मुंबई-सांगली : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. या विषाणूची लागण कधी आणि कोणापासून होईल याची कोणतीही श्वाश्वती नाही. या विषाणूमुळे सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर बाधित होत असताना कोरोनाने राज्यातील राजकारण्यांनाही विळखा घालायला सुरुवात केली असून आता राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनीच ट्विटरच्या माध्यमातून …
Read More »ठाकरे सरकार पावसाळी अधिवेशनात हे अध्यादेश आणि विधेयके मंजूर करणार ९ अध्यादेश आणि १२ विधेयके मंजूरीसाठी विधिमंडळात ठेवणार
मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे तिसरे अधिवेशनास उद्या सोमवारपासून सुरु होत असून या पावसाळी अधिवेशनात ९ अध्यादेश आणि १२ विधेयके मांडण्यात येणार आहेत. यातील बहुतांष अध्यादेश हे महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणूका कोरोनामुळे पुढे ढकलण्यासांदर्भात आहेत. तर विद्यापीठाच्या नव्या अभ्यासक्रम, जीएसटी आदींसंदर्भातील काही अध्यादेश मांडण्यात येणार आहेत. याशिवाय राज्यातील जनतेच्या अनुषंगाने …
Read More »महाविकास आघाडीने फडणवीस सरकारवर केलेला आरोप स्वत:च खोडून काढला राज्याच्या डोक्यावर ५ लाख ५० हजार कोटींचे नव्हे तर ३ लाख ७ हजार कोटींचे कर्ज
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात तत्कालीन फडणवीस सरकारने महाराष्ट्राच्या डोक्यावर तब्बल ५.५० लाख कोटींचे कर्ज केल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह अनेकांनी केला. परंतु राज्यातील कोरोना परिस्थितीमुळे महसुली उत्पन्न कमी झाल्याने आवश्यक असलेली रक्कम रक्कम उभी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने २ …
Read More »विरोधी पक्षनेत्यांबाबत आघाडी सरकारचा तो निर्णय फडणवीसांची इच्छापूर्तीचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा टोला
मुंबई: प्रतिनिधी शासकीय अधिका-यांनी कोणत्या बैठकीला उपस्थित रहावे, याबाबत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाने फडणवीस सरकारच्याच निर्णयाची आणि इच्छेची पूर्ती केली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना व विरोधी पक्ष नेत्यांना पोटशूळ का व्हावा? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. भारतीय जनता …
Read More »बैठक तर झाली पण आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती तोडगा लवकरच निघेल अशी काँग्रेस नेत्यांना आशा
मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये महत्वाचे खाती नाही. तसेच निर्णय प्रक्रियेत स्थान नसल्याच्या मागणीवरून काँग्रेस नेते सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत असलेली नाराजी व्यक्त केली. मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांनीही नेत्यांचे म्हणणे ऐकत यासंबधीचा निर्णय नंतर कळविणार असल्याचे …
Read More »कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार…पण अनेक गोष्टी पूर्वपदावर आणणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे इशारा आणि आश्वासन
मुंबई: प्रतिनिधी केंद्रीय पथकाने काही दिवसांपूर्वी मे अखेर पर्यत १ लाख २५ हजार ते दिड लाख रूग्णाच्या संख्येचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आज मे महिन्याची २४ तारीख असून सद्यपरिस्थितीत ही संख्या ३३ हजार आहे. ही संख्या केवळ आपल्यामुळेच नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे सांगत आगामी दिवसात संख्या आणखी वाढणार असल्याचा …
Read More »उपमुख्यमंत्री पदामुळे खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर शिवसेनेची यादी तयार काँग्रेस राष्ट्रवादीचे एकमेकांकडे बोट
मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न होवून आठवडा होत आला आहे. मात्र हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि पहिल्यांदा शपथ घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह ७ मंत्र्यांचे खातेवाटपही होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री पदावरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली असल्याने मंत्र्यांच्या खात्याचे वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार …
Read More »
Marathi e-Batmya