मालवण येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळून पडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यातील महायुतीच्या विरोधात जोडे मारो आंदोलन आज करण्यात आले. या आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात शिवद्रोही, खोके सरकार, गद्दारांचे सरकार अशा घोषणा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला …
Read More »नागपूरात लाडकी बहिणीच्या मानधनाबरोबर ई-पिंक रिक्षाचे वाटप आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार-मुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसह इतर विविध योजनांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्याचा राज्य सरकारचा निर्धार आहे. महिलांना आर्थिक स्वावलंबी करतांनाच त्यांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असून त्यासाठी सर्व पातळ्यांवर कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी नि:संदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूर येथे ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या लाभ …
Read More »मंत्री तानाजी सावंत मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनातलं बोलले….. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांचे वक्तव्य
कॅबिनेटला अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं व बाहेर आल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य शिंदे सरकारचे मंत्री तानाजी सावंत यांनी करत अप्रत्यक्ष महायुती सरकारमध्येही सार काही आलबेल नसल्याचे स्पष्ट केले. मंत्री तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, अजित पवार …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, महाराजांचा नवा पुतळा उभारणार, समितीची स्थापना वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत निर्णय
मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनिषा …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली, अखेर माफी त्याच ठिकाणी दुसरा पुतळा उभारणार
मालवणमधील शिवाजी महाराज पुतळा आठ महिन्यातच कोसळून पडला. या पुतळा प्रकरणावरून राज्यातील सर्व राजकिय पक्षांनी सत्ताधाऱांना धारेवर धरायला सुरुवात केली. तसेच या घटनेवरून राजकिय कुरघोडी नाट्याला सुरुवातही झाली. यावरून अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रसारमाध्यमांशी बोलताना माफी मागितली. मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …
Read More »जयंत पाटील यांचा आरोप, राज्यात कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हत्या
तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांची हत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात घडली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला जोरदार टीका केली आहे. राज्यात कणा नसलेले सरकार आहे हे सिद्ध होतंय असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी केला. आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया …
Read More »शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी कंत्राटदार-स्ट्रक्चरल सल्लागारांच्या विरोधात गुन्हा दाखल सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखल केला गुन्हा
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जबाबदार असलेल्या कंत्राटदार आणि स्ट्रॅक्चरल सल्लागाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केल्यानंतर आठ महिन्यांनी सोमवारी (२६ ऑगस्ट २०२४) कोसळला. बांधकामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या तक्रारीनंतर, स्ट्रक्चरमध्ये …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, पुतळा पडल्याप्रकरणी अधिकाऱ्यांना दोषी ठरवणारे सरकार…. शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे. राज्य सरकारमधील मंत्री आता आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे दैवत आहेत आणि आमच्या दैवताचा अपमान कदापी …
Read More »आदित्य ठाकरे यांचा निर्धार, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही राज्यात मशाल आगामी विधानसभा निवडणुकीत पेटवायची
‘पुढील ५० वर्ष ठरवरणी ही निवडणुक आहे . महायुतीवाले शिवसेना व जनतेला घाबरले आहे. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि या पैठणला मद्यपान केलेल्या लोकप्रतिनिधीवरील राग मतदानातून प्रकट करा असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बिकट निवडणुक आगामी विधानसभा आहे. राज्यातीस आगामी विधानसभेत …
Read More »राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार: योजनेचा विस्तार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. राज्यात शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी योजना २.० राबविण्यात येत …
Read More »
Marathi e-Batmya