निवडणूक आयोगाच्या निवड समितीमध्ये मुख्य न्यायाधीशांच्या जागी गृहमंत्र्यांची नियुक्ती करण्याच्या केंद्राच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयाचा हवाला देत काँग्रेसने हा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल …

Read More »

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार सेवानिवृत्तीच्या भाषणात, आरोपांचा वाढता ट्रेंड अयोग्यरित्या दोषी ठरविले जात असल्याचा विरोधकांचे नाव न घेता आरोप

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, ज्यांचा निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ मंगळवारी संपत आहे, त्यांनी निवडणुकीदरम्यान “दिशाभूल करणाऱ्या कथनकांचा वाढता ट्रेंड” असल्याचा इशारा दिला आणि म्हटले की निवडणूक निकाल स्वीकारण्यास तयार नसलेल्यांकडून संस्थेला “अयोग्यरित्या दोषी ठरवले जाते”. त्यांच्या निरोप भाषणात, कुमार यांनी असे प्रतिपादन केले की संस्थांवर “प्रेरित हल्ले” केल्याने जनतेचा …

Read More »

अहमद पटेल यांचे चिरंजीव फैसल पटेल यांची काँग्रेसपासून फारकत राजकीय प्रवासातील वैयक्तीक दुःख आणि निराशेमुळे काम थांबविण्याचा निर्णय

कधी काळी काँग्रेसचे प्रमुख रणनीतीकार आणि बॅकरूम स्ट्रेटेजिस्ट राहिलेले आणि सोनिया गांधी यांचे प्रमुख सल्लागार राहिलेल्या अहमद पटेल यांचा मुलगा फैसल पटेल यांने काँग्रेसपासून फारकत घेत काँग्रेसचे काम थांबविण्याचा निर्णय एक्स या सोशल मिडीवरून जाहिर केला. तथापि, दिवंगत अहमद पटेल यांचे पुत्र फैसल यांनी त्यांच्या राजकीय प्रवासातील वैयक्तिक दुःख आणि …

Read More »

नवनियुक्त प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या मंगळवारी पदग्रहण सोहळा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता सोहळा

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील. या कार्याक्रमात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय …

Read More »