राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीचे मतदान आज पार पडले. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधात काही प्रमाणात नाराजी व्यक्त करत सर्वच आर्थिकस्तरातील मतदारांनी आपला मतदानाचे कर्तव्य बजावले. मात्र या निवडणूकीसाठी झालेल्या मतदानानंतर राज्यातील कोणत्या आघाडीला किती एकूण जागा मिळणार याबाबतचे तर्क वितर्क राजकिय …
Read More »मतदानाच्या दिवशीच महायुती आणि महाविकास आघाडीत आघाडी धर्माची ऐशीतैशी राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी काँग्रेसचा उबाठाला, तर मनसेला भाजपाचा पाठिंबा
राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी आज मतदानाला सकाळी सुरूवात झाली. मात्र मतदानाला नुकतीच सुरुवात झाल्यानंतर ज्या विधानसभा जागेवर ज्या पक्षाने दावा केला. मात्र महायुती किंवा महाविकास आघाडीतील घटक पक्षाने त्याच जागेसाठी प्रबळ दावेदार असलेल्या पक्षाच्या उमेदवारालाच अपक्ष किंवा तिसऱ्याच पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय त्याच उमेदवाराच्या पारड्यात मतदान टाकल्याची माहिती पुढे आली …
Read More »राजकिय पक्षांच्या प्रचार तोफा थंडावल्या, निवडणूक आयोगाने जारी केला महत्वाचा आदेश राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई
राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या निमित्ताने सुरु असलेल्या सर्वपक्षिय प्रचाराच्या तोफा थंडावल्या. मागील २० ते २५ दिवसापासून राज्यातील सर्वच राजकिय पक्षांकडून सातत्याने आपपाल्या प्रतिस्पर्धी पक्षावर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. विधानसभा निवडणूकीत महायुतीच्या वतीने भाजपाच्या केंद्रीय नेत्यांनी पुन्हा एकदा धार्मिक आधारावर मते मागण्याचा अजेंडा निश्चित करण्याचा प्रयत्न केला. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपाचा …
Read More »राहुल गांधी यांचा आरोप, धारावीची एक लाख कोटींची जमीन अदानीला देण्यासाठी मविआचे सरकार… जातनिहाय जनगणना व ५० टक्क्यांची मर्यादा हटवण्यास इंडिया आघाडी आग्रही, भाजपा व पंतप्रधान मोदींचे मात्र मौन
देशात दोन विचारधारांची लढाई असून काँग्रेस इंडिया आघाडी संविधान व आरक्षणाचे रक्षण करण्यासाठी लढत आहे तर दुसरीकडे भाजपा आरएसएस दररोज संविधानावर हल्ले करत आहे. महापुरुषांचे विचार असलेल्या संविधानाची भाजपा पायमल्ली करत असून महाविकास आघाडीचे सरकार चोरून भाजपाने महाराष्ट्रात असंवैधानिक सरकारची स्थापना केली. धारावीतील एक लाख कोटी रुपयांची जमीन उद्योगपती गौतम …
Read More »शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, एवढे पैसे वाटले पण परिणाम होणार नाही… राज्यात लोकांना परिवर्तन हवंय, लोक परिवर्तन करतील
निवडणुका जिंकण्यासाठी ते पाऊल टाकत आहे, त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं आहे. राज्यात लोकांना परिवर्तन हवंय. लोक परिवर्तन करतील. महाविकास आघाडीच्या बाजूने लोक उभे राहतील असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे. शरद पवार बोलताना म्हणाले की,एकंदर चित्र …
Read More »पी चिदंबरम यांचा सवाल,… प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले तर रोजगार कुठून मिळणार? काँग्रेस सरकारच्या काळात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची भाजपाच्या राजवटीत सर्वच क्षेत्रात घसरण
महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून काँग्रेस सरकारने आखलेल्या ध्येय धोरणामुळे महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिलेले राज्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. परंतु मागील काही वर्षात भाजपा सरकारमुळे महाराष्ट्राची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट झालेली आहे. महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने गुंतवणूक व रोजगारही गेले. शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. दरडोई उत्पन्नात …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही महायुतीचे सरकार येताच नांदेडमध्ये एमआयडीसी मंजूर करणार
महायुती सरकारने दोन वर्षांत शेतकऱ्यांना १५००० कोटींची मदत केली. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्धार आम्ही केलाय. सोयबीन खरेदी केंद्र वाढवणार आहोत. किमान आधारभूत किंमतीतील तफावत भरुन काढण्यासाठी सरकारकडून भावांतर योजना लागू केली जाईल, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेडमधील प्रचारसभेत दिली. …
Read More »राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचारातून पंतप्रधान मोदी यांची एक्झिट मुंबईतल्या सभेत पंतप्रधान मोदीं यांची घोषणा, ही माझी शेवटची सभा
राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच्या दुसऱ्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा प्रवेश झाला. अद्याप चार-पाच दिवस विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराला शिल्लक राहिलेले असतानाच भाजपा महायुतीच्या प्रचारातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारातून एक्झिट घेत असल्याचे जाहिर केले. मुंबईत महायुतीच्या झालेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र …
Read More »नवाब मलिक यांचा दावा, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेसची पॉलिटिकल अडजेस्टमेंट ;शिव - शाहू - फुले - आंबेडकर यांच्या विचारधारेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम...
राजकारणात कुणीही परममित्र किंवा परमशत्रू असत नाही. वेळेनुसार सर्व बदलत असतात. २०१९ मध्ये अशाप्रकारे सरकार बनवले जाईल असे कुणाला वाटले होते का. मात्र वेगळे घडले त्यामुळे २३ नोव्हेंबरला निकाल आला की, अजित पवार यांच्याशिवाय कोणतेही सरकार महाराष्ट्रात बनणार नाही असा स्पष्ट दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री नवाब …
Read More »अमित शाह यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, कोविडकाळात घरात बसणारे देशातील एकमेव मुख्यमंत्री चाळीसगाव येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ठाकरेंवर थेट निशाणा
कोविड महामारीच्या काळात संपूर्ण देशातील राज्यांचे मुख्यमंत्री संकटाशी सामना करत होते, पण त्या संकटाला घाबरून घरात बसणारे उद्धव ठाकरे हे देशातील एकमेव मुख्यमंत्री होते, अशा शब्दांत प्रखर टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चाळीसगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांना थेट लक्ष्य केले. आपल्या सुखदुःखात आपल्यासोबत असतात, ते खरे लोकप्रतिनिधी असतात, …
Read More »
Marathi e-Batmya