सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे काम सहकार कायद्यातून झाले पाहिजे. त्यासाठी कायद्यात प्रत्येक क्षेत्राशी निगडित नवीन ‘ प्रकरणे ‘ दाखल करावी लागणार आहेत. सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज आहे. त्यासाठी सहकार कायद्यातील आवश्यक बदलांसाठी समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »पाकिस्तानामधून भारतात येणाऱ्या टपाल आणि पार्सलवर तात्काळ बंदी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची माहिती
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर, ज्यामध्ये पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांचा बळी घेतला, नवी दिल्लीने इस्लामाबादविरुद्ध कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे भारताने पाकिस्तानबरोबरची आयात-निर्यातीवर बंदी घातल्यानंतर आता पाकिस्तानसोबत हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने सर्व श्रेणीतील टपाल आणि पार्सल देवाणघेवाण तात्काळ प्रभावाने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. “भारत सरकारने हवाई आणि भूपृष्ठ मार्गाने …
Read More »मंत्री राजीव रंजन सिंह, मत्स्योत्पादनामध्ये क्रमांक एकचे राज्य होण्याची महाराष्ट्रामध्ये क्षमता देशाचे मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी सर्व राज्यांनी सहकार्याने काम करण्याची गरज व्यक्त
मत्स्योत्पादनात देशात आज आंध्रप्रदेशचा वाटा ३२ टक्क्यांचा आहे. तर महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून १३ टक्के हिस्सा महाराष्ट्राचा आहे. हा हिस्सा ३२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढवून देशातील सर्वाधिक मत्स्योत्पादन करणारे राज्य होण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये असून महाराष्ट्राचे तरूण मत्स्यव्यवसाय मंत्री यांनी यासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ …
Read More »पियुष गोयल यांचे पहलगाम हल्ल्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य,…मग असे हल्ले होत राहणार काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पियुष गोयल यांच्यावर टीका
काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटनाला गेलेल्या पर्यटकांवर हल्ला केला. त्यात २६ पर्यटकांचा बळी गेला. यात महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह देशात अद्याप अनेकांना दुःख झालेले आहे. तसेच या दुःखातून अद्याप अनेक जण बाहेर आलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या …
Read More »नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
ज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर या जिल्ह्यांमध्ये शेतीपुरक उद्योगाने चांगला आकार घेतल्याचे आपल्या निर्दशनास येते. या दृष्टीने विचार करुन नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेच्या संस्थापक प्रशासकत्वाची जबाबदारी आजपासून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे सुपूर्द …
Read More »पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमिपूजनः मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती
संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कसोशीने कार्य करीत आहे. माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन …
Read More »पंतप्रधान मोदी यांची रेशीमबागेतील आरएसएसच्या मुख्यालयास भेट डॉ हेडगेवार आणि गोळवळकर गुरूजींच्या स्मृतीस्थळाचे घेतले दर्शन
नागपूर येथील आरएसएस मुख्यालयाला भेट देणारे पंतप्रधान मोदी म्हणाले की, संघ हा भारताच्या अमर संस्कृती आणि आधुनिकीकरणाच्या वटवृक्षासारखा आहे. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिक्षाभूमीला भेट दिली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय …
Read More »राज्यपालांचे आवाहन, सिकलसेल व जनुकीय आजारांवर अधिकाधिक संशोधन भर आवश्यक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थितीत एम्स नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात
वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज आहे. उपचार पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज केले. मिहान परिसरात आयोजित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग …
Read More »रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सदिच्छा भेट डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँके ची स्थापना - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या द प्रोब्लम ऑफ रुपी या प्रबंधावर आधारित रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतुनच रिझर्व्ह बँकेची निर्मिती झाल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांची आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले …
Read More »सेमीकंडक्टर चिप डिसाईनसाठी अॅनालॉग आणि डिजिटल हॅकेथॉन आयटीमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून विजेत्यांची घोषणा
भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमला मोठी चालना देण्यासाठी, चिप्स टू स्टार्ट-अप (C2S) कार्यक्रमांतर्गत “अॅनालॉग आणि डिजिटल हॅकेथॉन” द्वारे आयआयटी दिल्ली, आयआयटी बॉम्बे, आयआयटी गुवाहाटी, आयआयटी (बीएचयू) वाराणसी, एनआयटी राउरकेला आणि सवेथा अभियांत्रिकी महाविद्यालय यासारख्या शीर्ष अभियांत्रिकी संस्था चिप्स टू स्टार्ट-अप (C2S) कार्यक्रमांतर्गत “अॅनालॉग आणि डिजिटल हॅकेथॉन” द्वारे चिप डिझाइन इनोव्हेशनमध्ये आघाडीवर आहेत. …
Read More »
Marathi e-Batmya