Tag Archives: uddhav thackeray

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, उध्दव ठाकरे यांना सांगून शिवसेना सोडली… राष्ट्रवादीशी काडीमोड घ्या म्हणून सांगितले परंतु त्यांनी ऐकले नाही

नुकतेच शिवसेनेतील १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर या १२ पैकी एकजण असलेले खासदार श्रीरंग बारणे यांचाही समावेश आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आल्यानंतर श्रीरंग बारणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घ्यावा आणि शिवसेनेने भाजपासोबतच युती करावी, ही आम्हा खासदारांची ठाम भूमिका आहे. त्यादृष्टीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात …

Read More »

संजय राऊत यांचा बंडखोरांवर निशाणा, त्यांच्या उठावातील ‘उठा’ म्हणजे ‘उध्दव ठाकरे’… बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर पुरावा पुरावे सादर करण्याची वेळ आणता, माफ करणार नाही

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात संवादाचा मार्ग सुरु होईल म्हणून आस्ते कदम घेतलेल्या प्रवक्ते संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदे समर्थक बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत  म्हणाले की, ‘हे बंड नसून उठाव आहे’ या बंडखोरांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यावरुन टीका …

Read More »

सत्तांतरानंतर सही होताच मोदी सरकारने काढली बुलेट ट्रेनच्या कामाची निविदा बीकेसीतील बुलेट ट्रेन स्टेशनच्या कामाची निविदा जाहीर

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर पक्षनेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकाविणारे एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्य सरकार स्थापन केले. या शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्याच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नंतर आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी लागणाऱ्या बीकेसीतील जागेच्या हस्तांतरणावरसह सर्व कागदपत्रांवर …

Read More »

बंडखोरांनाच पडला “ठाकरे कुटुंबावर बोलायचे नाही आणि बोलू द्यायचे नाही” वाक्याचा विसर बंडखोरांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यास सुरुवात

शिवसेनेतील बंडाळीनंतर सध्या राज्याच्या शिवसंवाद दौऱ्यावर निघालेल्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर गद्दार आणि पाठीत खंजीर खुपसला आदी आरोप आणि टीका करण्यास सुरुवात केली. त्यावर मागील काही दिवसांपासून मातोश्री आणि ठाकरे कुटुंबियांवर बोलायचे नाही अशी भूमिका घेणारे बंडखोर नेत्यांनी आता आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच …

Read More »

सतेज पाटील यांनी काढली कांदे-भुसे-देसाई यांच्या ठाकरेंवरील “त्या” आरोपातील हवा एखाद्या व्यक्तीला संरक्षण देण्याचा निर्णय आम्ही नाही तर मुख्य सचिव घेतात

शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावित एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या ५० आमदारांमधील एक असलेले नाशिकमधील नांदगांवचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप केला. तसेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा मिळणे आवश्यक असतानाही त्यांना झेड प्लस सुरक्षा देवू नये यासाठी वर्षा निवासस्थानावरून …

Read More »

आदित्य ठाकरे यांचे सुहास कांदे यांना प्रत्युत्तर, शिवसैनिकाला मी बांधील पण गद्दारांना… मनमाड दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेचे जल्लोषात स्वागत

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर शिंदे यांच्या पाठोपाठ पक्षातील ४० आमदार आणि समर्थक अपक्ष असे मिळून ५० आमदार गेले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या बांधणीसाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेला सुरुवात केली. या यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे हे आज मनमाड येथे आले. त्यामुळे बंडखोर आमदार …

Read More »

भुसे-केसरकरांचा खळबळजनक आरोप: नक्षलवाद्यांच्या धमक्या असूनही शिंदेंना सुरक्षा नाकारली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यावेळी तेथील नक्षलवाद्यांनी शिंदे यांना मारण्याचा कट आखला. तसेच धमक्याही दिल्या. याची माहिती असतानाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा नाकारण्यात आली. तसेच त्यांना सुरक्षेची गरज नाही असे उध्दव ठाकरे यांनी सांगितल्याचा खळबळजनक आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांच्या रक्तातच शिवसेना नव्हती…कपाळी गद्दारीचा शिक्का बंडखोरांवर आदित्य ठाकरे यांनी केली टीका

आम्ही शिवसेनेच्या खासदार- आमदारांवर अंधविश्वास ठेवला. तर त्यांनी आमच्याच पाठीत खंजीर खुपसला. जे गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. आयुष्यभर त्यांच्या कपाळावर गद्दाराचा ठपका असेल, अशी टीका शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली. भिवंडीत आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हजारो शिवसैनिकांशी …

Read More »

न्यायालयाच्या निकालानंतर उध्दव ठाकरे म्हणाले,…या सारखे समाधान नाही ओबीसी आरक्षणप्रकरणी केलेल्या कामाबाबत व्यक्त केले समाधान

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने गदा आणली. त्यानंतर ओबीसी आरक्षणावरून त्यावेळी पक्षात असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवित राज्य भरात आंदोलनाचा सपाटाच लावला. तसेच ओबीसी आरक्षणावरून अनेकदा घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने अखेर राज्यातील ओबीसींना न्याय देत काढून घेतलेले …

Read More »

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, …ती गोष्टही अपात्रतेसाठी कारण ठरू शकते का? कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंग सिंघवी, हरिष साळवेंकडून कायद्याचा किस

सर्वोच्च न्यायालायत एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून एकमेकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केल्यावरील सुनावणी दरम्यान एकनाथ शिंदे गटाकडून महेश जेठमलानी, हरिष साळवे यांनी बाजू मांडली तर उध्दव ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी, कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्यावतीने भारताचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मात्र …

Read More »