एकट्या गडचिरोली जिल्हयात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारकडे केली आहे. अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्हयातील …
Read More »औरंगाबाद नामांतराचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय उच्च न्यायालयात एक ऑगस्टला होणार उच्च न्यायालयात सुनावणी
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या अखेरच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात सत्तांतर होत बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने उध्दव ठाकरेंच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देत त्यासंदर्भातील निर्णय नव्याने घेत तो राज्य …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पोलिसांच्या घरांसाठी शॉर्ट, मिडीयम आणि लॉंग टर्म… पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा
पोलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असून पोलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण, सिडको या सर्वं विभागानी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पोलिस गृहनिर्माण या विषयासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारच्या आजच्या कॅबिनेट बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत झाला निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या तिसऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ११ हून अधिक निर्णय घेतले. त्यातील काही निर्णय खालील प्रमाणे… ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता औरंगाबाद जिल्ह्यातील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजना प्रकल्पास ८९०.६४ कोटींच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेव आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली. …
Read More »उध्दव ठाकरे यांचा बंडखोरांना टोला, हा जो पालापाचोळा आहे ते म्हणजे… ठाणेकर जनता सुज्ञ आहे ते निवडणूकीत दाखवून देतील
ठाणेकर हे सुज्ञ असून शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता मिळाली त्या ठाण्यातच काय तर महाराष्ट्रभरातील लोक निवडणुकीचा वाटत पाहत असून निवडणुकीच्या निकालानंतर बंडखोरांचा हा पालापाचोळा उडून जाईल असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंनी लगावला आहे. इतकचं नाही तर त्यांनी राजकीय पक्षांनी युती करताना करार करुन तो जनतेसमोर ठेवायला हवा असा कायदा बनवण्याची मागणीही …
Read More »उध्दव ठाकरे यांचा आरोप, त्यांना शिवसेना आणि ठाकरे वेगळे करायचेत… ते दुसऱ्यांचे आदर्श पळवत स्वत:चे म्हणून दाखवायचेत
शिवसेनेचे पक्षप्रमुख असतानाही राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून अनपेक्षितरित्या उतरावे लागल्यानंतर पहिल्यांदाच उध्दव ठाकरे यांनी मुलाखतीद्वारे व्यक्त झाले. त्याचबरोबर शिवसेनेत झालेल्या बंडाळीबरोबरच भाजपावरही त्यांनी टीका केली. शिवसेनेतील बंडखोर गट मुद्दाम बाळासाहेब ठाकरेंच्या नावाबद्दल संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला. बंडखोरांचं खरोखर काही कर्तृत्व असेल तर त्यांनी त्यांच्या आई-वडिलांचे फोटो …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधानांना भेटून करणार
सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या शपथग्रहण समारंभानंतर महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी …
Read More »अजित पवार म्हणाले; संभाजी राजांच्या स्मारकाला स्थगिती, ते काय घरचं काम आहे… विकास कामाला स्थगिती देण्यावरून साधला निशाणा
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जावून शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारने मंजूरी दिलेल्या निधी वाटपासह विकास कामांच्या अमंलबजावणी दिली. विशेष म्हणजे ही स्थगिती देताना २०२१ या वर्षाच्या सुरुवातीपर्यतच्या कामांना स्थगिती दिली. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलीच टीका केली. राष्ट्रवादी …
Read More »अजित पवार यांचा सवाल, बहुमताचे सरकार आहे ना, मग अधिवेशन का घेत नाही? शिंदे-फडणवीस सरकारवर उठविली टीकेची झोड
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोरांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापनापन्न झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने आमचे सरकार हे बहुमताचे आणि जनतेचे सरकार असल्याचा दावा करत आहेत. मात्र महिना …
Read More »संजय राऊत म्हणाले, आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टीकणार नाहीत.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर
राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असे भाजपाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर भाजपाची पहिलीच प्रदेश कार्यकारणीची बैठक पनवेल येथे पार पडली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हणाले की, त्यांचे आणि राष्ट्रवादीचे आधीच ठरले …
Read More »
Marathi e-Batmya