Tag Archives: samajwadi party

अबू आझमीवर कारवाई कराच पण शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई कधी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांचा संतप्त सवाल

समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब बाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या प्रकरणी सरकारने अबू आझमी यांचे निलंबन करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, आमदार अबू आझमी यांचे वक्तव्य बेजबाबदार पणाचे होते. त्यांच्यावर …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सरकारने आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या अबू आजमीचा तीव्र शब्दात धिक्कार..

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करतो. अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सांगितले. याबाबत निवेदन …

Read More »

विधान परिषदेत अबु आझमी, कोरटकर, सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित सत्ताधाऱ्यांकडून माईक बंद करण्याचा प्रयत्न- अंबादालन दानवे यांचा आरोप

विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर भाजपाच्या प्रविण दरेकर यांनी अबु आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे वक्तव्य केल्याचा मुद्दा उपस्थित करत अबु आझमी यांच्यावर राज्य सरकारच्यावतीने कारवाई करावी अशी मागणी केली. त्यानंतर शिवसेना उबाठाचे तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अबु आझमी यांच्या वक्तव्यासह शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी …

Read More »

अबू आझमी यांच्या त्या वक्तव्यावरून विधानसभेत गोंधळः निलंबनाच्या मागणीवर सत्ताधारी ठाम गोंधळामुळे अखेर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरु आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सत्ताधारी बाकावरील आमदारांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांच्या औरंगजेबबद्दलच्या वक्तव्यावरून एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच अबू आझमी यांच्या निलंबनाची मागणीवरून भाजपा दोन्ही शिवसेनेकडून एकच गोंधळ घालण्यात येऊ लागला. त्यामुळे विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरुवातीला १० मिनिटासाठी नंतर अर्ध्यातासासाठी …

Read More »

राहुल गांधी यांची बसपा प्रमुख मायावती यांच्यावर टीका भाजपाविरोधात न लढण्याचे धोरण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बसपा प्रमुख मायावतींवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही, एकतर त्यांचा पक्ष त्यांच्यासोबत युती करण्यास तयार असल्याचे सांगून किंवा भाजपाविरुद्ध लढण्यास तयार नसल्याचे संकेत दिले. बसपाला इंडिया ब्लॉकमध्ये सामील करण्याच्या इच्छेपेक्षा राहुल गांधी यांचा संदेश दलित आणि त्यांचा मित्रपक्ष समाजवादी पक्ष (सपा) यांच्याकडे इशारा असल्याचे …

Read More »

मंत्री म्हणाले होते, लव्ह जिहाद प्रकरणाची माहिती ऐकिव, पण सरकार आणतेय कायदा लव्ह जिहाद कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी समितीची स्थापना

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश राज्यांप्रमाणे मुंबईसह राज्यात, भाजपाच्या दाव्यानुसार हिंदू-मुस्लिम धर्मियातील लव्ह बर्ड्संना अटकाव करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजपा प्रणित  महायुती सरकारही लव्ह जिहादचा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे राज्यात लव्ह जिहाद प्रकरणाची एक लाख तक्रारी असल्याची ऐकिव माहिती असल्याचा खुलासा तत्कालीन महिला व बालविकास मंत्र्यांनी अधिवेशन काळात विधानसभा सभागृहात केला …

Read More »

अबु आझमी आणि रईस शेख यांनी घेतली शपथः मविआतून बाहेर? उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे कारण पुढे करत दिले संकेत

राज्यातील महायुती सरकारला मिळालेल्या संशयातीत विजयाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी सत्ताधाऱ्यांवर मतदान चोर अशी टीका करत सत्ताधाऱ्यांबरोबर आमदारकीची शपथ घेण्याऐवजी उद्या रविवारी शपथ घेणार घेणार असल्याची घोषणा केली. मात्र महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी आणि आमदार रईस शेख यांनी सत्ताधाऱ्यांसोबत विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यामुळे समाजवादी …

Read More »

आमदार रईस शेख यांचा आरोप, अल्पसंख्याक विरोधी सरकार वक्फ मंडळाच्या १० कोटी निधीचा निर्णय मागे

अल्पसंख्याक विभागाने ‘राज्य वक्फ मंडळा’ला १० कोटी रूपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने रद्द केला. १० कोटी निधी देण्याची मागणी पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर करण्यात आलेली होती. शासन निर्णय मागे घेण्याचे आदेश धक्कादायक असून सरकार अल्पसंख्याक विरोधी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे. रईस शेख पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

वक्फ कायदा बदलण्या ऐवजी सच्चर समितीच्या शिफारसी लागू करा समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आजमी यांची मागणी

केंद्र सरकारने वक्फ कायद्यात बदल करून भाजपा सरकारला मुस्लिम समाजाच्या जमिनींचे वाटप करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आजमी यांनी केला असून वक्फ कायद्यात बदल करण्या ऐवजी सच्चर समितीने सुचविलेल्या शिफारसी लागू करण्यात याव्यात अशी मागणी केली. वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्यासंबंधी केंद्रातील भाजपा सरकार …

Read More »

राहुल गांधी यांचा टोला, शिक्षण मंत्री स्वतःला सोडून सगळ्यांना जबाबदार ठरवतायत पेपर लिक प्रकरणावरून राहुल गांधी आणि धर्मेद्र प्रधान यांच्यात रंगला सामना

सोमवारी लोकसभेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुकारला. यावेळी एनईईटी परिक्षेतील पेपर लिक प्रश्नी विरोधक आणि शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यात चांगलाच सामना झाला. यावेळी काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा (NEET) २०२४ मधील कथित लीकवरून केंद्रीय शिक्षण मंत्री …

Read More »