आदित्य ठाकरे यांचा निर्धार, महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही राज्यात मशाल आगामी विधानसभा निवडणुकीत पेटवायची

‘पुढील ५० वर्ष ठरवरणी ही निवडणुक आहे . महायुतीवाले शिवसेना व जनतेला घाबरले आहे. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि या पैठणला मद्यपान केलेल्या लोकप्रतिनिधीवरील राग मतदानातून प्रकट करा असे आवाहन शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात बिकट निवडणुक आगामी विधानसभा आहे. राज्यातीस आगामी विधानसभेत मशाल पेटवायची असल्याचानिर्धार आदित्य ठाकरे यांनी पैठणच्या सभेतून व्यक्त केला.

पैठण आणि वैजापूर येथे महाराष्ट्र स्वाभिमान येथे पार पडली. या स्वाभिमान सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

आदित्य ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना म्हणाले की, देशात कांद्याची निर्यात बंदी विरोधात शिवसेनेने आवाज उठविला होता . केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असून त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याची त्यांनी मागणी केली होती . पण त्यांनी तसं केलं नाही . भाजपाला जनतेनी त्याची जागा दाखवली आहे . शेत नुकसान भरपाईचे पंचनामे करुन सुध्दा राज्य सरकारने नुकसान भरपाई दिली नाही .उद्धव साहेब यांनी घोषित केलेल्या प्रमाणे कर्जमुक्ती केली होती . पण यांच्या कृषी कृषिमंत्र्यांना महाराष्ट्रतील जनतेने एकदाही बघितले नाही असं सांगितले

शेतकऱ्यांवर मागील दोन वर्षात मोठे संकट आले तरीही मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही. सतत्त्याने आम्ही शिवसैनिक शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेलो असतो. पिक विमा, अनुदान आमच्या सरकारच्या काळात मिळवून दिले. भाजपाला कांदा निर्यात बंदीचा मतदान मध्ये नुकसान होत असल्याने बंदी उठवली गेली. भाजपचा एकही आमदार उद्योग आणल्याचे बोलत नाही . भाजप महाराष्ट्र द्वेशी आहे, महायुतीचे एकही आमदार तरुणांना रोजगार मिळवून दिला असे म्हणु शकत नाही . पुण्यात तीन दिवस स्पर्धा परीक्षाचे अभ्यास करणारे विद्यार्थी आंदोलन करत होते, पण लक्ष दिलं नाही . त्यामुळे येणारी निवडणूक आपल्या स्वाभिमानासाठी आहे . असं आदित्य ठाकरे म्हणाले .

अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराचे प्रमाण या शासनाच्या कार्यकाळात वाढले

आगामी विधानसभा निवडणुकीत मिंधे सरकारचे शासन येत नाही . बदलापूर घटनेत आंदोलन करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. अल्पवयीन मुलींच्या अत्याचाराचे प्रमाण या शासनाच्या कार्यकाळात अधिक वाढले आहेत. अनेक महिलांवर अत्याचार करणारे रेवन्ना यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रचार केला. बिल्कीस बानो या मुस्लिम महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी न्याय मिळाला नाही. इथे उध्दव साहेबांनी आपल्या मंत्रीमंडळ मधून काढून टाकलेल्या मंत्र्याला मिंधेनी मंत्री पद दिलय असं म्हणत सरकारवर आदित्य ठाकरेंनी टीका केली .

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, तिसऱ्या मुंबईच्या विकासाला आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे गती मिळणार रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा जागतिक दर्जाचा मिश्र-वापर विकास प्रकल्प, मॅपलट्रीकडून १.१ अब्ज डॉलरपेक्षा अधिक FDI अपेक्षित; सुरबाना ज्युराँगची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती

मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आणि त्यापलीकडील परिसर हा देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र बनण्याची क्षमता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *