Tag Archives: raigad

“टिबी मुक्त पंचायत” उपक्रमाचा रायगड जिल्ह्यापासून शुभारंभ क्षयरोगमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक- आरोग्यसेवा आयुक्त धीरजकुमार

राज्य क्षयरोगमुक्त करण्याचा आरोग्य मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत यांचा संकल्प आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे. राज्य क्षयरोग मुक्त करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांनी केले. आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित “टीबी मुक्त पंचायत” अभियान उपक्रमाचा शुभारंभ आयुक्त धीरज कुमार …

Read More »

अजित पवार यांचे आवाहन, इर्शाळवाडीची दुर्घटना झाल्याने वाढदिवस साजरा करू नका मात्र ट्विटरवरून ताज हॉटेल येथे वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा कऱण्याचे निमंत्रण

गतवर्षीच्या रायगड जिल्ह्यातील माळीण घटनेची आठवण करून देणारी दुसरी घटना इर्शाळवाडी येथे आदिवासी समाजाची वस्ती असलेल्या ठाकरवाडी येथे दरड कोसळून झालेल्या मोठ्या दुर्घटनेत १२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती असून या दरड खाली अनेक घरे दबली गेली आहेत. त्यामुळे जीवातहानीबरोबरच मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित …

Read More »

मोठी दुर्घटनाः रात्रीत इर्शाळवाडीतील ४० घरांवर दरड कोसळली दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू तर २० जण जखमी

मागील दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे आणि रेल्वे महामार्ग, रस्ते पाण्याखाली गेल्याचे घटना उघडकीस येत आहे. त्यातच माळीण घटनेची आठवण करून देणारी दुसरी घटना रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ कर्जत तालुक्यातील इर्शाळवाडी येथे अत्यंत भीषण आणि दुर्दैवी अशी घटना घडली. इर्शाळवाडी येथे आदीवासी ठाकर समाजाची वस्ती असून यातील ४० …

Read More »

३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, प्रतापगड प्राधिकरणची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी ४५ एकरात शिवसृष्टी उभारण्यासाठी राज्य शासन ५० कोटी रुपयांचा निधी देणार आहे तसेच प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य शासन प्राधिकरण निर्माण करणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावर झालेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे व्हिजन दिले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

शिवराज्याभिषेक दिनी मुंबईसह रायगडावर ‘या’ कार्यक्रमांचे आयोजन रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा मोदींवर निशाणा, बजरंग बली की जय, मग कुठे गेली तुमची ५६ इंच छाती? काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरच मिळत नाही

बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांशी भेटण्यासाठी ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे आज बारसू येथील आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन त्यांच्या पाठीशी शिवसेना असल्याचे सांगितले. त्यानंतर महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या ठाकरे गटात प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीला धक्का

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात रायगड जिल्ह्यातील पालीच्या माजी नगराध्यक्षा गीता पालरेचा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. गीता पालरेचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजपा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आ. …

Read More »

जागतिक दर्जाचा इको पार्क उभारणार निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारता येईल का याविषयी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज वन विभागाचे प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील …

Read More »

कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून इशारा दिला

हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोंकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती …

Read More »

टिळकांचे खापर पणतू म्हणतात, समाधीचा दावा नाही पण स्मारकासाठी पैसे गोळा केले राज ठाकरेंच्या वक्तव्यावर केला खुलासा

नुकत्याच झालेल्या औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचा खळबळजनक दावा करत आता त्यांच्याकडेही जातीय दृष्टीकोनातून पाहणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. मात्र राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर लोकमान्य टिळकांचे खापर पणतू कुणाल टिळक म्हणाले की, टिळकांच्या घरातील …

Read More »