Tag Archives: farmers

मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा, महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार

पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मिती तर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे  सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत.या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना …

Read More »

नाना पटोले यांचे आवाहन, शेतकरी हा गरीब आणि गरजूच, सरसकट कर्जमाफी द्या शेतकरी कर्जमाफीवरील भाजपाच्या नेत्यांची विधाने जखमेवर मीठ चोळणारी

राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा …

Read More »

१४ जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

गेल्या जवळपास दोन आठवड्यापासून राज्यातील मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे, आणि किमान १५ जूनपर्यंत तरी तो रखडलेलाच राहणार आहे. यामुळे १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते ४५ अंशापर्यंत जाण्याचा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कृषी तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा 'क्लिन प्लांट’कार्यक्रमांतर्गत देशातील ९ पैकी ३ केंद्र महाराष्ट्रात उभारणार- केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या असताना शेतकऱ्याला साहाय्य करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा एकमात्र उपाय आहे. पुणे ॲग्री हॅकॅथॉनमधील उपयुक्त तंत्रज्ञानाचे इन्क्युबेशन करणे आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पहिल्या ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन’च्या पारितोषिक वितरण आणि समारोप सभारंभात ते बोलत होते. कृषी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना दिलेल्या १६ आश्वासनांचे काय झाले? यवतमाळच्या आर्णीतून सुरु झालेला शेतकरी संघर्षाचा आवाज मुंबईमार्गे दिल्लीपर्यंत पोहचवू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात २०१४ साली ‘चाय पे चर्चा’ करत शेतकऱ्यांसाठी भरमसाठ घोषणा केल्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतकरी कर्जमाफी करणार, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार, दरवर्षी २ कोटी रोजगार देणार अशा घोषणा केल्या पण ११ वर्षात यातील एकही घोषणा पूर्ण केलेली …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, कापणी झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई मंत्रिमंडळ बैठकीत पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा

राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे आज बैठक झाली. या बैठकीच्या सुरवातीला राज्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा …

Read More »

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, … पंचनाम्याचे सोपस्कर कशाला ? कृषी मंत्रालय ओसाड गावची पाटीलकी तर बागायती विभाग कोणता?

महाराष्ट्राला मन्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. शेतकऱ्यांचे मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने पुन्हा संकटात टाकले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या संकटात त्याच्या पाठीशी सरकारने उभे राहिले पाहिजे म्हणून पंचनाम्याचे सोपस्कार बाजूला …

Read More »

राज्य सरकारचा पुन्हा इशारा, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये १० जूनपर्यंत पावसात होणार घट

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने ५ जून पर्यंत मान्सूनच्या पावसात घट होणार असल्याचा अंदाज राज्य सरकारकडून व्यक्त करत पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये असे आवाहन केले होते. त्यास आता काही दिवसांचा अवधी जात लोटत नाही तोच आज राज्य सरकारने पुन्हा एक प्रसिद्धी पत्रक जारी करत १० जून पर्यंत पावसात घट होणार …

Read More »

अजित पवार यांनी माणिकराव कोकाटेंना फटकारत म्हणाले, मग काही गोष्टी बोलून का दाखवता? मला हे वादग्रस्त वक्तव्य फार महाग पडतय

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी वादग्रस्त व्यक्तव्ये करणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्याची दखल घेतली. तसेच माणिकराव कोकाटे यांना फटकारत काही सूचनाही केल्या. दरम्यान माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात वादग्रस्त व्यक्त केले होते. त्यानंतर नुकतेच अवकाळी पावसामुळे आणि मान्सूनच्या पावसामुळे शेतकऱ्यांची हाताला …

Read More »

शासनाचा नवीन निर्णयः शेतकऱ्यांना कमी नुकसान भरपाई मिळणार नव्या शासन निर्णयानुसार एकदाच मिळणार पण कमी

महाराष्ट्र सरकारच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईबाबतच्या नवीन आदेशात पूर्वीच्या तुलनेत कमी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शुक्रवारी एक नवीन सरकारी निर्णय (जीआर) जारी केला ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या बाबतीत भरपाईसाठी पात्रता आणि प्रति हेक्टर अतिरिक्त आर्थिक मदत या निकषांवर जानेवारी २०२४ चा पूर्वीचा आदेश रद्द करण्यात …

Read More »