Tag Archives: shivsena (UBT)

संजय राऊत यांच्यावर त्या वक्तव्यावरून गुन्हा दाखल ? पोलिसांकडून तपास सुरु सकाळीच्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरून नाशिकमध्ये गुन्हा दाखल

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकल्यापासून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर टीका करत आरोपही करत असतात तर कधी स्वतःवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तरही देतात. बऱ्याचदा ते सकाळी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु अशाच एका पत्रकार …

Read More »

उध्दव ठाकरे यांची खोचक प्रतिक्रिया,…. शहाण्या जनतेचं अभिनंदन कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होत निकाल जाहिर झाला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, काँग्रेस १३६ जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी ६४ जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसला २० आणि अपक्षांना ४ जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेस बहुमताचा आकडा सहजपणे पार करेल, अशी …

Read More »

सुषमा अंधारे म्हणाले,…अजित पवार एकटेच विरोधी पक्षातील नेते आहेत का? मी तर अजित पवारांचे नावंही घेतले नाही

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर ढसाढसा रडत विरोधी पक्षनेत्यांनी विधिमंडळात त्यांच्यावरील अश्लाघ्य वक्तव्यावर प्रश्न विचारला नाही, अशी तक्रार केली. यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सुषमा अंधारेंनी शरद पवारांसमोर रडण्यापेक्षा उद्धव ठाकरेंसमोर रडा, असं म्हटलं. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे म्हणाल्या, तो …

Read More »

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे प्रत्युत्तर, म्हणून अध्यक्षाची निवडणूक अवैध… जोपर्यंत आमदार अपात्र ठरविला जात नाही तोपर्यंत

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालानंतर राजकीय दावे-प्रतिदाव्यांना उधाण आलं आहे. राज्यपालांची कृती बेकायदेशीर ठरवणे, नबम रेबियाच्या तरतुदी लागू होणार की नाही यासाठी मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवणे, उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करता येणार नाही हे स्पष्ट करणे यासह आमदारांच्या अपात्रतेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे. शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेवर …

Read More »

अनिल परब म्हणाले, निकाल स्पष्ट… तर गटनेत्याची निवडच बेकायदेशीर ठरते बेकायदेशीर व्यक्तीला मुख्यमंत्री होता येत नाही

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिल्यानंतर सत्ताधारी मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपा (BJP) नेत्यांकडून आपापल्या परिने निकालाचे विश्लेषण करण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने लागल्याचा दावा करण्यात येत आहे. आज शुक्रवारी सकाळी वांद्रे येथील …

Read More »

उध्दव ठाकरे यांनी दिला इशारा, विधानसभा अध्यक्षांनी उलट-सुलट केलं तर… पोपट मेला असल्याचे जाहिर करण्याचे काम विधानसभाध्यक्षांकडे

सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दिलेल्या निकालाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्या बाजूने हा निकाल लागल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही हा निकाल त्यांच्या बाजूने लागल्याचं सांगितलं जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) शिंदे गटाच्या आमदारांच्या …

Read More »

निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रत्युत्तर, प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्यांना चपराक घटनाबाह्य सरकार म्हणणारेच कालबाह्य

महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घडलेल्या विविध घटनांवर न्यायालयाने भाष्य केलं आहे. यावेळी न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सर्व निर्णय बेकायदेशीर आणि चुकीचे होते, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्याचबरोबर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर आजची राजकीय स्थिती …

Read More »

संजय राऊत यांचा खोचक टोला, सरकार वाचलं असं समजून खाजवत बसू नये… देशाला आणि लोकशाहीला दिशा देणारा निकाल

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं आहे. न्यायालयाने शिंदे गटाला मोठे धक्के दिले आहेत. तसेच राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. दुसरीकडे, १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे पाठवलं आहे. त्यांनी लवकरात लवकर यावर …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, होय मी नैतिकतेला धरून दिला राजीनामा, मग आता तुम्ही… सर्वोच्च न्यायालयाने सरकारच घटनाबाह्य ठरविले असताना मिंधे गटाने आणि फडणवीसांनी राजीनामा द्यावा

राज्यात शिवसेनेतील बंडाळी आणि त्यानंतर निर्माण झालेला सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा निकाल देत जर उध्दव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर घडाळ्याचे काटे आम्ही उलटे फिरवले असते असे स्पष्ट मत व्यक्त केले. या निर्णयानंतर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी …

Read More »

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, कोणी सांगत असेल… तर काहीतरी गडबड… उद्याचा फैसला सर्वोच्च न्यायालाचा अत्यंत महत्वाचा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल उद्या गुरुवारी जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना याप्रकरणी माहिती दिली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले, …

Read More »