Tag Archives: uday samant

१३ विद्यापीठांच्या परिक्षा ऑनलाईन होणार आणि विद्यार्थ्यांचे लसीकरण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून दिवसेंदिवस कडक निर्बंध लागू करण्यात येत असल्याने अकृषिक विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परिक्षा घेणे अशक्य झाले. त्यामुळे या सर्व परिक्षा आता ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्य सरकारने आज आणखी कडक निर्बंध …

Read More »

भराडी देवीच्या साक्षीने मुख्यमंत्र्यांनी दिले कोकणवासीयांना हे वचन कोकणातील युवकांनी शेतीची कास धरावी

मुंबई-मालवण : प्रतिनिधी शेती ही शाश्वत आहे. कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचे कामही केले. याचा विचार करून कोकणातील युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावे. शासनाने सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासियांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा असे आवाहन करत भराडी देवीच्या साक्षीने मी सांगतोय कोकणचा विकास …

Read More »

राज्यात आता सेंद्रीय-जैविक शेतीवर भर खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सेंद्रिय शेती धोरणाबाबत बैठक संपन्न

मुंबई : प्रतिनिधी सेंद्रिय शेतमालाला बाजारपेठ मिळावी म्हणून जैविक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या तयार करणे व त्यांचा जैविक शेती महासंघ तयार करणे या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे. तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व बँकाकडून सहकार्य मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी …

Read More »

“त्या” नापास झालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी महाविद्यालयाने घेतली तांत्रिक कारणामुळे नापास झालेल्यांची सर्व माहिती पाठविणार असल्याचा खुलासा

मुंबई: प्रतिनिधी ऑनलाईन परिक्षा देवूनही काही तांत्रिक कारणामुळे गैरहजर असल्याची नोंद गुणपत्रिकेवर नापास ठरलेल्या त्या ३४ विद्यार्थ्यांची जबाबदारी महाविद्यालयाने स्विकारली आहे. यासंदर्भात लवकरच तक्रारदार विद्यार्थ्यांची सर्व माहिती मुंबई विद्यापीठाला कळविण्यात येणार असल्याचे सिध्दार्थ महाविद्यालयाचे अॅड.पंकज मेढे यांनी मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाच्या प्रतिनिधीला फोनवरून दिली. मुंबई विद्यापीठाकडून एलएलबीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात …

Read More »

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बनल्या शासनाच्या समन्वयक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली नेमणूक

मुंबई: प्रतिनिधी रूपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर आता राजकारणात आपले अस्तित्व निर्माण करत असलेल्या शिवसेनेच्या संभावित आमदार तथा चित्रपट अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची वर्णी आता शासनाच्या एका समितीवर समन्वयक म्हणून नुकतीच करण्यात आली. तसेच यासंबधीचे आदेशही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विभागाच्या मार्फत काढले असून त्याची माहितीही …

Read More »

महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार मात्र शिक्षणाचे दोन्ही पर्याय राहणार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग १५ फेब्रुवारी, २०२१ पासून सुरु होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात …

Read More »

पदवी व पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना दिलासा: प्रमाणपत्रे सादर करण्यास मुदतवाढ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी विद्यार्थी व पालक यांच्याकडून प्राप्त झालेल्या विनंती अर्जाच्या अनुषंगाने पदवी व पदव्युत्तर प्रवेशासाठी आवश्यक प्रमाणपत्रे सादर करण्यास  दिनांक २० जानेवारी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील उच्च व तंत्रशिक्षण …

Read More »

विद्यापीठात “सामंतशाही” भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा गंभीर आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून विद्यापीठांच्या स्वायत्तेवर घाला घालण्यात येत असून उच्च शिक्षण मंत्र्यांकडून विद्यापीठात “सामंतशाही” सुरु आहे. नँक मुल्यांकन होणार असतानाच सरकारने मनमानी पध्दतीने कुलसचिवांची नियुक्ती केल्याने त्याचा विद्यापीठाच्या मुल्यांकनावर परिणाम हाईल की काय? इथेही सरकारचा अहंकारच दिसून येतोय, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार …

Read More »

शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला राज्यातील ‘आयटीआय’च्या अद्ययावतीकरणातून ‘जागतिक दर्जाच्या कुशल मनुष्यबळाची निर्मिती

मुंबई : प्रतिनिधी जागतिक औद्योगिक क्षेत्राची गरज भागवू शकतील असे कुशल मनुष्यबळ महाराष्ट्रातून उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारण अकरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यापैकी ८८ टक्के निधी उद्योग क्षेत्राकडून तर राज्य शासनाकडून १२ टक्के निधी उपलब्ध करण्यात येणार …

Read More »

डॉ. आबंडेकरांचे देशातील पायाभूत सुविधा आणि कामगार क्षेत्रातील योगदान मोठे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्राचे मुंबई विद्यापीठात कोनशिला अनावरण

मुंबई : प्रतिनिधी संविधान निर्मितीमधील बाबासाहेबांचे कार्य सर्वांना माहिती आहे. पण बाबासाहेबांनी याबरोबरच देशाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीतही महत्वपूर्ण योगदान दिले आहे. धरणांची उभारणी, पाण्याचा योग्य पद्धतीने वापर, विद्युत निर्मिती, कामगारांचे अधिकार अशा विविध क्षेत्रात बाबासाहेबांनी फार महत्वाचे योगदान दिले आहे. त्यांची वैज्ञानिकदृष्टी देशाला आणि समाजाला महत्वपूर्ण दिशा देणारी ठरली. ज्या …

Read More »