Tag Archives: union minister

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या ढिसाळ आयोजनाबद्दल अश्विनी वैष्णव यांनी मागितली माफी कार्यक्रमाला हजर राहणाऱ्यांची संख्या वाढल्याने अव्यवस्था

जगातील सर्वात मोठ्या कृत्रिम बुद्धिमत्ता मेळाव्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ च्या पहिल्या दिवशी समस्यांना तोंड देणाऱ्या लोकांची इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी माफी मागितली आणि सांगितले की, उपस्थितांची उपस्थिती अभूतपूर्व होती. त्यांनी सांगितले की सरकार खुल्या मनाचे आहे आणि वापरकर्त्यांना सहज अनुभव …

Read More »

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा रोहयो मंत्री भरत गोगावले यांची माहिती

ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवर असलेली ‘दहा कामांची मर्यादा’ आता लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, यामुळे कामांना गती मिळणार असल्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले. राज्यात मागील काही …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा सवाल, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार? मुंबईला देशातील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना विलंब का ?

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होऊन १५ वर्षे झाली तरी अद्याप हा महामार्ग पूर्ण झालेला नाही. भाजपा सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करते पण कोणताच प्रकल्प पुर्ण करत नाही व जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. एक महामार्ग बनवण्यास एवढी वर्षे लावून सरकार कंत्राटदारांचे खिसे भरत आहेत का? असा सवाल काँग्रेस खासदार …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर येत्या २-३ महिन्यांत भविष्योन्मुख धोरणे आणणार, अॅडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६

येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन येत्या दोन-तीन महिन्यात विविध क्षेत्रांतील भविष्योन्मुख (फ्युचर रेडी पॉलिसी) धोरणे आणली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. असोसिएशन …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ’चे थाटात उद्घाटन

गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टिल हब, नागपुरात सोलर मॉडयुल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ …

Read More »

केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा संपन्न झाली. या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे, आणि रुग्णकेंद्रित सेवा देणे बाबत …

Read More »

भूपेंद्र यादव यांची माहिती, न्यायालयाच्या निर्णयानंतर अरवली खाण प्रकरणी भूमिका स्पष्ट इकोलॉजी आणि इकॉनॉमीचा एकत्रित विचार आणि भूमिका

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी सांगितले की, अरवली पर्वतरांगेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल गैरसमज पसरवला जात आहे, आणि सरकारने देशातील सर्वात जुन्या पर्वतरांगेच्या संरक्षणाला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. आपण या निकालाचा सविस्तर अभ्यास केला असल्याचे सांगून भूपेंद्र यादव म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले आहे की, दिल्ली, गुजरात आणि राजस्थानमधील …

Read More »

केंद्र सरकारने ईपीएफओ नोंदणी योजना २०२५ सुरु केली ईपीएफओ अंतर्गत सहा महिन्यांचा विशेष उपक्रम

सामाजिक सुरक्षा कव्हरचा विस्तार आणि स्वैच्छिक अनुपालनाला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, भारत सरकारने कर्मचारी नोंदणी योजना २०२५ सुरू केली आहे, ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने ईपीएओ (EPFO) अंतर्गत सहा महिन्यांचा एक विशेष उपक्रम आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख …

Read More »

पियुष गोयल यांची आशा, व्यापारी वाटाघाटी अंतिम मुदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही भारत शेतकरी, मच्छिमार एमएसएमईच्या हिताचे रक्षण करणार

भारत आणि अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठी पुन्हा चर्चा सुरू करत असतानाही, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी सांगितले की व्यापार वाटाघाटी अंतिम मुदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत आणि भारत आपल्या शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमईच्या हिताचे रक्षण करत राहील यावर जोर दिला. पियुष गोयल म्हणाले की, “चर्चा सकारात्मक पद्धतीने …

Read More »

पियुष गोयल यांची स्पष्टोक्ती, जागतिक पुरवठादार म्हणून स्थान देण्यासाठी नवोपक्रम, स्पर्धात्मकता जागतिक उद्योगात भारत आघाडीवर

७ व्या सीआयआय भारतीय रसायने आणि पेट्रोकेमिकल्स परिषदेत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी रसायने आणि पेट्रोकेमिकल्समध्ये भारताला जागतिक पुरवठादार म्हणून स्थान देण्यासाठी नवोपक्रम, स्पर्धात्मकता आणि जागतिक व्यापार यावर भर दिला. स्पर्धात्मकता सक्षम करणे: जागतिक नेतृत्वासाठी भारताचा मार्ग या विषयावरील आपल्या भाषणाची सुरुवात करताना पियुष गोयल म्हणाले की …

Read More »