राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस. आज दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारने मंजूर केलेले जीएसटी विधेयक विधानसभेतही मंजूर करण्याच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीएसटी विधेयक मांडले. त्यावरील चर्चेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून चिमटा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना केली. सत्ताधारी …
Read More »बिहारमध्ये पंतप्रधान मोदींना हादरा, भाजपाबरोबरील नितीश कुमार यांचा संसार मोडीत काँग्रेस, आरजेडी आणि डाव्यांबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करणार
महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेत बंड घडवून आणत भाजपाने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना सोबत घेत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची स्थापना केली. तर दुसऱ्याबाजूला बिहारचे नितीश कुमार यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्री पदावर बसवित भाजपाने सरकार चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील संयुक्त जनता दल आणि …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, राज्यातील ED सरकार महाराष्ट्रासाठी की गुजरातसाठी? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत मात्र बुलेट ट्रेनवर ६ हजार कोटींची उधळपट्टी
राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यास या सरकारकडे पैसे नाहीत. पण गुजरातच्या हिताचा व पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा ड्रिम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनसाठी ६ हजार कोटी …
Read More »नाना पटोले यांचा सवाल, पंतप्रधान ओबीसी समाजाचा असूनही समाजाला काय मिळाले? जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही
देशभरात ओबीसींची संख्या जास्त असूनही आजपर्यंत या समाजावर अन्यायच झालेला आहे. मंडल आयोगामुळे २७ टक्के आरक्षण मिळण्यास सुरुवात झाली पण हे आरक्षणही आज धोक्यात आल्याचे दिसत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आहेत तरिही ओबीसी समाजाला योग्य न्याय मिळालेला नाही. आज पंतप्रधानपदावर ओबीसी समाजाचा व्यक्ती असूनही ८ वर्षात समाजाला …
Read More »बाळासाहेब थोरात म्हणाले, लोकशाही राहील की नाही अशी परिस्थिती… पंतप्रधान मोदींच्या ‘घर घर तिरंगा’ला काँग्रेसकडून ‘स्वातंत्र्याचा गौरव’ यात्रेचे उत्तर
मागील काही दिवसांपासून बंद करण्यात आलेली नॅशनल हेराल्ड केस पुन्हा नव्याने ओपन करून ईडीकडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त घर घर तिरंगा अभियानाची घोषणा केली. या अभियानाला प्रत्युत्तर …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधानांना भेटून करणार
सेंट्रल व्हिस्टा या संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या शपथग्रहण समारंभानंतर महाराष्ट्र सदनात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली. संसदेच्या नवीन इमारतीत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी …
Read More »देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्म यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाल्या… सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी दिली शपथ
राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत ६४ टक्के मते मिळवित विजयी झालेल्या द्रौपदी मुर्मु यांना आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मुर्मु यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी पदाची शपथ दिली. स्वातंत्र्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून देशाला मिळालेल्या आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला मावळते …
Read More »शरद पवार म्हणाले; हुकूमशाही विरोधातील आवाज उठविण्याची किंमत मोजतोय सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोक त्याविरोधात आवाज उठवतात
जगामध्ये जिथे – जिथे हुकुमशाही आली, ती लयास गेली. श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात सामान्य लोकं घुसली आणि सत्ताधारी कुटुंब देशाबाहेर निघून गेले. त्यामुळे सत्तेचा गैरवापर कुणी करत असेल तर लोकं त्याविरोधात आवाज उठवतात, हे श्रीलंकेत दिसून आले असा इशारा देतानाच भारतातही जे काही घडत आहे, त्याची चिंता न करता आपण एकसंध …
Read More »अनंत गीते यांनी पंतप्रधान मोदींना इशारा देत म्हणाले, उध्दव ठाकरेंनी ते प्रयत्न करू नयेत बंडखोर स्वार्थासाठी गेलेत जनतेच्या प्रश्नासाठी नाही
जवळपास एक महिन्यापासून शिवसेनेतील बंडखोरीवरून निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राजकिय आणि सर्वचस्तरात चर्चेचा विषय झालेला आहे. त्यातच या बंडखोरीमुळे निर्माण झालेल्या घटनात्मक पेचावरही न्यायालयाकडून अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे नव्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारही अद्याप अधांतरीच आहे. यापार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेचे माजी केंद्रिय मंत्री मंत्री अनंत …
Read More »गडकरी म्हणाले, मोदी आणि कायदा मंत्र्यांना सांगितले, न्यायालयाचा निर्णय प्रभावित असू नये न्यायालयाचा निर्णय प्रभावित होणे योग्य नाही मात्र काल मर्यादा असावी
मागील काही वर्षांमध्ये अनेकवेळा न्यायालयाकडून आर्श्चयकारक निकाल लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक पातळीवर एका वेगळ्यात चर्चेला तोंड फुटलेले असतानाच राज्यातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे वक्तव्य केले. त्यामुळे मोदी सरकारकडून न्यायालयाचे निर्णयही प्रभावित केले जात असल्याच्या गोष्टीला अप्रत्यक्ष पुष्ठी मिळत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज बोलताना म्हणाले …
Read More »
Marathi e-Batmya