राज्यातील भाजपा महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजपा सरकारच्या …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, चामड्याच्या वस्तूंवरील अन्यायकारक जीएसटी तात्काळ कमी करा लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली मागणी
भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेल्या महागाई व नोटबंदीने लघु, छोटे व मध्यम व्यवसायांचे कंबरडे मोडले आहे, त्यातच जीएसटीमुळे उरला सुरला उद्योगही शेवटच्या घटका मोजत आहे. सर्वच वस्तूवर जीएसटी लावून सरकार छोटे उद्योग देशोधडीला लावत आहे. चामड्याच्या वस्तूंवर जीएसटी वाढवून भाजपा सरकाने या उद्योगाला मोठ्या संकटात टाकले आहे. सरकारने हा वाढवलेला जीएसटी तात्काळ …
Read More »वर्षा गायकवाड यांची टीका, ८० कोटी लोकांना मोफत धान्य, भाजपा सरकारने कोणाचा विकास केला? मागील ११ वर्षात देशात गरिब व श्रीमंत दरी वाढली; भाजपा सरकारचा विकास फक्त मुठभर श्रीमंतांसाठी
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या माध्यमातून देशात ८० कोटी तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७६.३२% आणि शहरी भागात ४५.३४% लोकसंख्या लाभार्थी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गरिब लोक आहेत तर मग ११ वर्षात कोणाचा विकास झाला? असा प्रश्न उपस्थित करत भाजपा सरकारच्या काळात फक्त मुठभर लोकांचा विकास झाला असून बहुसंख्य जनता ही गरिबीचे जीवन जगत आहे, विकासाच्या फक्त …
Read More »शक्तीपीठ रद्द करा, अन्यथा मोजणी अडवणार शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर निर्धार: मंत्र्यांच्या घरावर मोर्चे काढणार
आमच्या घराची राखरांगोळी करून सरकार शक्तीपीठ महामार्गाचा घाट घालत असेल तर तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आमच्या पोराबाळांच्या भविष्याचा विचार करून सरकारने शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अन्यथा मोजणी अधिकाऱ्यांना शेतात पाय ठेवू देणार नाही, मोजणी अडवणारच असा निर्धार १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावरील विराट मोर्चात केला. प्रत्येक …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप,…महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव धार्मिक विष कालवणाऱ्या नितेश राणेंना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा आहे का?, नसेल तर तात्काळ हकालपट्टी करा
महाराष्ट्राला महान साधू संत व महापुरुषांचा जाज्वल्य इतिहास आहे. पण एका विशिष्ट विचारसरणीचे लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवून, इतिहासाचे विद्रूपीकरण करून वातावरण दुषीत करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले. महाराजांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक …
Read More »नाना पटोले यांची मागणी, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करु पाहणाऱ्या मंत्र्याला तंबी द्या मटनाच्या दुकानांना सर्टिफिकेट देण्याचा मंत्र्याचा नवा धंदा आहे का? त्यांना कोणी अधिकार दिला?
कोणते मटन कोणत्या दुकानातून व कोणाकडून घ्यावे अशा प्रकारचे फतवे मंत्री काढत असतील तर ते योग्य नाही. मंत्रीच अशा पद्धतीने धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचे काम करत आहेत, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल व ते महाराष्ट्रासाठी योग्य नाही. दुकानदारांना सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार मंत्र्याला कोणी दिला? हा नवीन धंदा स्वतःचे खिसे …
Read More »मणिपूर प्रश्नी पंतप्रधान मोदींवर टीकाः काँग्रेस खासदार गोगई आणि अर्थमंत्री सीतारामण यांच्यात खडाजंगी अर्थसंकल्पातील तरतूदींवर न बोलता इतर विषयांवर वाद
पंतप्रधान मोदी सतत सभागृहाला त्यांच्या उपाययोजनांबद्दल माहिती देत असल्याबद्दल अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विधानाला उत्तर देताना, काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, त्यांना पंतप्रधान मोदींचा खूप आदर आहे, परंतु त्यांनी सरकारवर आरोप केले आहेत, परंतु माजी पंतप्रधानांविरुद्ध टिप्पणी केली आहे. या विधानाला उत्तर देताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाले की, विरोधकांनी …
Read More »राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा म्हणतात, फेव्हरिट अँक्टर नरेंद्र मोदी मोदी हे नेते नाहीत तर अभिनेते
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अलीकडेच नरेंद्र मोदींना त्यांचा आवडता अभिनेता कोण आहे या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर, विरोधकांनी पंतप्रधान आणि भाजपा दोघांवरही निशाणा साधण्याची संधी साधली आहे. रविवारी रात्री जयपूर येथे आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी (आयफा) पुरस्कार सोहळ्यात पत्रकारांशी संवाद साधताना सीएम शर्मा यांनी ही टिप्पणी केली. त्यांच्या आवडत्या अभिनेत्याबद्दल …
Read More »पाच वर्षांत जाहीरनाम्यातील सर्व संकल्प महायुती सरकार पूर्ण करणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही
विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये केलेले सर्व संकल्प येत्या पाच वर्षांत महायुतीचे सरकार पूर्ण करेल, तसेच कोणतीही योजना बंद होणार नाही अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी मंगळवारी दिली. अमरावती जिल्हा शिक्षक महासंघ अध्यक्ष चंद्रशेखर भोयर यांच्यासह राज्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भाजपा प्रवेश प्रसंगी बावनकुळे बोलत …
Read More »नाना पटोले यांची टीका, महायुतीने जनतेला फसवल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्ट सराकरने शेतकरी, लाडक्या बहिणी, बेरोजगारांना फसवले
महायुती सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी कोणताही दिलासा नाही. महायुतीने निवडणुकीत दिलेले एकही आश्वासन अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे महायुतीने जनतेला फसवल्याचे स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली. अर्थसंकल्पावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, महायुतीने राज्याची अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातूनच …
Read More »
Marathi e-Batmya