जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली होती. दरम्यान, मलिकांच्या या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीकास्र सोडलं आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत …
Read More »त्या निर्णयाचे स्वागत करत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांसाठी केल्या या ८ मागण्या हातातोंडाशी आलेला घास लागोपाठ आलेल्या अवकाळीने हिरावून घेतल्याने शेतकरी खचून गेलाय...
मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीठीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी ५० हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी अशी मागणी करणारे पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. या पत्रात अजित पवार म्हणाले की, मार्च …
Read More »जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती, आमच्या पक्षाने प्रो भाजपा भूमिका कधीच घेतली… येत्या चार - सहा महिन्यात येणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवून राष्ट्रीय पातळीवरील मान्यता पुन्हा मिळवू
आमच्या पक्षाने प्रो भाजपा भूमिका कधीच घेतलेली नाही. आणि अद्यापही घेतलेली नाही. कोणत्या विधानाचा भाजपा सोयीस्कर अर्थ लावत असेल तर त्यासाठी आम्ही विधाने करतोय असे समजायचे कारण नाही अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना जयंत …
Read More »मार्चमधील अवेळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी १७७ कोटी या जिल्ह्यांना वितरीत राज्य सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
राज्यात मार्च २०२३ मध्ये विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसामुळे शेती पिके व इतर नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यांना वितरीत करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात प्रशासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार आज निधी वितरणाचा शासन …
Read More »जयंत पाटील यांची टीका, शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन… पहिल्यांदाच देवाच्या दर्शनासाठी अख्खं सरकार जाते हा प्रकार पहिल्यांदाच दिसतो
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकडे सरकारचा सहानुभूतीचा दृष्टीकोन दिसत नाही. अवकाळी पाऊस वेगवेगळ्या भागात पडत आहे. पंचनामे ताबडतोब करणे व तात्काळ मदत करणे अशी भूमिका राज्य सरकारची दिसत नाही याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आज राष्ट्रवादी भवन येथे बैठकीला …
Read More »मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर अन् म्हणाले, मदतीबाबत मंत्रिमंडळात निर्णय अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तत्काळ करुन अहवाल सादर करावा
बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे या गावामध्ये बिगरमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे बाधित झालेल्या पिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन अहवाल तत्काळ शासनास सादर करण्याच्या सूचना संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून मंत्रिमंडळात …
Read More »राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण, … ती व्यक्तीगत गोष्ट पण, कर्तव्य श्रेष्ठ एक 'नाथांच्या' राज्यात शेतकरी अनाथ
रामचंद्राच दर्शन घ्यायचं असेल तर खुशाल घ्या ती तुमची व्यक्तीगत बाब पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला जाऊन मुंबईत परतले आहेत. मात्र त्यांच्यावर महाविकास आघाडीकडून टीका होते आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाला आहे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याला मदत करायची सोडून …
Read More »शरद पवार यांची खोचक टीका,…मदत कशी करता येईल यावर आमची श्रध्दा सत्ताधाऱ्यांची श्रध्दा अयोध्येत
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेला राजकिय सेटबॅक देण्याच्या उद्देशाने हिंदूत्वाचा नारा देत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या गटाचे मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही अयोध्येला गेले. या दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत …
Read More »कांदा अनुदानप्रश्नी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहीत छगन भुजबळ यांनी केली ‘ही’ मागणी अट शिथिल न झाल्यास ९०% शेतकरी या अनुदान योजनेपासून वंचित राहणार
शासनाने कांदा अनुदान योजनेचा लाभ देताना पिक पेऱ्याची अट घातली आहे. यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे.पिक पेऱ्याची अट वगळून शेतकऱ्यांना सरसकट या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची नाबार्डला सूचना, शेतकऱ्यांच्या कर्जासाठी सिबिल स्कोअरची अट लावू नका नाबार्डच्या बैठकीत पतधोरणावर बोलताना मुख्यमंत्र्यांची सूचना
“शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबिल स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नयेत. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील या दृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आज नाबार्डतर्फे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित स्टेट क्रेडिट सेमिनारमध्ये ते बोलत होते. यावेळी …
Read More »
Marathi e-Batmya