Tag Archives: prime minister

अनंत गाडगीळ यांचा आरोप, लष्करी सामुग्री निर्मितीबाबत मोदी सरकार असंवेदनशील मोदी सरकारने घालविलेली पत भारतीय सैन्याने सावरली

भारतामध्ये हवाईदलाला लागणाऱ्या सामुग्री निर्मितीसाठी कंपन्यांबरोबर करार केले जातात, त्याला वारेमाप प्रसिद्धीही दिली जाते पण प्रत्यक्षात मात्र वर्षानुवर्षे सदर सामुग्री हवाई दलास पुरविलीच जात नाही. ही बाब खुद्द भारताच्या हवाईदल प्रमुखांनीच दिल्लीतील एका कार्यक्रमात नुकतीच स्पष्ट्पणे मांडल्याचे काँग्रेस नेते अनंत गाडगीळ यांनी सांगितले. अनंत गाडगीळ पुढे म्हणाले की, २०२१ साली …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा मध्य प्रदेशात दावा, ऑपरेशन सिंदूर इतिहासातील यशस्वी ऑपरेशन पाकिस्तानमधील दहशतवाद्यावरील कारवाई यशस्वी करून दाखविली

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे औचित्य साधत मध्य प्रदेशात एका कार्यक्रमाचे आयोजन तेथील राज्य सरकारच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी भारताच्या “नारी शक्ती” ला आव्हान देऊन स्वतःचा विनाश घडवून आणला, पहलगाममधील हल्ल्याचा उल्लेख केला जेथे महिलांनी त्यांचे पती मारले जात असल्याचे पाहिले. …

Read More »

पंतप्रधान मोदी पुन्हा बिहार दौऱ्यात म्हणाले, मी दिलेला शब्द पूर्ण करून आलो बिहार मधील रोहतास येथील प्रचार सभेत बोलताना केले वक्तव्य

बिहारमधील विधानसभा निवडणूकीसाठी आणखी अवधी असताना सध्या पंतप्रधान मोदी यांच्याकडून बिहारचे दौरे आणि जाहिर सभा मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर काल रोड शो केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (३० मे २०२५) रोहतास जिल्ह्यातील बिक्रमगंज येथी प्रचार सभेत बोलताना पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दिलेला ” शब्द …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या एनडीए आणि भाजपा नेत्यांना सूचना, वादग्रस्त वक्तव्ये टाळा मध्य प्रदेश, हरियाणामधील भाजपा नेत्यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर केली सूचना

रविवारी दिल्लीत झालेल्या एनडीए नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेत्यांना त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये संयम बाळगण्याचा सल्ला दिला. सुशासनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या बैठकीत एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या अनावश्यक विधानांवर चिंता व्यक्त केली आणि त्यांना अविवेकी भाष्य करण्यापासून परावृत्त …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, २०३० पर्यंत राज्यासाठी ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ घेऊन सज्ज-निती आयोगाची नवी दिल्लीत बैठक

विकसित भारत-२०४७ चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. तसेच महाराष्ट्रात २०३० पर्यंत राज्यासाठी आवश्यक ५२ टक्के ऊर्जा ही हरित स्रोतांतून निर्माण केली जाईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे नीती आयोगाच्या बैठकीत आवाहन, टीम इंडिया म्हणून काम करू पर्यटन स्थळांचा विकास जागतिक मानकांनुसार करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना “भविष्यातील सज्ज” शहरांसाठी काम करण्यास आणि जागतिक मानकांनुसार किमान एक पर्यटन स्थळ विकसित करण्यास सांगितले. नीती आयोगाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना, पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ किंवा विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी विकासाचा वेग वाढवण्याचे आवाहन केले. देशव्यापी पर्यटनाच्या मोठ्या मोहिमेत, पंतप्रधान मोदींनी “एक राज्य, …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश यांचा मोदींना सवाल, पोकळ फिल्मी संवाद डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्या

पंतप्रधान मोदी यांनी आज एका कार्यक्रमात बोलत असताना माझ्या रक्तात फक्त महिलांचा सिंदूर वहात असल्याचे सांगत नेहमीच्या पद्धतीने राजकिय भाषण केले. मात्र युद्धबंदी आणि डोनाड ट्रम्प यांच्या दाव्यावर चकार सब्द काढला नाही. त्यावरून काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबती करत मोदीजी असले पोकळ भाषणे …

Read More »

मुंबईसह राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळा रोडचा समावेश

अमृत भारत स्थानक योजनेतून मुंबई शहराचे वैभव आणि युनेस्को जागतिक वारसास्थळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार असून यासाठी दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अमृत भारत रेल्वे स्टेशन योजनेतून पुनर्विकसित करण्यात आलेल्या देशातील १०३ रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

न्या यशवंत वर्मा यांच्या विरोधात एफआयआऱ दाखल करण्याच सर्वोच्च न्यायालयाचा नकार चौकशी अहवाल पंतप्रधान आणि राष्ट्रपती कार्यालयास पाठविले असल्याचे कारण केले पुढे

दिल्ली न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी आढळलेल्या बेहिशेबी रोख रकमेप्रकरणी एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने न्यायाधीश ए. एस. ओका आणि उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने असे निदर्शनास आणून दिले की, सर्वोच्च न्यायालयाने ८ मे रोजी जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, या घटनेची …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, युद्धबंदीवर उपस्थित प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकार का देत नाही? शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू

देशाची एकता व अखंडता कायम रहावी यासाठी इंदिर गांधी व राजीव गांधी या दोन पंतप्रधानांनी बलिदान दिले. देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय लष्कराच्या जवानांनी आपले रक्त सांडले. ऑपरेशन सिंदूरच्या शौर्याने सर्व देशबांधव भारतीय सैन्य दलाचे अभिनंदन करत आहेत, पण अचानक युद्धबंदी जाहिर करणारा डोनाल्ड ट्रम्प कोण? यासह संपूर्ण घटनाक्रमावर निर्माण झालेल्या प्रश्नांची …

Read More »