Tag Archives: eknath shinde

तुकाराम मुंढे यांच्याकडे आता असंघटीत कामगारः वर्षभरात पुन्हा बदली राज्यातील सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मागील काही वर्षापासून सततच्या बदल्यांमुळे चर्चेत असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची मंगळवारी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली. वर्षभरात बदली झालेले तुकाराम मुंढे यांना असंघटित कामगार विभागाच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहे. राज्याच्या कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त म्हणून अमगोथु श्री रंगा नायक यांची …

Read More »

उद्योग मंत्र्यांची शिफारस महिला शिक्षिकेला एमएसआरडीसीत प्रतिनियुक्ती द्या मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभाग लागला कामाला

राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या विविध असे मिळून जवळपास ३६ खाती आहेत. तर जवळपास विविध स्थानिक स्वराज्य संस्था आणि अंगीकृत महामंडळे आहेत. या सर्व विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी त्या त्या विभागाची एक नियमावली आहे. त्या नियमाच्या आधारेच संबधिक कार्यालयांची कामे, कर्मचारी-अधिकाऱी यांच्या बदल्या, प्रतिनियुक्त्या केल्या जातात. मात्र एका महिला शिक्षिकेने वैद्यकीय …

Read More »

संजय निरूपम यांची मागणी,…राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी माफी मागावी वृत्तपत्राने खोट्या बातमीची कबुली दिल्याने उत्तर-पश्चिम मतदार संघातील सत्य अखेर समोर

लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातील मतमोजणीबाबत प्रसिद्ध केलेली बातमी खोटी असल्याचे मिड डे या इंग्रजी वृतपत्राने कबुली देत माफी मागितली आहे. याबाबत आक्रमक होत शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या वृत्तपत्राचा आधार घेत सोशल मिडियावर फेक न्यूज व्हायरल करणाऱ्या राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठा पेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

१९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला अपघातग्रस्तांना मदतीचा हात विक्रोळीजवळील अपघातग्रस्तांना ताफ्यातील गाडी देऊन गोदरेज रुग्णालयात केले दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून रस्त्यावर अपघातग्रस्तासाठी ते देवदूत ठरले. काल रात्री दीड वाजता पूर्व द्रुतगती महामार्गावरून ठाण्यातील आपल्या घराकडे परतत असताना विक्रोळीनजीक दोन दुचाकीस्वारांचा अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून या अपघातग्रस्त नागरिकांची चौकशी करून त्यांना मदतीचा हात दिला. …

Read More »

विधानसभेच्या तोंडावर मुख्यमंत्री शिंदे यांचे वारकरी दिंड्याना वीस हजार रुपयांचे अनुदान वारकऱ्यांच्या मागणीनुसार दौंडचा प्रस्तावित कत्तलखाना रद्द, वारकऱ्यांना अपघात गटविमा, वाहनांना टोल माफी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीतील भाजपा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक ते दिड टक्का मतदान कमी झाल्याची माहिती भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूकीला अद्याप तीन ते चार महिन्यांचा अवकाश असला तरी कमी झालेल्या मतांची टक्केवारी …

Read More »

वक्फ मंडळाला निधी देण्यावरून राज्य सरकारने केला खुलासा संयुक्त संसदीय समितीच्या सूचनेनुसारच वक्फ मंडळाला निधी देण्याचा निर्णय

देशातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत एका विशिष्ट धर्माच्या लोकांना लक्ष्य करत धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच निवडणूकीच्या प्रचाराच्या निमित्ताने विविध विशिष्ट धर्मियांना लक्ष्य करण्याचा प्रयत्नही केला गेला. मात्र यामुळे देशातील दोन समाजात सरळ दोन तट निर्माण होत आहेत याकडे केंद्रातील सत्ताधारी पक्षाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यातच …

Read More »

महायुती सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन, अर्थसंकल्प सादर होणार राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत

देशातील लोकसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्याचा निकालही जाहिर झाला. मात्र ऐन मार्च महिन्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने त्या महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प सादर करता आला नाही. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात अर्थसंकल्प सादर करणार असल्याची माहिती यापूर्वीच अजित पवार यांनी दिली होती. त्यातच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, औद्योगिक सुरक्षेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे कुठे ? डोंबिवलीनंतर नागरपूरातील कंपनीतही स्फोट

गेल्यावर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा जीव गेला होता. डोंबिवली MIDC मधून दर आठवड्याला स्फोट होवून अपघात होण्याच्या बातम्या येत आहे. या घटना सतत घडत असताना सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. पुढे …

Read More »

वर्सोवा खाडीजवळील दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट जेसीबी ऑपरेटर राकेश यादव यांच्या कुटूंबियांना ५० लाखांची मदत तर कुटूंबातील एका सदस्याला मिळणार नोकरी

ससूनघर गावापाशी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची महिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगाराचा शोध घेण्यासाठी सैन्यदल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने संयुक्त बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. वर्सोवा खाडीनजीक एमएमआरडीएच्या माध्यमातून एल अँड …

Read More »