मुंबईः प्रतिनिधी शरद पवार (Sharad Pawar) यांनी खाजगी उद्योगांना(Privet Businessman) शेती क्षेत्रात (Farming Sector) येण्यास कधीही प्रोत्साहन देत राज्यातील बाजार समित्यांचे (APMC) अधिकार केंद्राकडे हस्तांतरीत केले नाहीत. मात्र केंद्र सरकारने शेतीविषयक आणलेल्या तीन विधेयकांपैकी २ विधेयकात राज्यांना अधिकारच दिले नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक …
Read More »केंद्राचा शेतकरी कायदा पहिल्यांदा महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने मंजूर केलेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
मुंबईः प्रतिनिधी सध्या केंद्राने मंजूर केलेल्या शेतकरी कायद्याच्या (Farmers law) विरोधात आंदोलन सुरु आहे. मात्र हा कायदा सर्वात आधी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या (INCCongress-Ncp) आघाडी सरकारने मंजूर केला होता. तसेच केंद्रात कृषीमंत्री असताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व राज्य सरकारांना पत्र पाठविल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र …
Read More »पराभूत होवूनही भाजपाची शिवसेनेवर टीका शिवसेनेला भोपळा मिळाला : चंद्रकांत पाटील; शिवसेनेने आत्मचिंतन करावे : देवेंद्र फडणवीस
मुबंई: प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणूकीत महाविकास आघाडीला चार, भाजपाला एक आणि अपक्ष एका जागेवर निवडूण आले. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, तिन्ही पक्ष एकत्रित लढल्याने त्यांना विजय मिळाला आणि हे स्वाभाविक होते. माझे त्यांना नेहमी आव्हान राहील की त्यांनी एकटे लढून दाखवा. मात्र …
Read More »महाराष्ट्राच्या सत्तेची दिवास्वप्ने पाहणाऱ्या फडणवीसांचा भ्रमाचा भोपळा फुटला ...आणि रॉबर्टसेठचा दणदणीत पराभव झाला!:सचिन सावंत
मुंबईः प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारला भारतीय जनता पक्ष हा अमर, अकबर, अँथनीचे सरकार म्हणून हिणवत होता. अमर, अकबर, अँथनी जसा हिट चिटपट होता तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे कॉम्बिनेशन हिट झाल्याचे विधान परिषदेच्या आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. या अमर, अकबर, अँथनीनेच रॉबर्ट शेटचा दणदणीत पराभव …
Read More »भाजपाच्या दोन मातब्बर नेत्यांच्या मतदारसंघात घुसली महाविकास आघाडी फडणवीस, पाटील यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा गड झाला खिळखिळा
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील ५ जागांकरीता झालेल्या निवडणूकांत मध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मतदारसंघातील जागा राखता आल्या नाहीत. त्यामुळे या दोन नेत्यांच्या नेतृत्वाबद्दल भाजपामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पुणे पदवीधर मतदारसंघातील एक जागा भाजपाकडे होती. मागील काही वर्षापासून या मतदारसंघातून …
Read More »चर्चेपासून पळ काढण्यापेक्षा दोन आठवड्यांचे अधिवेशन घ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांचे, अनेक समाजाच्या समस्या, मराठा समाजाच्या समस्यांवर चर्चा होणे आवश्यक असताना सरकार केवळ दोन दिवसाचे अधिवेशन घेवून अधिवेशनातील चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका करत दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याऐवजी दोन आठवड्यांचे घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत …
Read More »राज्य विधिमंडळाचे अधिवेशन या दोन दिवसांमध्ये होणार विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
मुंबईः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन ज्या पध्दतीने घेण्यात आले. त्याच पध्दतीने हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोनच दिवस चालणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली. या बैठकीला विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे …
Read More »मोटाभायला दिली, मूळ भाजपातील आमदारांसह बाहेर पडणाऱ्यांची यादी कुलाब्यातील माजी आमदारांसह अन्य आमदारांचा समावेश
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्तांतर होवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाला. मात्र या वर्षभरात सत्तेविना राहणे मूळ भाजपा आमदारांसह काँग्रेस-राष्ट्रवादीमधून भाजपावासी झालेल्यांना जीवावर आले असून काही तरी करा अन्यथा आम्ही पक्षांतर करू असा इशारा बाहेर पडू इच्छीणाऱ्या ४० आमदारांनी दिला असल्याने त्या ४० …
Read More »शेतकऱ्यांच्या लोकचळवळीची चौकशी करणारे निर्लज्ज सरकार! आरे कारशेडप्रमाणेच यातही सत्यच बाहेर येईल : केशव उपाध्ये
मुंबई : प्रतिनिधी स्थगिती, चौकशी, दमनकारी नीती याच्या बाहेर न निघालेल्या सरकारकडून आणखी काय अपेक्षा करणार? महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत निष्क्रिय सरकारने आता आणखी एका चौकशीची घोषणा करून शेतकर्यांच्या लोकचळवळीचा एकप्रकारे अपमानच केला आहे. तथापि सरकारने हवी ती चौकशी करावी, त्यातून सत्यच बाहेर येईल, असे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी …
Read More »फडणवीसांच्या अडचणीत वाढ जलयुक्त शिवारच्या चौकशीसाठी समिती जाहीर सहा महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबईः प्रतिनिधी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा ठपका कॅगने ठेवला. त्यामुळे या योजनेची चौकशी करण्याची घोषणा मागील पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीने केली होती. त्यानुसार या योजनेच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून या अहवाल सादर करण्यासाठी समितीला …
Read More »
Marathi e-Batmya