Tag Archives: mumbai

विधिमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूबः अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेणार

आज आठवड्याचा पहिला दिवस मात्र सोमवारी पहाटेपासून सकाळी सात वाजेपर्यंत मुंबईत अतिवृष्टी झाली. जवळपास ३०० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली. त्याचा परिणाम मुंबईतील रस्ते वाहतूकीबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकल सेवेवरही परिणाम झाला. त्यामुळे शनिवार-रविवार सुट्टीसाठी आपापल्या मतदारसंघात गेलेले अनेक आमदार मुंबईला जाणाऱ्या रेल्वेत बसले खरे पर्यंत मुंबईच्या उपनगरातच अडकून …

Read More »

mumbai rain: मध्य रेल्वेने जारी केले मेल-एक्सप्रेसचे रिशेड्युल अनेक मेल-एक्सप्रेस दुपारी २ नंतर धावणार

मध्यरात्रीनंतर मुंबईत कोसळलेल्या पावसामुळे मुंबईत येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आणि लोकल सेवा विस्कळीत झाल्या. तर अनेक ठिकाणी रस्ते महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. मात्र पावसाच्या अंदाजाची माहिती किंवा कल्पना न आल्याने यापूर्वीच लांब पल्ल्याच्या गाड्याचे आरक्षण केलेल्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून पडले. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे …

Read More »

mumbai rain: मुंबईतील जनजीवन विस्कळीतः लोकल, रेल्वे पुर्वपदावर नाही ३०० मिमी पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, अद्याप पाणी पूर्ण ओसारायला तयार नाही

मध्यरात्रीनंतर उशीराने सुरु झालेल्या मुसळधार पाऊस सकाळी ७ वाजेपर्यंत कोसळत राहिला. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागात आणि रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले. यामुळे मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल सेवेचा पुरता बोजवारा उडाला. सकाळचे ११ वाजले तरी साचलेले पाणी कमी व्हायला तयार नव्हते. यामुळे लोकलसेवा ठप्प झाल्याने अनेक चाकरमानी वेळेवर घराच्या बाहेर …

Read More »

दिल्ली-मुंबईतील घरांच्या किंमतीत ५० टक्के वाढ अॅनारॉक च्या अहवालात नवी माहिती पुढे

रिअल इस्टेट सल्लागार ॲनारॉकच्या आकडेवारीनुसार, दिल्ली-एनसीआर आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) मधील सरासरी घरांच्या किमती गेल्या पाच वर्षांत घरांची मागणी वाढल्याने किंमतीत जवळपास ५०% वाढ झाली आहे. अॅनारॉक Anarock च्या अहवालात असे दिसून आले आहे की दिल्ली-NCR मधील निवासी मालमत्तेची सरासरी किंमत जानेवारी-जून २०२४ मध्ये ४९% वाढून ६,८०० रुपये प्रति …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची मागणी, जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा महायुतीने भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली

राजरोसपणे मुंबई लुटली जात आहे. दुग्ध विकास विभागाची साडे आठ हेक्टर जागा अदानीच्या घशात घातली आहे. त्यामुळे मुंबईला अदानीपासून वाचवा असे आवाहन करत जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करण्याची मागणी आज करत अदानी पूर्ण मुंबई साफ करीत आहे. अदानींना राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत असा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय …

Read More »

मराठा आरक्षण विषयाच्या अनुषंगाने येणा-या प्रश्नासंदर्भात मंत्रीमंडळ उपसमिती निर्णय घेणार राज्य उत्पादन शुल्‍क मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती

मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दांप्रमाणे कायद्यात टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य शासन युध्दपातळीवर प्रयत्न करत असल्याचे उत्तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी दिले. शासनाकडे आलेल्या सगेसोयरेच्या हरकतीबाबत सरकारचा निर्णय झाला का, ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या नाहीत, त्यांना शपथपत्र देवून त्यांना प्रमाणपत्र द्यावे, …

Read More »

मुंबईच्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश

मुंबईत कमी दाबाने आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढत असून मुंबईकर हैराण झाले आहेत. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या दालनात शुक्रवारी तातडीची बैठक बोलावली आहे. आज विधानसभेत आज आमदार अॅड आशिष शेलार यांनी आपल्या वांद्रे पश्चिम विधानसभा क्षेत्रातील खार दांडा, गझदरबांध आणि वांद्रे परिसरातातील पाणी पुरवठ्याच्या तक्रारी विधानसभेत …

Read More »

धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती… ६५ हजार शेतकऱ्यांचा प्रलंबित प्रस्ताव केंद्राकडे सादर डेटा एन्ट्रीसाठी स्वतंत्र लॅपटॉप देणार

केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या पीएम किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपये तर यावर्षीपासून राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेतून ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. या योजनेत चौदाव्या हप्त्यापर्यंत ७० लाख लाभार्थी राज्यातून लाभ घेत होते. कृषी विभागाने विविध …

Read More »

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवे, प्रसाद लाड विधान परिषदेत भिडले सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विधानावरून विधान परिषदेत गदारोळ, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी, त्यामुळे सभागृहाचे कामकाज एकदा नव्हे तर तीनदा तहकूब करण्याची पाळी सभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर आली. पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरळीत सुरू असताना, दुपारी चारच्या सुमारास भाजपाचे गटनेते प्रविण दरेकर यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधाचा ठराव …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, पावसाळी अधिवेशनातच पेपर फुटीबाबत कायदा आणणार चालू अधिवेशनातच कायदा आणणार असल्याची जाहिर केले

स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पेपर फुटीसंदर्भात केंद्र सरकारने कायदा केला आहे. राज्यातही अशा प्रकारचा कायदा आणण्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. पेपरफुटी व गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी राज्यात कायदा आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य राजेश टोपे, आशिष शेलार, …

Read More »