Tag Archives: mahavikas aghadi

एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर कडी, मुंबईत २२७ च वॉर्ड, कारभाराची एसीबी मार्फत चौकशी विधानसभेत विधेयकाला अखेर मंजुरी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेच्या वार्डांच्या संख्येत वाढ करत त्यास विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूरीही केली. मात्र सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय रद्दबादल ठरवित मुंबई महापालिकेत जून्याच पध्दतीने वार्ड रचना ठेवण्याचे सुधारीत विधेयक मंजूर करत मुंबई महापालिकेच्या काराभाराची एसीबी मार्फत …

Read More »

सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग आंदोलन करणे विरोधकांचा अधिकार, सत्ताधाऱ्यांचा विधानभवन परिसरातील प्रकार दुर्दैवी-बाळासाहेब थोरात

अधिवेशनातून आपल्यासाठी काही मदतीचा हात देणारा निर्णय होईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दररोज ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत तर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करत आहे आणि विधीमंडळाच्या पायऱ्यावर मात्र सत्ताधारी आमदार विरोधकांना धक्काबुक्की करतानाचे चित्र पाहिल्यानंतर शेतकरी व …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध करत ‘या’ मागणीवरून विरोधी पक्षाचा सभात्याग… महाविकास आघाडीने शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागण्यांकडे सरकारने केले दुर्लक्ष...

शिंदे-फडणवीस सरकारने आज ओला दुष्काळ जाहीर करायला हवा होता…शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजार रुपये आणि फळबागांना हेक्टरी दीड लाखाची मदत द्यायला हवी होती याशिवाय इतर मागण्यांकडेही दुर्लक्ष केल्यामुळे सरकारचा निषेध करत असल्याचे सांगून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज सभात्याग केला. अतिवृष्टीमुळे शेतजमिनीवरील १८ लाख हेक्टर क्षेत्र …

Read More »

तर मुख्यमत्री शिंदे बरसले, तुमच्या चिठ्या काढेन विरोधकांच्या आरोपावर दिली धमकी

नव्याने राज्यात स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणीस सरकारचे पावसाळी अधिवेशन पहिलेच असूनही महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी चांगलेच घेरले. त्यामुळे पावसाळी अधिवेशन चांगलेच रंगतदार झाल्याचे दिसून येत आहे. मात्र विरोधकांच्या सततच्या प्रश्नाच्या भडीमारामुळे थोडेसे गांगरलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज थेट विधानसभेत विरोधकांना सूचक इशारा देत म्हणाले, मी तुमच्यासोबतही काम केले आहे. त्यामुळे …

Read More »

पन्नास खोके, माजलेत बोके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपाच्या दारी… महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने ...

ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… पन्नास खोके, माजलेत बोके… पन्नास खोके, एकदम ओके… ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी… स्थगिती सरकार हाय हाय… गद्दारांचं सरकार हाय हाय!!!… आले रे आले गद्दार आले… अशा गगनभेदी घोषणा देत आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. …

Read More »

अजित पवार यांच्या टीकेवर चंद्रकांत पाटील यांचा प्रति सवाल, आरडाओरड कशासाठी? क्रिडा प्रकारात फक्त समावेश केलाय वेगळं आरक्षण दिलं नाही

राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस सरकार स्थापनान्न झाले. मात्र हे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेत घडवून आणण्यात आलेल्या बंडावरून सध्या महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातही यासंदर्भात महाविकास आघाडीकडून शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. त्यातच …

Read More »

पावसाळी अधिवेशन: गद्दारांना ताट – वाटी… चलो गुवाहाटी ईडी सरकार हाय हाय.. फसवी मदत जाहीर करणार्‍या सरकारचा धिक्कार असो...

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरे गटाच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला. विधानसभेच्या पायऱ्यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली. ओला दुष्काळ जाहीर करा, नाहीतर खुर्च्या खाली करा… ईडी सरकार हाय …

Read More »

उध्दव ठाकरेंचा निर्णय फिरवत शिंदे सरकारने महापालिका नगरसेवकांची संख्या घटविली मुंबईत २३६ ऐवजी २२७ नगरसेवक राहणार अन्य महापालिकेतील नगरसेवक संख्या कमी होणार

तत्कालीन उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाने मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमधील सदस्य संख्या वाढीचा निर्णय आज शिंदे-फडणवीस सरकारने रद्दबातल ठरवित २०१७ साली झालेल्या निवडणूकांमध्ये असलेल्या जागा इतकीच सदस्य संख्या ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री …

Read More »

संजय राऊत यांच्यावरील धाडीवरून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,चौकशी होऊ द्या… त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच

पत्रावाला चाळ प्रकरणी तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीला हजर राहिले नाहीत म्हणून आज सकाळी ईडीने संजय राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर धाड टाकत त्यांची चौकशी सुरु केली. जवळपास साडे नऊ तास त्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीची भाजपासह शिंदे गटाने स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारण्यात आले …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ओबीसी आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय धक्कादायक ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकीच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा पेच सुटला असे दिसत असतानाच सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा दिलेला निकाल हा अत्यंत धक्कादायक आहे. राज्य सरकारने याची तातडीने दखल घेऊन या निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. …

Read More »