महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न चिघळला आहे. सोमवारी विधानसभेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) दोन आमदारांनी कांद्याच्या पिकावरील २०% निर्यात शुल्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निफाडचे आमदार दिलीप बनकर आणि येवला आमदार छगन भुजबळ – जे नाशिक जिल्ह्यातील आहेत, जे राज्यातील कांदा पट्ट्याला व्यापते आणि लासलगाव येथील आशियातील सर्वात मोठी कांदा …
Read More »अंबादास दानवे यांचा आरोप, सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांना फसवणारे सरकार पीक विम्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा
सर्वसामान्य जनता, शेतकरी यांची सरकारने दिशाभूल केली असून गुलाबी स्वप्नं दाखवत घोषणांचा मोठया प्रमाणात पाऊस सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २६० अनव्ये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना केला. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतकरी सुखी नाही त्यामुळे राज्य सुखी सुखी नाही. शेतमालाला हमीभाव …
Read More »अमेरिकेसाठी भारतीय कृषी क्षेत्र खुले करण्याबाबत भारताची ताठर भूमिका भारतीय शेतकऱ्यांच्या हक्काबाबत केंद्र सरकार आग्रही
शेतकऱ्यांच्या रोजीरोटीच्या चिंतेमुळे भारत आपले कृषी क्षेत्र अमेरिकेच्या आयातीसाठी खुले करण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तथापि, जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेसोबतच्या व्यापक व्यापार कराराचा भाग म्हणून भारत कार, इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्माण, वैद्यकीय उपकरणे आणि व्हिस्कीसारख्या स्पिरिटवरील शुल्क कमी करण्याचा विचार करू शकतो. या आठवड्यात पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) वाणिज्य …
Read More »अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प शपथविधीच्या वेळी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी नाही
महायुती सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा व लाडक्या बहिणींची फसवणूक करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, निवडणुकीपूर्वी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा या सरकारने त्यांच्या निवडणूकीच्या जाहिरानाम्यात केली होती. त्यानंतर सरकारच्या शपथविधीवेळी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, शेतकरी महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणार पोकळ अर्थसंकल्प महाराष्ट्र आता थांबणार नाही, भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार
आजचा अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे. यातून कोणत्याही घटकाला काहीही फायदा होणार नाही. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले असून उत्पन्नापेक्षा …
Read More »अर्थसंकल्पातून स्मारके, घरे, महामंडळे, विभागनिहाय निधींची अजित पवार यांच्याकडून घोषणा शिवाजी महाराजांचे स्मारकाची घोषणा पण निधी नाही
राज्याच्या अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या भागात घोषित स्मारकाशिवाय काही नव्या स्मारकांची घोषणा अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर राज्यातील नागरिकांसाठी सर्वांसाठी घरे याेजनेखालील धोरण नव्याने जाहिर करण्यात येणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. त्याचबरोबर विभाग निहाय निधींचे वाटप करत दिव्यांगासाठी आणि असंघटीत कामगार आणि शेतकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येणार आहे. तसेच …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी १५ हजारांचा सन्मान निधी ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ३ हजार रुपये वाढविणार
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय ३ हजार रुपयांनी वाढविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री …
Read More »नाना पटोले यांची टीका, शेतकऱ्यांना म्हणणारे भाजपा युतीचे सरकारच भिकारी एक रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते काय?
भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून त्यांचा अपमान केला आता राज्यातील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. कोकाटे यांचे शेतकऱ्यांबद्दलचे विधान सत्तेचा माज आल्याचे दर्शवते. शेतकरी भिकारी नाही तर शेतक-यांसह सर्वसामान्य …
Read More »अतुल लोंढे यांची मागणी, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणाऱ्या कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या अन्नदाता शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिम्मत होतेच कशी? काही संवेदना आहेत की नाही?
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमात बोलताना एक रूपयाची भीक आता भिकारीही घेत पण आम्ही शेतकऱ्यांना एक रूपयात पीक विमा दिल्याचे आक्षेपार्ह वक्यव्य केले. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पुढे बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा युती …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, बेकायदेशीर रित्या निविदा काढल्या, एकाच परिवाराच्या चार कंपन्यांना काम निवडणूक आयोगाची परवानगी न घेता आचारसंहितेत मंजूरी कशी दिली ?
तत्कालीन एकनाथ शिंदे-भाजपा सरकारमधील भ्रष्टाचाराची मालिका संपत नाही. शेतकऱ्यांच्या नावावर भ्रष्टाचार करून खिसे भरण्याचा आणखी एक प्रकार शिंदे फडणवीस अजित पवार सरकारच्या काळात झाला आहे. महाराष्ट्र राज्य यंत्रमाग मंडळाच्या माध्यमातून कापूस साठवणूक बॅग खरेदीसाठी निविदा वेगळ्या शीर्षका खाली काढून ७७ कोटी रुपयांची खिरापत वाटून ४१.५९ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. …
Read More »
Marathi e-Batmya