Tag Archives: state President

रविंद्र चव्हाण यांची माहिती, नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा पंधरवडा’ मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान सेवा पंधरवड्यात १ लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, रुग्णांना चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र …

Read More »

कल्याण – डोंबिवली , चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले स्वागत, पालघरचे उबाठा गटातील उपेंद्र पाटील यांचाही भाजपामध्ये प्रवेश

कल्याण डोंबिवलीतील काँग्रेसच्या नंदू म्हात्रे, जितेंद्र भोईर, हृदयनाथ भोईर यांच्यासह ७ माजी नगरसेवकांनी बुधवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासह उबाठा च्या ९ माजी नगरसेवकांनी तसेच पालघर जिल्ह्यातील उबाठा नेते उपेंद्र पाटील यांनीही याच कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या सर्वांचे स्वागत केले. …

Read More »

वसई-विरारच्या ‘बविआ’ च्या माजी नगसेवक आणि कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले सर्वांचे स्वागत

वसई- विरार मधील बहुजन विकास आघाडीचे अनेक वर्षे नगरसेवक राहिलेले महेश पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा पंडित दुबे, आ. प्रसाद लाड, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, वसई-विरार जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील,  प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ आदी …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचे टीकास्त्र,… जनतेचा पैसा आहे, माणिकाराव कोकाटेच्या घरचा नाही शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करा

बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे पण त्याचा अपमान करण्याची एकही संधी भाजपा युती सरकार सोडत नाही. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना सत्तेचा एवढा माज चढला आहे की, ते सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. शेतकऱ्यांना भिखारी म्हटल्यानंतर आता या महाशयांनी कर्जमाफीचे काय करता, लग्न, साखरपुडे करता, शेतीत गुंतवता का, असा अजब …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा निर्धार, ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ची शिकवण व प्रेरणेने वाटचाल करणार भाजपा सरकारची अवस्था दिल्लीत मुजरा, गल्लीत गोंधळ सारखी, डान्सबार पुन्हा सुरु करण्यास काँग्रेसचा विरोध.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांच्या साथीने स्वराज्य उभे केले. बलाढ्य शुत्रूच्या विरोधात गनिमी कावा पद्धतीने त्यांनी लढाई लढली, तीच आमची प्रेरणा आहे. शिवाजी महाराज केवळ औरंगजेब, निजामशाह, आदिलशाह यांच्याशीच लढले नाहीत तर तत्कालीन धर्मव्यवस्थेशी त्यांना लढा द्यावा लागला. या लढ्यात वारकरी संप्रदाय, चक्रधर स्वामी, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रवाहाची कास …

Read More »

भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी, राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर बंदी घाला राहुल गांधी यांची विधाने मागासवर्गीयांचे हक्क नाकारणारी

जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. त्यांचे विधान अत्यंत गंभीर असून, त्यांचे पोटातील ओठावर आले. राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना ओबीसी, एसटी समाजातील सर्व एकत्रितपणे आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा असे खडसावून विचारू, असा असे भूमिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे …

Read More »