राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना पत्र लिहीत मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले. राज्यातील नैसर्गिक …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची मागणी, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त टोलमाफ करा टोलमाफीबाबत प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर लाखो बौद्ध अनुयायी देशभरातून नागपूरच्या दीक्षाभूमी येथे दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान बौद्ध अनुयायांना टोलमाफी देण्याची मागणी केली. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार उत्तर महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला. जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बीएसएनएलच्या स्वदेशी निर्मित ‘४जी’ सेवेचे लोकार्पण बीएसएनएलच्या स्वदेशी '४जी' सेवेमुळे महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात मिळण्यात मदत होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या ‘४जी’ तंत्रज्ञानाधारित सेवेचे लोकार्पण झारसुगुडा ओडिशा येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे झाले. याअंतर्गत बीएसएनएलच्या ९२ हजार ६३३ टॉवर्सचे लोकार्पण झाले असून, यापैकी ९ हजार ३० टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत ‘४जी’ तंत्रज्ञान पोहोचणार असून …
Read More »उद्धव ठाकरे यांचे टीकास्त्र, भाजपाला सरकार चालवता येत नाही हा डोळस विश्वास पूरग्रस्तांसाठी हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे, पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांना ५० हजार कोटी रूपये द्यावेत
राज्यातील भाजपाला प्रशासन कळत नाही, त्यांना सरकार चालविता येत नाही. जे काही राज्यात सुरु आहे ते दिल्लीच्या बळावर सुरु आहे. त्यामुळे माझा अंध नव्ह तर डोळस विश्वास असल्याची टीका शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर सर्व पापे धुतली जातात, …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस गेले पूरग्रस्तांसाठी मदत मागायला, येताना मात्र मेट्रो, पोलाद सिटी, जमीनीवर चर्चा पंतप्रधान मोदींची घेतली भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत, निवेदन सादर
मराठवाडा प्रांतातील जवळपास सर्व जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित झाले. तसेच त्यांची जनावरंही बुडून मरण पावली तर काही वाहुन गेली.तसेच अनेक गावं आणि वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचे संसार उघड्यावर पडल्याचे चित्र पूर्ण महाराष्ट्राने पाहिले. त्यातच राज्याच्या तिजोरीत पैशाचा तुटवडा निर्माण झाला आहे. …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, मुख्यमंत्र्यांना पूरग्रस्तांपेक्षा सुरजागडच्या खाण मालकाची जास्त काळजी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे
महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे. मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्थ केले आहे. शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण …
Read More »महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे एकूण ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित २ हजार २१५ कोटींचा निधी मंजूर
१७ ते २६ सप्टेंबर या कालावधीतील भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यात अतिवृष्टी झाली. या कालावधीत जवळपास ३१ लाख ६५ हजार शेतकरी बाधित झाले. नेमक्या याच कालावधीत अतिवृष्टीबरोबरच मराठवाड्यातील बहुतांष भागात पूरस्थिती निर्माण झाली. तसेच सोलापूरातही पुर परिस्थिती निर्माण झाली. या ३१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम जवळपास …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, आमदार फोडण्यासाठी पैसै पण शेतकऱ्यांसाठी नाही केंद्र सरकारकडून पैसे विशेष पॅकेज आणा
राज्यातील परिस्थिती अतिवृष्टी व पुरामुळे अत्यंत विदारक झाली आहे, खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे परंतु प्रशासनाचा एकही अधिकारी पाहणी करण्यासाठी फिरकला नाही. दसरा, दिवाळी सण जवळ आले आहेत, मुख्यमंत्री फक्त आकडेवारी फेकत आहेत, पण ठोस निर्णय काही घेत नाहीत. ओला दुष्काळ आहे हे स्पष्ट दिसत असतानाही सरकार त्याकडे डोळेझाक करत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार
राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने नद्यांना पूर आला आहे. पिकांचे नुकसान झाले असून जमीन खरडून गेली आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »
Marathi e-Batmya