लोकसभा निवडणूकीपूर्वी राहुल गांधी यांनी जातनिहाय जणगणना सत्तेत आल्यानंतर करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रात विरोधात बसावे लागले. त्यानंतर संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाला आव्हान देत म्हणाले की, तुम्ही कितीही माझ्यावर टीका करा, माझी मस्करी करा …
Read More »वेव्हजचे उद्घाटन करत पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, भारताची ऑरेंज अर्थव्यवस्था बनतेय जगासाठी कंटेट निर्माण करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१ मे २०२५) मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी भारतातील चित्रपट उद्योगातील सेलिब्रिटी आणि इतर कंटेंट निर्माते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी भारतात बनवलेल्या कंटेंटबद्दल आणि देशाला आर्थिक भरभराटीला नेण्यासाठी कंटेंट निर्मात्यांच्या क्षमतेबद्दल विस्तृतपणे सांगितले. पंतप्रधान मोदींनी नजीकच्या …
Read More »पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय बैठक राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षण प्रमुख अनिल चौहान उपस्थित
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे गेल्या आठवड्यात झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ जण – बहुतेक नागरिक – मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल आणि संरक्षण प्रमुख अनिल चौहान यांच्यासोबत आणखी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. नवी दिल्ली येथील …
Read More »काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र पहलगाम हल्ल्याप्रकणी संसदेचे अधिवेशन बोलवा
जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …
Read More »पंतप्रधान मोदी मन की बात म्हणाले की, जो राग भारतीयांच्या मनात तोच राग जगात पहलगाम दशतवाद्यांना कठोरात कठोर उत्तर देणार
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि कट रचणाऱ्यांना कठोरात कठोर उत्तर दिले जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (२७ एप्रिल २०२५) त्यांच्या मासिक रेडिओ भाषणात ‘मन की बात’ मध्ये सांगितले. तीव्र दुःख व्यक्त करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला दुखावले आहे. “प्रत्येक भारतीयाला पीडित कुटुंबांबद्दल तीव्र …
Read More »बिलावल भुट्टो-झरदारी यांची दर्पोक्ती, सिंधू नदी आमचीच, एकतर पाणी नाहीतर रक्त वाहील भारताने सिंधू नदी करार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टो यांनी दिला इशारा
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांचा बळी घेतला. त्यानंतर भारताने पाकिस्तानबरोबरील सिंधू नदी कराराला स्थगिती दिली. तसेच भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देत सर्व व्हिसा रद्द केले. तसेच वाघा आणि अट्टारी बॉर्डरही बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पीपीपी पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी …
Read More »पंतप्रधान शेहबाज शरीफ यांची पहलगाम चौकशी प्रकरणी तटस्थ चौकशीस तयार भारताच्या सीमापार दहशतवादाच्या आरोपानंतर चौकशीची तयारी
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शनिवारी (२६ एप्रिल २०२५) रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या “तटस्थ” चौकशीसाठी तयार असल्याचे सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर “सीमापार दहशतवादाला पाठिंबा देण्याचा” आरोप केला. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे हे वक्तव्य आले आहे. अबोटाबाद येथील एका लष्करी अकादमीत आयोजित कार्यक्रमात …
Read More »पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईला पाकिस्तानचेही प्रत्युत्तर वाघा सीमा बंद, सार्क व्हिसा निलंबित, हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय जाहिर
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध मोठी राजनैतिक कारवाई सुरू केल्यानंतर एका दिवसानंतर, इस्लामाबादने वाघा सीमा बंद करणे, भारतीय नागरिकांसाठी सर्व सार्क व्हिसा निलंबित करणे आणि भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांचे हवाई क्षेत्र बंद करणे यासह अनेक प्रत्युत्तरात्मक उपाययोजनांची घोषणा केली आहे. सिमला कराराचा उल्लेख करून, इस्लामाबादने म्हटले आहे …
Read More »बिहारमधून पंतप्रधान मोदी यांचा इशारा, दहशतवाद्यांना कल्पनेपलीकडे शिक्षा मधुबनी येथील जाहिर सभेत बोलताना पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. त्यानंतर बिहार मधील मधुबनी येथे आयोजित एका जाहिर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांना, या हल्ल्यामागील दहशतवादी आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा मिळेल असा इशारा दिला. पंतप्रधान मोदींनी बिहारच्या मधुबनी येथील सभेत बोलत होते. यावेळी …
Read More »अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स कुटुंबियांसह भारतात दाखल आयटीसी मौर्य शेरटॉनमध्ये उतरले, अक्षरधाम मंदिराला भेट, आग्र्याच्या ताल महल लाही देणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांच्याशी नवी दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या निवासस्थानी चर्चा केली. उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि त्यांची तीन मुले – इवान, विवेक आणि मिराबेल होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्पर करांच्या संकटापासून बचाव करण्यासाठी भारताने व्यापार करार …
Read More »
Marathi e-Batmya