मुंबई: विशेष प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरात राहणाऱ्यासाठी अखेर मुंबई लोकल प्रवास आता करता येणार असून राज्यातील सर्व निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकलप्रवास खुला करण्यात येत असून दोन डोस घेवून १४ दिवस झालेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव …
Read More »पुढील चार दिवस या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंजचा इशारा कोकणासह या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून जारी
मुंबई: प्रतिनिधी काल रात्रीपासून मान्सूनच्या पावसाने मुंबईसह उपमगरात जोरदार बॅटिंग केल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळणे, संरक्षक भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. त्यातच प्रामुख्यानं कोकणाला पुढील पाच दिवसांसाठी रेड अॅलर्ट आणि ऑरेंज अॅलर्टचा इशारा हवामान खात्याने दिला. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे मुंबईकरांसह कोकणातील जिल्ह्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. मात्र, याचेवळी राज्याच्या इतर …
Read More »राज्यातल्या या नऊ जिल्ह्यांबाबत केंद्राने व्यक्त केली चिंता कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत लॉकडाऊन लागण्याची शक्यता
नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली असून या जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाची संख्या वाढत असल्याबाबत राज्य सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली. देशातील कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार …
Read More »गर्दीच्या ठिकाणी अॅंन्टीजेन चाचणी कराच ! अन्यथा कारवाईला सामोरे जा मुंबई महापालिकेकडून आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी मागील दोन दिवसात मुंबई शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येने ३ हजाराचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला थोपविण्यासाठी आता गर्दीच्या ठिकाणी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची अँन्टीजेन कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देत चाचणीस नकार देणाऱ्या नागरीकावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिकेने सर्व वार्ड अधिकाऱ्यांना दिले. दिवसेंदिवस मुंबईतील कोरोनाबाधितांच्या …
Read More »या कारणासाठी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची झाली बत्तीगुल २० मिनिटासाठी मंत्रालय राहिले वीजेविना
मुंबईः प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी मुंबईतील ब्लॅकआऊटची घटना ताजी असताना आज मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची वीज तब्बल २० मिनीटसाठी खंडित झाली. त्यामुळे मंत्रालयात आलेल्या काही मंत्र्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांना काळोखात राहण्याची वेळ आली. अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने अनेक विभागांना आपली कामे करता आली नाहीत. दरम्यान, मेट्रोच्या कामामुळे वीज खंडीत झाल्याची माहिती मंत्रालयातील वीज …
Read More »न्यायालयाचा निर्णय: आरोपी देणार मृतकाच्या वारसाला ११ लाखाची नुकसान भरपाई दिंडोशी न्यायालयाचा निकाल
मुंबई: विशेष प्रतिनिधी कांदिवली येथील एका खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेबरोबर ११ लाख रूपयांचा दंड ठोठावला असून ही दंडाची रक्कम खून झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला देण्याचा निर्णय दिंडोशी न्यायालयाने दिला. दिंडोशी न्यायालयाने दिलेला निकाल आतापर्यतच्या न्यायालयांपेक्षा वेगळा आहे. कांदिवली येथी रहिवाशी स्व.कपूरचंद गुप्ता आणि खून प्रकरणातील आरोपी शिवप्रसाद …
Read More »सायबर हल्ला झाल्यानेच मुंबईतील वीज पुरवठा खंडित ऊर्जामंत्र्यांकडून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन
मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाल्याच्या १२ ऑक्टोबर २०२० च्या घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालातील निष्कर्षांबाबतचे निवेदन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत केले. निवेदनामध्ये माहिती दिली आहे की, गतवर्षी १२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.०५ मिनिटांच्या सुमारास मुंबईला विद्युत पुरवठा करणाऱ्या ४०० के.व्ही. वाहिन्यांमध्ये …
Read More »कोरोना : अकोला, अमरावती वाढ कायम तर राज्यात बाधित-मृतकांमध्ये घट ५ हजार २१० नवे बाधित, तर ५ हजार ३५ बरे झाले तरी १८ मृतकांची नोंद
मुंबई: प्रतिनिधी राज्यात काल ७ हजाराच्या घरात रूग्ण आढळून आल्यानंतर आज तब्बल ३ हजार रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर विदर्भातील अकोला आणि अमरावती मंडळात आणि पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत वाढच नोंदविण्यात आली आहे. अकोल्यात २०० हून अधिक, तर अमरावतीमध्ये ६०० हून अधिक तर बुलढाण्यात १०० हून अधिक …
Read More »मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी ‘मुंबई महाराष्ट्राची होती… आहे… आणि राहिल’, असे जोरदार प्रत्युत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात जनता दरबाराला उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबईबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पवार म्हणाले की, कर्नाटकमधल्या नागरिकांना बरे …
Read More »खारफुटीच्या संरक्षणासाठी कारवाईचे अधिकार वन विभागाला द्या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील खासगी जमिनीवरील खारफुटीचे संरक्षण करण्याचे तसेच या जमिनीवरील खारफुटींवर अतिक्रमण किंवा बांधकाम केल्यास, सीआरझेड तरतुदींचा भंग केल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार राज्य शासनाच्या वन विभागालाही देण्यात यावेत, अशी मागणी राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण, वने आणि वातावरणीय बदल मंत्री प्रकाश जावडेकर …
Read More »
Marathi e-Batmya