Tag Archives: ncp

ओबीसीशिवाय “या” १४ महापालिकांच्या आरक्षण सोडत आणि हरकतींचा कार्यक्रम जाहिर ३१ मेला होणार आरक्षणाची सोडत

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागातील अनुसूचित जाती-जमाती आणि महिला आरक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह १४ महापालिकांना आदेश दिले. विशेष म्हणजे अन्य राखीव प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करून येत्या ३१ मे रोजी या राखीव प्रवर्गासाठी सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना दिले. राज्यातील …

Read More »

हनुमान चालिसा सोडून पेट्रोल – डिझेलवर बोलतायत हे ही नसे थोडके गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा फडणवीसांना टोला

हनुमान चालिसा सोडून पेट्रोल – डिझेलवर बोलतायत हे नसे थोडके असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. राज्य सरकारने पेट्रोल- डिझेलवरील मुल्यवर्धीत करात कपात केल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत टिका केली. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस हे …

Read More »

राज ठाकरे म्हणाले, कोणीतरी उठतो माफी मागा म्हणतो… राजकारण नीट समजून घ्या भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग याचे नाव न घेता प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न

अयोध्या दौऱ्यावरून भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशच्या भूमीवर पाय ठेवणार नसल्याचा इशारा दिला. त्यातच राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्या दौरा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यानंतर पुण्यात आयोजित जाहिर सभेत आज ठाकरे म्हणाले की, पुण्यातल्या पत्रकार परिषदेत …

Read More »

विशेष न्यायालयाचे मलिकांवरील आरोपांबाबत निरिक्षण अन् फडणवीसांचा मविआला टोला म्हणे इतकी धडपड ओबीसी आरक्षणासाठी केली असती तर…

सध्या ईडीच्या तुरूंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मविआमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर नुकतेच आरोप पत्र दाखल करण्यात आले. या आरोप पत्रात करण्यात आलेल्या आरोपांबाबत तथ्य असल्याचे असल्याचे निरिक्षण विशेष न्यायालयाचे न्यायाधीश रोकडे यांनी नोंदविल्यानंतर भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत खोचक टोलाही लगावला आहे. ही …

Read More »

राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, राजकिय वर्तुळात मात्र भलत्याच चर्चेला उधाण ट्विट करत स्वतः दिली माहिती

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत औरंगाबादेत आयोजित मनसेच्या सभेत ५ जूनला अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. त्यांच्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातून विरोध वाढू लागला. त्यातच राज ठाकरे यांच्या पायाच्या दुखण्याचे कारण पुढे करत अयोध्येचा दौऱाच स्थगित करत असल्याची घोषणा आज ट्विटरद्वारे केली. त्यामुळे अयोध्येत जावू संभावित …

Read More »

चुरस वाढली, संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली सहाव्या जागेवरून होणार रस्सीखेच

माजी खासदार संभाजीराजे यांनी राज्यसभेची निवडणुक अपक्ष म्हणून लढविण्याचा निर्णय अगोदरच जाहिर केला. त्यानंतर शिवसेनेचा एकच खासदार निवडूण जाणार असताना आणि शिल्लक राहीलेल्या मतांच्या जोरावर आणखी एक उमेदवार उभा कऱण्याची घोषणा केली. तर दुसऱ्याबाजूला संभाजी राजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली. यापार्श्वभूमीवर संभाजी राजे यांना राज्यसभेची निवडणूक लढवायची …

Read More »

पुण्यातील राड्यानंतर फडणवीस म्हणाले, हे सगळं तोऱ्यात होत आहे राज्यातील भाजपाच्या विरोधात होत असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीर टीका

काल सोमवारी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी पार पडलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. त्यातच यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करतानाचे दृष्य पुढे आले. त्यानंतर या राजकीय गोंधळावरून सध्या राज्यातलं राजकारण तापू लागले आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले …

Read More »

नाना पटोलेंच्या तक्रारीवर अजित पवार म्हणाले, फार महत्व देण्याचे कारण नाही काँग्रेस श्रेष्ठींकडे केली पटोलेंनी तक्रार

विदर्भातील भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीला डावलून भाजपाशी हात मिळवित सत्ता हस्तगत केली. याप्रकरणावरून राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसल्याचा आरोप करत त्यासंदर्भातील तक्रार काँग्रेस श्रेष्ठींकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. त्यानंतर यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले …

Read More »

अजित पवार म्हणाले, पंतसंस्थांमधील ठेवींनाही ५ लाखांपर्यत लवकरच संरक्षण सहकारी आर्थिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील

सहकारी आर्थिक संस्था या चांगल्या चालल्या पाहिजेत, यासाठी त्यांच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशिल आहे. त्यासाठी आरबीआयचे यापुर्वी ठेवीवर १ लाख रुपयाचे विमा संरक्षण मिळत होते ते आता ५ लाख रुपयांपर्यंत वाढविले आहे. याच धर्तीवर राज्यात पतसंस्थांमधील ठेवीवर किती प्रमाणात विमा संरक्षण देता येईल याबाबत लवकरच धोरण ठरविण्यात येणार आहे. संस्था चालविणाऱ्या …

Read More »

फडणवीसांचे उध्दव ठाकरेंना प्रत्युत्तर, मास्टर नव्हे ती तर लाफ्टर सभा; तुम्ही कशात होते? होय मी अयोध्येला गेलो होतो तेव्हा मी नगरसेवक झालो होतो पण तुम्ही कुठल्या सहलीला गेलता

वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करत अयोध्येत काय सहलीला गेला होतात का? असा सवाल केला होता. त्यास आज भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले, कालची सभा ही मास्टर सभा आहे म्हणून सांगण्यात येत होते. मात्र …

Read More »